शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

‘भारतरत्न’चे वर्तन तपासू शकत नाही!

By admin | Updated: July 19, 2016 05:49 IST

‘भारतरत्न’ या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविलेल्या व्यक्तीने सार्वजनिक जीवनात कसे वागावे किंवा कसे वागू नये

नवी दिल्ली : ‘भारतरत्न’ या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविलेल्या व्यक्तीने सार्वजनिक जीवनात कसे वागावे किंवा कसे वागू नये, याविषयी कोणताही कायदा किंवा नियम नसल्याने अशा व्यक्तीचे एखादे वर्तन योग्य आहे की, अयोग्य हे आम्ही ठरवू शकत नाही, असे नमूद करून सर्वोच्च न्यायालयाने ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकर याच्याविरुद्धची एक याचिका सोमवारी फेटाळून लावली.सन २०१२ मध्ये भारत सरकारने सचिनला ‘भारतरत्न’ दिले. मात्र, सचिन या सर्वोच्च नागरी बहुमानाचा दुरुपयोग करीत असल्याने त्याचा हा किताब परत घेतला जावा, अशी जनहित याचिका भोपाळ येथील व्ही. के. नासवा यांनी जबलपूर येथील मध्य प्रदेश उच्च न्यायालयात गेल्या वर्षी केली होती. नावामागे ‘भारतरत्न’ असे लावण्यास मनाई असूनही ‘भारतरत्न सचिन तेंडुलकर’ अशा शीर्षकाची सचिनवरील पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. शिवाय, सचिन या बहुमानाचा व्यावसायिक दुरुपयोग करीत आहे, असा नासवा यांचा दुहेरी आक्षेप होता.स्वत:च युक्तिवाद करणाऱ्या नासवा यांनी जाडजूड याचिका दाखल केली होती, परंतु ‘भारतरत्न’ व्यक्तीने सार्वजनिक जीवनात कसे वागावे, या विषयीचे कोणतेही नियम अथवा कायद्यातील तरतूद त्यात नव्हती. तशी काही तरतूद असेल, तर याचिकेत सुधारणा करून ती सादर करण्याची न्यायालयाने त्यांना संधी दिली. तरी ते असा कोणताही दस्तावेज सादर करू शकले नव्हते. या पार्श्वभूमीने उच्च न्यायालयाच्या न्या. राजेंद्र कुमार मेनन व न्या.सुशीलकुमार गुप्ता यांच्या खंडपीठाने गेल्या वर्षी १० आॅगस्ट रोजी ही याचिका फेटाळली होती.याविरुद्ध नासवा यांनी सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका (अपील) केली व तेथेही स्वत:च युक्तिवाद केला. सोमवारी हे अपील फेटाळताना न्या. दीपक मिश्रा व न्या. डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने म्हटले की, ‘भारतरत्न’ मिळालेल्या सचिन तेंडुलकरचे सार्वजनिक जीवनातील वर्तन या बहुमानाला साजेसे नाही, असा अर्जदारांचा आक्षेप आहे, परंतु याविषयी कोणताही कायदा अथवा नियम नसल्याने तेंडुलकरचे हे कथित वर्तन योग्य आहे की, अयोग्य याची शहानिशा आम्ही करू शकत नाही. (विशेष प्रतिनिधी)>...तर जबाबदार नाहीन्यायालयाने म्हटले की, सचिन तेंडुलकरने स्वत: पुस्तक लिहून आपल्या नावामागे ‘भारतरत्न’ अशी बिरुदावली लावली असती, तर गोष्ट वेगळी होती. तिसऱ्या कोणीतरी लिहिलेल्या पुस्तकाच्या शीर्षकात ‘भारतरत्न’ असा शब्दप्रयोग केला गेला असेल, तर त्यासाठी सचिनला मुळीच जबाबदार धरता येणार नाही.