शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

कृउबा बंद पाडण्याचा खरेदीदारांचा प्रयत्न किरकोळ खरेदीदारांनी पुकारला बंद: शेतकर्‍यांचे हाल झाल्याने काकडी फेकली; अडत कमी करण्याची मागणी

By admin | Updated: July 19, 2016 23:41 IST

जळगाव : सहा टक्के अडत व एक टक्का बाजार समिती शुल्कावरून निर्माण झालेल्या वादामुळे बाजार समितीमधील फळे व भाजीपाला मार्केटमध्ये किरकोळ खरेदीदारांनी मंगळवारी बंद पुकारला. काही खरेदीदारांनी शेतकरी व इतर ठिकाणाहून आलेल्या खरेदीदारांना प्रवेशद्वाराजवळच रोखले. यामुळे काही वेळ शेतकर्‍यांचा माल पडून राहीला. एका शेतकर्‍याने आपली काकडीही यार्डात फेकली. वाद वाढत असल्याचे लक्षात घेता पोलिसांनाही पाचारण करण्यात आले.

जळगाव : सहा टक्के अडत व एक टक्का बाजार समिती शुल्कावरून निर्माण झालेल्या वादामुळे बाजार समितीमधील फळे व भाजीपाला मार्केटमध्ये किरकोळ खरेदीदारांनी मंगळवारी बंद पुकारला. काही खरेदीदारांनी शेतकरी व इतर ठिकाणाहून आलेल्या खरेदीदारांना प्रवेशद्वाराजवळच रोखले. यामुळे काही वेळ शेतकर्‍यांचा माल पडून राहीला. एका शेतकर्‍याने आपली काकडीही यार्डात फेकली. वाद वाढत असल्याचे लक्षात घेता पोलिसांनाही पाचारण करण्यात आले.
नंतर किरकोळ खरेदीदारांची बाजार समिती प्रशासनाने समजूत घातली. थेट खरेदी विक्री व्हावी यासाठी बाजार समिती प्रशासनाने शेतकरी व किरकोळ खरेदीदार यांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली. बाजार समितीमध्ये अडतदार व खरेदीदार किंवा किरकोळ व्यापारी यांच्यात सहा टक्के अडत आणि एक टक्का बाजार समिती शुल्कावरून सोमवारी वाद झाल्याचे पडसाद मंगळवारीही उमटले.

खरेदी-विक्री न करण्याचा निर्णय
फळे व भाजीपाला मार्केटमध्ये सकाळीच शेतकर्‍यांनी आपला शेतमाल आणला. परंतु आपण शेतमाल खरेदी करणार नाही. जे शेतकरी व किरकोळ खरेदीदार मार्केटमध्ये जाण्याचा प्रयत्न करीत होते त्यांना काही किरकोळ खरेदीदार अडवित होते. सहा टक्के अडत कमी करा, अशी मागणी काही खरेदीदारांनी केली व फळे आणि भाजीपाला मार्केटचे प्रवेशद्वार बंद केले. बाजार समिती प्रशासनाने लागलीच पोलिसांना बोलावले. नंतर किरकोळ खरेदीदार नरमले व ते यार्डात भाजीपाला खरेदीसाठी तयार झाले.

५०० क्विंटल भाजीपाल्याची विक्री
फळे व भाजीपाला मार्केट यार्डात शेतकरी व किरकोळ खरेदीदार थेट सौदे करू शकतात. त्यांनी थेट खरेदी विक्री केली तर शुल्काची गरज नाही. त्यांच्या वाहनांकडूनही कोणताही कर आकारला जाणार नाही, असे सांगितले. सुमारे १० ते १२ कर्मचारी बाजार समिती प्रशासनाकडून आले. यानंतर यार्डात शेतकरी व किरकोळ खरेदीदार किंवा व्यापारी यांच्यात सौदे झाले. सुमारे ५०० क्विंटल भाजीपाल्याची खरेदी व विक्री नंतर झाली.

काही शेतकरी वैतागले
बाजार समितीमध्ये सुरू असलेल्या गोंधळामुळे शेतकरी वैतागले. एका शेतकर्‍याने मार्केटच्या यार्डात आपली काकडी फेकली. आम्ही घाम गाळून शेतमाल पिकवितो, परंतु त्याला मोल नाही, असे काही शेतकरी म्हणाले.

सहा टक्के अडत व एक टक्का बाजार शुल्क सध्या वसूल केले जात आहे. खरेदीदारांनी सुरुवातीला वाद घातला. नंतर मात्र त्यांनी शेतमाल खरेदी केला.
-प्रकाश नारखेडे, सभापती, बाजार समिती