शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
3
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
4
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
5
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
6
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
7
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!
8
अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवरही पाकिस्तान बॅन? भारताचे ई-कॉमर्स कंपन्यांना स्पष्ट आदेश, यापुढे..
9
"मित्रा, भारतात ॲपलचं उत्पादन करू नकोस"; डोनाल्ड ट्रम्प यांचा टीम कूकना सल्ला... काय आहे नेमका मुद्दा?
10
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला
11
"अफगाणिस्तानचे लोक मनापासून भारतासोबत..." ; मरियम सोलेमानाखिल यांनी पाकिस्तासोबतच्या संबंधावर भाष्य केले
12
Purnam Kumar Shaw : "डोळ्यावर पट्टी बांधून नेलं, टॉर्चर केलं..."; पाकिस्तानातून परतलेल्या BSF जवानाची आपबीती
13
३५ चेंडूत शतक झळकवणारा वैभव सूर्यवंशी दहावीत नापास झाला?; व्हायरल दाव्याचं सत्य जाणून घ्या
14
'पाकिस्तानचा अणुबॉम्ब IAEA च्या देखरेखीखाली आणावा', संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मागणी
15
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
16
Gold Rate Today 15 May: एका झटक्यात सोनं २ हजार रुपयांपेक्षा अधिक झालं स्वस्त, चांदीतही मोठी घसरण; काय आहेत नवे दर?
17
पिता न तू वैरी! किन्नर म्हणत पोटच्या मुलीचा जीव घेतला, नंतर पत्नीच्या पायावर डोकं ठेवत म्हणाला...
18
पाकिस्तानशी यारी, तुर्की-अझरबैजानला पडणार भारी; भारतीयांनी अख्खा बाजार उठवला
19
ना गिल, ना पंत... सुनील गावसकर म्हणतात- 'हा' अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कसोटी कर्णधार हवा!
20
"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं

कृउबा बंद पाडण्याचा खरेदीदारांचा प्रयत्न किरकोळ खरेदीदारांनी पुकारला बंद: शेतकर्‍यांचे हाल झाल्याने काकडी फेकली; अडत कमी करण्याची मागणी

By admin | Updated: July 19, 2016 23:41 IST

जळगाव : सहा टक्के अडत व एक टक्का बाजार समिती शुल्कावरून निर्माण झालेल्या वादामुळे बाजार समितीमधील फळे व भाजीपाला मार्केटमध्ये किरकोळ खरेदीदारांनी मंगळवारी बंद पुकारला. काही खरेदीदारांनी शेतकरी व इतर ठिकाणाहून आलेल्या खरेदीदारांना प्रवेशद्वाराजवळच रोखले. यामुळे काही वेळ शेतकर्‍यांचा माल पडून राहीला. एका शेतकर्‍याने आपली काकडीही यार्डात फेकली. वाद वाढत असल्याचे लक्षात घेता पोलिसांनाही पाचारण करण्यात आले.

जळगाव : सहा टक्के अडत व एक टक्का बाजार समिती शुल्कावरून निर्माण झालेल्या वादामुळे बाजार समितीमधील फळे व भाजीपाला मार्केटमध्ये किरकोळ खरेदीदारांनी मंगळवारी बंद पुकारला. काही खरेदीदारांनी शेतकरी व इतर ठिकाणाहून आलेल्या खरेदीदारांना प्रवेशद्वाराजवळच रोखले. यामुळे काही वेळ शेतकर्‍यांचा माल पडून राहीला. एका शेतकर्‍याने आपली काकडीही यार्डात फेकली. वाद वाढत असल्याचे लक्षात घेता पोलिसांनाही पाचारण करण्यात आले.
नंतर किरकोळ खरेदीदारांची बाजार समिती प्रशासनाने समजूत घातली. थेट खरेदी विक्री व्हावी यासाठी बाजार समिती प्रशासनाने शेतकरी व किरकोळ खरेदीदार यांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली. बाजार समितीमध्ये अडतदार व खरेदीदार किंवा किरकोळ व्यापारी यांच्यात सहा टक्के अडत आणि एक टक्का बाजार समिती शुल्कावरून सोमवारी वाद झाल्याचे पडसाद मंगळवारीही उमटले.

खरेदी-विक्री न करण्याचा निर्णय
फळे व भाजीपाला मार्केटमध्ये सकाळीच शेतकर्‍यांनी आपला शेतमाल आणला. परंतु आपण शेतमाल खरेदी करणार नाही. जे शेतकरी व किरकोळ खरेदीदार मार्केटमध्ये जाण्याचा प्रयत्न करीत होते त्यांना काही किरकोळ खरेदीदार अडवित होते. सहा टक्के अडत कमी करा, अशी मागणी काही खरेदीदारांनी केली व फळे आणि भाजीपाला मार्केटचे प्रवेशद्वार बंद केले. बाजार समिती प्रशासनाने लागलीच पोलिसांना बोलावले. नंतर किरकोळ खरेदीदार नरमले व ते यार्डात भाजीपाला खरेदीसाठी तयार झाले.

५०० क्विंटल भाजीपाल्याची विक्री
फळे व भाजीपाला मार्केट यार्डात शेतकरी व किरकोळ खरेदीदार थेट सौदे करू शकतात. त्यांनी थेट खरेदी विक्री केली तर शुल्काची गरज नाही. त्यांच्या वाहनांकडूनही कोणताही कर आकारला जाणार नाही, असे सांगितले. सुमारे १० ते १२ कर्मचारी बाजार समिती प्रशासनाकडून आले. यानंतर यार्डात शेतकरी व किरकोळ खरेदीदार किंवा व्यापारी यांच्यात सौदे झाले. सुमारे ५०० क्विंटल भाजीपाल्याची खरेदी व विक्री नंतर झाली.

काही शेतकरी वैतागले
बाजार समितीमध्ये सुरू असलेल्या गोंधळामुळे शेतकरी वैतागले. एका शेतकर्‍याने मार्केटच्या यार्डात आपली काकडी फेकली. आम्ही घाम गाळून शेतमाल पिकवितो, परंतु त्याला मोल नाही, असे काही शेतकरी म्हणाले.

सहा टक्के अडत व एक टक्का बाजार शुल्क सध्या वसूल केले जात आहे. खरेदीदारांनी सुरुवातीला वाद घातला. नंतर मात्र त्यांनी शेतमाल खरेदी केला.
-प्रकाश नारखेडे, सभापती, बाजार समिती