शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
4
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
5
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
6
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
7
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
8
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
9
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
10
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
11
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
12
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
13
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
14
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
15
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
16
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
17
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
18
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
19
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
20
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?

कृउबा बंद पाडण्याचा खरेदीदारांचा प्रयत्न किरकोळ खरेदीदारांनी पुकारला बंद: शेतकर्‍यांचे हाल झाल्याने काकडी फेकली; अडत कमी करण्याची मागणी

By admin | Updated: July 19, 2016 23:41 IST

जळगाव : सहा टक्के अडत व एक टक्का बाजार समिती शुल्कावरून निर्माण झालेल्या वादामुळे बाजार समितीमधील फळे व भाजीपाला मार्केटमध्ये किरकोळ खरेदीदारांनी मंगळवारी बंद पुकारला. काही खरेदीदारांनी शेतकरी व इतर ठिकाणाहून आलेल्या खरेदीदारांना प्रवेशद्वाराजवळच रोखले. यामुळे काही वेळ शेतकर्‍यांचा माल पडून राहीला. एका शेतकर्‍याने आपली काकडीही यार्डात फेकली. वाद वाढत असल्याचे लक्षात घेता पोलिसांनाही पाचारण करण्यात आले.

जळगाव : सहा टक्के अडत व एक टक्का बाजार समिती शुल्कावरून निर्माण झालेल्या वादामुळे बाजार समितीमधील फळे व भाजीपाला मार्केटमध्ये किरकोळ खरेदीदारांनी मंगळवारी बंद पुकारला. काही खरेदीदारांनी शेतकरी व इतर ठिकाणाहून आलेल्या खरेदीदारांना प्रवेशद्वाराजवळच रोखले. यामुळे काही वेळ शेतकर्‍यांचा माल पडून राहीला. एका शेतकर्‍याने आपली काकडीही यार्डात फेकली. वाद वाढत असल्याचे लक्षात घेता पोलिसांनाही पाचारण करण्यात आले.
नंतर किरकोळ खरेदीदारांची बाजार समिती प्रशासनाने समजूत घातली. थेट खरेदी विक्री व्हावी यासाठी बाजार समिती प्रशासनाने शेतकरी व किरकोळ खरेदीदार यांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली. बाजार समितीमध्ये अडतदार व खरेदीदार किंवा किरकोळ व्यापारी यांच्यात सहा टक्के अडत आणि एक टक्का बाजार समिती शुल्कावरून सोमवारी वाद झाल्याचे पडसाद मंगळवारीही उमटले.

खरेदी-विक्री न करण्याचा निर्णय
फळे व भाजीपाला मार्केटमध्ये सकाळीच शेतकर्‍यांनी आपला शेतमाल आणला. परंतु आपण शेतमाल खरेदी करणार नाही. जे शेतकरी व किरकोळ खरेदीदार मार्केटमध्ये जाण्याचा प्रयत्न करीत होते त्यांना काही किरकोळ खरेदीदार अडवित होते. सहा टक्के अडत कमी करा, अशी मागणी काही खरेदीदारांनी केली व फळे आणि भाजीपाला मार्केटचे प्रवेशद्वार बंद केले. बाजार समिती प्रशासनाने लागलीच पोलिसांना बोलावले. नंतर किरकोळ खरेदीदार नरमले व ते यार्डात भाजीपाला खरेदीसाठी तयार झाले.

५०० क्विंटल भाजीपाल्याची विक्री
फळे व भाजीपाला मार्केट यार्डात शेतकरी व किरकोळ खरेदीदार थेट सौदे करू शकतात. त्यांनी थेट खरेदी विक्री केली तर शुल्काची गरज नाही. त्यांच्या वाहनांकडूनही कोणताही कर आकारला जाणार नाही, असे सांगितले. सुमारे १० ते १२ कर्मचारी बाजार समिती प्रशासनाकडून आले. यानंतर यार्डात शेतकरी व किरकोळ खरेदीदार किंवा व्यापारी यांच्यात सौदे झाले. सुमारे ५०० क्विंटल भाजीपाल्याची खरेदी व विक्री नंतर झाली.

काही शेतकरी वैतागले
बाजार समितीमध्ये सुरू असलेल्या गोंधळामुळे शेतकरी वैतागले. एका शेतकर्‍याने मार्केटच्या यार्डात आपली काकडी फेकली. आम्ही घाम गाळून शेतमाल पिकवितो, परंतु त्याला मोल नाही, असे काही शेतकरी म्हणाले.

सहा टक्के अडत व एक टक्का बाजार शुल्क सध्या वसूल केले जात आहे. खरेदीदारांनी सुरुवातीला वाद घातला. नंतर मात्र त्यांनी शेतमाल खरेदी केला.
-प्रकाश नारखेडे, सभापती, बाजार समिती