शहरं
Join us  
Trending Stories
1
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
2
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुप्रीम कोर्टाला विचारले १४ प्रश्न; नेमकं काय घडलं?
3
लष्करी जवानाकडे हेरॉईन सापडले; श्रीनगरहून पंजाबला करत होता तस्करी, अटकेमुळे खळबळ
4
हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं
5
पाकिस्तानी गर्लफ्रेंडला भेटणं भारतीय बॉयफ्रेंडच्या अंगाशी आलं! तुरुंगात कैद होऊन आता म्हणतोय...
6
शिखर धवनची कर्नल सोफिया कुरेशी यांच्यासाठी खास पोस्ट, म्हणाला- 'भारतीय मुस्लिमांना...'
7
तुम्ही भारतातूनही ऑनलाइन स्विस बँकेत खाते उघडू शकता; कशी असते प्रक्रिया? कोणते कागदपत्रे हवीत?
8
"आंबेडकर मालिकेच्या वेळेस साताऱ्यातून एक माणूस भेटायला आला अन्.." अभिनेत्याने सांगितला अंगावर काटा आणणारा किस्सा
9
Maharashtra Politics :'फडणवीसांनी डोनाल्ड ट्रम्प यांनाच कुलदैवत मानावं', संजय राऊतांची भाजपावर टीका
10
Mumbai: मेट्रो-३ च्या प्रवासात मोबाइलला 'नो नेटवर्क', प्रवाशांची उडते तारांबळ, तिकीट काढण्यासाठी मार्गदर्शक सूचना...
11
वेळ काय, तुम्ही बोलता काय...; कर्नल सोफिया यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या विजय शाहंना कोर्टाने फटकारलं
12
४० हजारांचं पॅकेज, ५ तासांची सर्जरी... हेअर ट्रान्सप्लांट करणाऱ्या अनुष्काबद्दल धक्कादायक खुलासे
13
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्यांचे फोनवर फोन
14
हेअर ट्रांसप्लांटमुळे दोघांचा मृत्यू; ही सर्जरी खरंच सुरक्षित आहे का? जाणून घ्या सविस्तर माहिती...
15
दोन्ही मुलांना मैदानात उतरवलं, भारताचंही नाव घेतलं! इम्रान खानच्या खेळीनं पाकच्या राजकारणात खळबळ  
16
रोहित शर्मा 'भलतेच काहीतरी' वाटावे असे बोलून गेला, मग लगेच असं दिलं स्पष्टीकरण (VIDEO)
17
ट्रम्प यांचं टॅरिफ लागून अवघा काही वेळही झाला नाही आणि भरला सरकारचा खजिना, कुठून आला पैसा?
18
जर एखाद्या देशाने 'Nuclear' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
19
कोंकणा सेन शर्मा घटस्फोटानंतर पुन्हा प्रेमात? ७ वर्ष लहान अभिनेत्याला डेट करत असल्याच्या चर्चा
20
Datta Upasana: जगातील एकमेव दत्तहस्त पूजास्थान; जिथे दत्त महाराजांच्या हाताचे छाप उमटले!

बैलगाडी शर्यतीवर बंदी कायम - सर्वोच्च न्यायालय

By admin | Updated: January 12, 2016 14:17 IST

सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडी शर्यतींरील बंदी कायम ठेवली आहे. मागच्या आठवडयात केंद्र सरकारने बैलगाडीच्या शर्यतीवरील बंदी उठवण्याचा निर्णय घेतला होता.

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. १२ - सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडूतील जलिकट्टू व महाराष्ट्रातल्या बैलगाडी शर्यतींवरील बंदी कायम ठेवली आहे. मागच्या आठवडयात केंद्र सरकारने खेळ, मनोरंजन, खेळांसाठी प्रशिक्षण करण्यास मनाई असलेल्या यादीमधून बैलाचे नाव वगळण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तामिळनाडूमध्ये जलिकट्टू व महाराष्ट्रातील ग्रामीण भागात अतिशय लोकप्रिय असलेल्या बैलगाडीच्या शर्यतीचा मार्ग मोकळा झाला होता. या निर्णयाला प्राणी मित्र संघटना पेटा आणि बंगळुरुतील एका अशासकीय संस्थेने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. तामिऴनाडूत जलिकट्टूला परवानही मिळावी यासाठी राजकीयदृष्ट्या प्रेरीत होऊन हा निर्णय सरकारने घेतल्याची टीका होत होती. सर्वोच्च न्यायालयाने तामिऴनाडू, महाराष्ट्र आणि केंद्र सरकारला यासंबंधी सविस्तर उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. 
परवानगी देताना केंद्र सरकारने काही अटी घातल्या होत्या.या शर्यती आखून दिलेल्या मार्गावरच घेण्यात याव्यात, तसेच त्यांची लांबी २ किलोमीटरपेक्षा जास्त नसावी. शर्यतीपूर्वी बैलांची पशुसंवर्धन विभागाच्या अधिका-यांकडून तपासणी करून घेण्यात यावी, असे निर्देश देण्यात आले होते.
या शर्यतींदरम्यान बैलांनी जोरात धावावे यासाठी, त्यांना उत्तेजन देण्यासाठी त्यांचे हाल केले जातात, असे सांगत प्राणीमित्र संघटनांनी या शर्यतींना विरोध केला होता. त्या आधारावर पूर्वी काँग्रेस सरकारने बैलगाडी शर्यतीवर बंदी घातली होती.
दरम्यान, तामिळनाडूमध्ये गावागावातून सुप्रीम कोर्टाच्या या स्थगितीला विरोध होतील अशी चिन्हे आहेत. पोंगल हा तामिळनाडूतला मुख्य उत्सव, ज्यावेळी जलिकट्टू हा खेळ खेळला जातो तो चार दिवसांवर आला आहे. त्यामुळे आता हा खेळ खेळता येईल की नाही याबद्दल साशंकता निर्माण झाली आहे. जर जलिकट्टू नाही तर मत नाही अशी भूमिका घेत, काही गावातील लोकांनी रेशन कार्ड व व्होटिंग कार्ड परत करण्याचा इशारा दिला आहे.