शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
3
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
4
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
5
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
6
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
7
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
8
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
9
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
10
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
11
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
12
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
13
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
14
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
15
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
16
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
17
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
18
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
19
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
20
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड

बैल गेला नि झोपा केला...

By admin | Updated: March 10, 2016 03:44 IST

बैल गेला नि झोपा केला...

नवी दिल्ली : नऊ हजार कोटी रुपयांहून अधिकची थकीत कर्जे वसूल करण्यासाठी उद्योगपती विजय माल्ल्या यांना देश सोडून जाण्यापासून रोखण्यासाठी सरसावलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील १७ बँकांची बुधवारी सर्वोच्च न्यायालयात ‘बैल गेला नि झोपा केला’ अशी केविलवाणी अवस्था झाली.ब्रिटनच्या दियागो उद्योगसमूहाकडून माल्ल्यांना मिळायच्या सुमारे ७५ लाख डॉलर रकमेवर (५१५ कोटी रुपये) टाच आणण्यासाठी बंगळुरू येथील कर्जवसुली न्यायाधिकरणाकडे (डीआरटी) या बँकांनी आठवडाभरापूर्वी अर्ज केला त्याच दिवशी माल्ल्या लंडनला पोहोचले होते, अशी माहिती अ‍ॅटर्नी जनरल मुकुल रोहटगी यांनी दिली. त्यावर तसे असेल तर आम्ही या प्रकरणी फारसे काही करू शकू, असे वाटत नाही, असे सूचक भाष्य न्यायालयाने केले.माल्ल्यांना देश सोडून जाण्यास मनाई करणारा अंतरिम आदेश देण्यास कर्नाटक उच्च न्यायालयाने नकार दिल्यानंतर या बँकांचे अपील घेऊन रोहटगी मंगळवारी धावत सर्वोच्च न्यायालयात आले होते. माल्ल्यांना रोखणे अत्यंत निकडीचे आहे, अशी त्यांनी गळ घातल्यावर सरन्यायाधीश न्या. टी. एस. ठाकूर यांनी हे प्रकरण लगेच आज बुधवारी सुनावणीसाठी लावण्याचे मान्य केले होते. त्यानुसारन्या. कुरियन जोसेफ व न्या. रोहिंग्टन नरिमन यांच्या खंडपीठापुढे बुधवारी सकाळी आले. ज्यांना रोखण्यासाठी तुम्ही एवढी धावाधाव करता आहात ते माल्ल्या आहेत तरी कुठे, असे न्यायालयाने विचारल्यावर, माल्ल्या लंडनमध्ये असल्याची माहिती रोहटगी यांनी दिली.हे ऐकल्यावर न्यायालयाने माल्ल्या यांना नोटीस काढली व पुढील सुनावणी ३० मार्च रोजी ठेवली. ही नोटीस माल्ल्यांवर बजावली जाईल याची खात्री करण्यासाठी ही नोटीस माल्ल्या यांची युनायटेड ब्रुअरिज होल्डिंग्ज लि. ही कंपनी, त्यांचे वकील, भारताचे ब्रिटनमधील उच्चायुक्त व माल्ल्या यांचा राज्यसभेचा अधिकृत ई-मेल अ‍ॅड्रेस यांच्यामार्फत पाठविण्याचे निर्देश दिले गेले. (माल्ल्या राज्यसभेचे सदस्य आहेत.)(लोकमत न्यूज नेटवर्क)>> विजय माल्ल्यांविरुद्ध ११ मार्चला सुनावणीमुंबई : किंगफिशर एअरलाइन्सचे अध्यक्ष विजय माल्ल्या आणि अन्य संचालकांनी कोट्यवधी रुपयांचा सेवा कर बुडवल्याने तो वसूल करण्यासंदर्भात सर्व्हिस टॅक्स विभागाने दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयाने ११ मार्च रोजी सुनावणी ठेवली आहे.सेवा कर विभागातर्फे अ‍ॅड. अद्वैत सेठना यांनी न्या. सी. व्ही भडंग यांच्यापुढे ही याचिका सादर केली. त्यावर न्या. भडंग यांनी या याचिकेवरील सुनावणी शुक्रवारी घेऊ, असे म्हटले. माल्ल्या व अन्य संचालकांनी महाराष्ट्र सरकारच्या वतीने प्रवाशांकडून सेवा कर घेतला. मात्र, त्यांनी कधीच हा कर सरकारच्या तिजोरीत जमा केला नाही. त्यामुळे त्यांच्याकडून ही रक्कम वसूल करावी लागेल, असे याचिकेत म्हटले आहे. वेगवेगळ्या आर्थिक वर्षासाठी माल्या यांना राज्य सरकारला सेवा करापोटी ३२.६८ कोटी आणि २३. ३८ कोटी रुपये देणे आहे. या संदर्भात दंडाधिकाऱ्यांपुढे केसेस दाखल करण्यात आल्या आहेत. त्यातील पहिल्या केसवर सुनावणी झाली आहे, तर दुसऱ्या केसवरील सुनावणी प्रलंबित आहे. माल्ल्या यांची एकूण थकीत ५३५ कोटी रुपयांची आहे. मात्र, त्यातील ५६.०६ कोटी रुपये थकीत असल्याचे मान्य करण्यात आले आहे. माल्ल्या खटल्यादरम्यान उपस्थित राहिले नाहीत, तर सरकारचे न भरून येणारे नुकसान होईल, असेही या याचिकेत म्हटले आहे. (प्रतिनिधी)