शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
2
"आता जगायचंच नाही! मी बायकोला त्रासलोय"; तरुणाची थेट राष्ट्रपतींकडे धाव! म्हणाला...
3
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
4
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
5
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
6
"महाराष्ट्राला आम्ही पोसतोय" म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंना चिन्मयी सुमीतचं हिंदीतून सडेतोड उत्तर, म्हणाली- "त्या खासदाराला..."
7
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
8
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
9
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
10
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
11
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
12
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
13
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
14
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
15
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
16
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
17
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
18
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
19
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
20
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन

अर्थसंकल्प गरिबांच्या बाजूचा नव्हे तर राजकीय

By admin | Updated: March 1, 2016 03:46 IST

‘नरेंद्र मोदी सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प ‘राजकीय’ असून, त्यात शेतमालाच्या किमती या महत्त्वाच्या विषयावर काहीच भाष्य नसल्यामुळे तो शेतकऱ्यांना आपला वाटणार नाही

‘नरेंद्र मोदी सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प ‘राजकीय’ असून, त्यात शेतमालाच्या किमती या महत्त्वाच्या विषयावर काहीच भाष्य नसल्यामुळे तो शेतकऱ्यांना आपला वाटणार नाही,’ अशा शब्दांत माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी टीका केली. शेतमालासाठी महत्त्वाचा असतो तो त्याला मिळणारा लाभ. गेल्या वर्षीही शेतकऱ्यांची फसवणूक झाली होती. किमतीतील संकेतामुळे शेतकऱ्यांना हुरूप येतो. शेतकऱ्यांना रास्त आणि किफायतशीर परतावा मिळत नाही, असे ते म्हणाले. कोणत्याही अंगाने हा अर्थसंकल्प गरीबांच्या बाजूने नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. हा अर्थसंकल्प म्हणजे संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए) धोरणांचा विस्तार आहे, असे ते म्हणाले.महत्त्वाच्या पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी कोणताही महत्त्वाचा पुढाकार यात नाही.यूपीएच्या योजनाच पुढे चालू ठेवल्याचा मला आनंद वाटतोय.ग्रामीण आणि सामाजिक कार्यक्रमांकडे या सरकारने गेल्या दोन वर्षांत पाठ फिरविली आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था, खासगी गुंतवणूक आणि निर्यात हे तीन विषय आमच्याकडे लक्ष द्या, म्हणून टाहो फोडताहेत.वीज, पोलाद, खाण, सिमेंट, तेल आणि वायू या महत्त्वाच्या क्षेत्रांच्या प्रश्नांची या सरकारला जाणच नाही. अनेक महत्त्वाचे प्रकल्प निराधार झाले असून, नव्याने फारच थोडी गुंतवणूक झाली आहे.निर्यातीचा कुठे उल्लेखच नाही. सलग १४ महिन्यांच्या नकारात्मक वाढीनंतर सरकारने निर्यातीच्या आघाडीवर प्रयत्न करणे सोडून दिल्याचे दिसते.विरोधकांच्या न्याय्य अशा टीकेचा सन्मान राखला जाईल, असे आश्वासन नाही. सरकार हट्ट सोडायला तयार नाही.