शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

ब्रिटनने भारताची जाहीर माफी मागावी

By admin | Updated: January 16, 2017 05:04 IST

ज्या काही वाईट गोष्टी केल्या त्याबद्दल ब्रिटनने भारताची जाहीर माफी मागून पापाचे प्रायश्चित्त घ्यावे, असे मत काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी रविवारी येथे व्यक्त केले

कोलकाता : भारतावर २०० वर्षे एक वसाहत म्हणून जुलमी शासन करताना ज्या काही वाईट गोष्टी केल्या त्याबद्दल ब्रिटनने भारताची जाहीर माफी मागून पापाचे प्रायश्चित्त घ्यावे, असे मत काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी रविवारी येथे व्यक्त केले.कोलकाता साहित्य महोत्सवाचे उद््घाटन करण्यापूर्वी थरूर स्वत:च्याच ‘अ‍ॅम इरा आॅफ डार्कनेस: दि ब्रिटिश एम्पायर इन इंडिया’ या इंग्रजी पुस्तकाविषयी बोलत होते. या पुस्तकाच्या ब्रिटिश आवृत्तीचे येत्या २ मार्च रोजी प्रकाशन व्हायचे आहे.जुलमी ब्रिटिश राजवटीचा राक्षसी कळस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जालियनवाला बाग हत्याकांडाला सन २०१९ मध्ये शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. ते औचित्य साधून साम्राज्यवादी शासक म्हणून केलेल्या अत्याचारांबद्दल प्रायश्चित्त घेण्याची ब्रिटनला नामी संधी आहे,असे सांगून थरूर म्हणाले की, त्यावेळी ब्रिटनच्या पंतप्रधानांनी किंवा तेथील राजघराण्यातील सदस्याने भारतात येऊन केवळ जालियनवाला हत्याकांडाबद्दलच नव्हे तर एकूणच साम्राज्याच्या शासनकाळात केल्या गेलेल्या कृष्णकृत्यांबद्दल भारतीय नागरिकांची मनापासून माफी मागावी.थरूर म्हणाले की, भारत आणि अन्य वसाहतींमधून ब्रिटिश साम्राज्याने जी लूट केली ती केली गेली नसती तर आज लंडन जसे दिसते तसे दिसलेही नसते. या लुटीची रास्त मोजदाद करता येणार नाही व कोणतीही रक्कम तिची भरपाई करण्यासाठी पुरेशी ठरणार नाही.अशा प्रकारे माफी मागून झालेल्या चुकांची कबुली दिली की मने साफ होतील आणि भारत व ब्रिटनचे संबंध खऱ्या अर्थी दोन सार्वभौम देशांमधील संबंध म्हणून आकाराला येतील, तोपर्यंत या संबंधांना साम्राज्य आणि वसाहत या ऐतिहासिक संबंधांची झालर कायम राहील, असे ते म्हणाले.थरूर म्हणाले की, ब्रिटनचे आजवरचे वागणे नेमके याच्या उलट असल्याचे दिसते. साम्राज्यशाहीचा कटु इतिहास दडपून टाकण्याची ब्रिटिशांची प्रवृत्ती दिसते. इतिहासाला सामोरे जाण्याची त्यांची तयारी नाही. उलट ब्रिटिश इतिहासकार साम्राज्याचे गोडवे गाताना दिसतात. (वृत्तसंस्था)>कॅनडाचे अनुकरण कराया संदर्भात थरूर यांनी कॅनडाचे तरुण पंतप्रधान जस्टिन त्रुदेऊ यांचे उदाहरण दिले व सन १९१४ च्या कोमागाता मारु घटनेबद्दल त्यांनी जाहीर माफी मागितल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.