इंदूर : गुजरातमधील सरदार सरोवर धरणाची उंची सुमारे 17 मीटरने वाढविण्याच्या नर्मदा नियंत्रण प्राधिकरण(एनसीए)च्या निर्णयाविरुद्ध नर्मदा बचाओ आंदोलनाने पुन्हा एकदा मांड ठोकली आह़े पुनर्वसन आणि पर्यावरणाच्या अटींची पूर्तता न करता या वादग्रस्त धरणाची उंची वाढविण्याची तयारी सुरू असल्याचा आरोप आंदोलनाच्या प्रणोत्या मेधा पाटकर यांनी केला आह़े
येथील एका वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली़ नर्मदा नदीवरील सरदार सरोवर धरणाची उंची वाढविण्याचा निर्णय कुठल्याही कायदेशीर सल्लामसलीतीशिवाय घाईघाईने घेतलेला निर्णय आह़े
या मुद्यावर नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान नाही, तर गुजरातचे मुख्यमंत्री असल्यासारखे वागले, असे मेधा म्हणाल्या़ मध्यप्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्राच्या सुमारे 48 हजार विस्थापित कुटुंबांतील सुमारे अडीच लाख लोकांचे पुनर्वसन अद्यापही बाकी आह़े
धरण निर्मितीशी संबंधित पर्यावरणाच्या सर्व अटींची अद्यापही पूर्तता झालेली नाही, असा दावा त्यांनी केला़ (वृत्तसंस्था)