शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

निवडणूक प्रक्रियेने स्वच्छतागृहांना ब्रेक

By admin | Updated: February 15, 2017 20:34 IST

अमरावती : २१ फेब्रुवारी रोजी होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीमुळे अनेक विकासकामासह अन्य प्रक्रिया थंडबस्त्यात पडल्या आहे.

अमरावती : २१ फेब्रुवारी रोजी होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीमुळे अनेक विकासकामासह अन्य प्रक्रिया थंडबस्त्यात पडल्या आहे. आयुक्तांपासून लिपिकांपर्यंत अर्धीअधिक यंत्रणा निवडणूक प्रक्रियेत व्यस्त असल्याने घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या कार्यान्वयनासह स्वच्छ भारत अभियानाचे काम रखडले आहे. राज्य शासनाने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत महापालिका व नगरपालिकांना ३१ मार्च २०१७ ची डेडलाईन दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आकारास आलेल्या या योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी महापालिका आयुक्त, मुख्याधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांकडे आहे. मात्र तूर्तास महापालिका आयुक्तांकडे ८७ सदस्यांच्या सार्वधिक निवडणुकीची जबाबदारी आहे. दोन्ही उपायुक्त, सहायक आयुक्तांकडे सहनिवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अन्य जबाबदारी आहे. याशिवाय ही निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी आचारसंहिता कक्षासह विविध पथकांचे कार्यान्वयन करण्यात आलेत. यात विविध अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. याशिवाय प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेसाठीही शेकडो महापालिका कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याने वैयक्तिक शौचालयांची कामाची प्रगती मंदावली आहे. त्यामुळे ३ हजारांहून अधिक वैयक्ति शौचालयांची बांधणीची जबाबदारी स्वास्थ्य निरीक्षक व ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षकांवर येऊन ठेपली आहे. मात्र अपवाद वगळता हे कर्मचारी स्वच्छतागृहाच्या उभारणीकडे लक्ष देत असल्याने उर्वरित दीड महिन्यात वैयक्तिक शौचालय उभारण्याचा लक्ष्यांक गाठण्याचे अशक्यप्राय आव्हान अतिरिक्त आयुक्त सोमनाथ शेटे यांना पेलायचे आहे. (प्रतिनिधी)