शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : जम्मूमध्ये अलर्ट, जोधपूरमध्ये शाळा बंद! सीमेवर लष्कर सतर्क; हवाई संरक्षण युनिट्स सक्रिय केल्या
2
“भारत-पाकने संयम राखावा”; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर रशियाशी युद्ध करत असलेल्या युक्रेनचे आवाहन
3
"हम अल्लाह की कसम खाते है...."; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर अल कायदाची भारताला धमकी
4
Operation Sindoor: भारताचा एक घाव अन् उरले भग्न अवशेष! मसूद अजहरच्या अड्ड्याचे सॅटेलाईट फोटो
5
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
6
भारत, पाकिस्तानात जाऊ नका; अमेरिका, चीनसह बड्या देशांनी दिल्या नागरिकांना सूचना
7
Asim Munir Net Worth: रियल इस्टेट, बँक, डेअरी... कंगाल पाकिस्तानचे सेना प्रमुख १०० कंपन्यांचे CEO; किती आहे संपत्ती?
8
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
9
मनसेशी युती केली तर उद्धवसेनेला बळ? ठाकरेंना शह देणे महायुतीला जाईल जड; राजकीय गणिते बदलणार
10
कोहलीने दिला हात, अनुष्का थेट दुर्लक्ष करुन पुढे गेली; 'विरुष्का'चा बंगळुरुमधील Video व्हायरल
11
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळेल ₹८९,९८९ चं फिक्स व्याज; मिळेल सरकारची गॅरेंटी
12
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
13
"मला ही भूमिका साकारायची...", आमिर खानने दिली 'महाभारत' प्रोजेक्टची हिंट, सुरु करणार काम
14
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
15
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
16
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
17
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
18
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
19
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!

भाजपा आणि मोदी सरकार दोघेही ‘दुतोंडी’

By admin | Updated: December 2, 2014 08:58 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार हे दुतोंडी पक्षाचे सरकार आहे. भाजपा विरोधी पक्षात असताना एक बोलते आणि सत्तेत आल्यावर त्याच्या अगदी उलट बोलते.

शीलेश शर्मा, नवी दिल्लीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार हे दुतोंडी पक्षाचे सरकार आहे. भाजपा विरोधी पक्षात असताना एक बोलते आणि सत्तेत आल्यावर त्याच्या अगदी उलट बोलते. भाजपाच्या उक्ती आणि कृतीत मोठा विरोधाभास आहे. खऱ्या अर्थाने हे ‘यू टर्न’ सरकार आहे, असा घणाघाती आरोप करीत काँग्रेसने सोमवारी मोदी सरकारवर हल्लाबोल केला.काँग्रेसचे सरचिटणीस अजय माकन यांनी ‘सहा महिने पार, यू टर्न सरकार’ मथळ्याखाली एक पुस्तिका प्रकाशित करून भाजपा आणि मोदी सरकारवर आरोपांच्या फैरी झाडल्या. मोदी आणि त्यांच्या सरकारने सत्तेत आल्यापासून ज्या मुद्द्यांवर घूमजाव केलेले आहे, असे एकूण २२ मुद्दे या पुस्तिकेत उपस्थित करण्यात आले आहेत. मागच्या तीन दिवसांतच असे तीन मुद्दे पुढे आले आहेत, की ज्यावर मोदी आणि त्यांच्या पक्षाने आपली जुनी भूमिका बदलून घूमजाव केले आहे आणि काँग्रेसप्रणीत संपुआ सरकार जे काही सांगत होते, तेच आता मोदी सरकार सांगत आहे. कॅग, रेल्वे भाडेवाढ, शेतकऱ्यांना आधारभूत किंमत, गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांपासून संसदेला मुक्त करणे आदी मुद्द्यांवर मोदींनी देशाला मोठमोठे उपदेश दिले आहेत, पण आज परिस्थिती कशी आहे? शेतकऱ्यांना योग्य हमीभाव मिळत नाही. मोदी सरकारमध्ये गंभीर फौजदारी गुन्हे दाखल असलेले आणि गुन्हेगारी स्वरूपाचे खटले दाखल असलेले २१ मंत्री आहेत. हे यू टर्न नाही तर काय आहे, असा सवाल माकन यांनी केला. मोदी, त्यांचे मंत्री आणि भाजपा केवळ खोटे बोलून सत्तेत आल्याचा आरोप माकन यांनी या वेळी केला. दिल्लीत निवडणुका जवळ असल्यानेच मोदी सरकारने १९८४च्या दंगलग्रस्तांना नुकसानभरपाई देण्याची घोषणा केली आहे, असा आरोप त्यांनी केला.>विविध मुद्द्यांवर भाजपा व मोदी यांनी व्यक्त केलेले मत आणि कालांतराने त्याच मुद्द्यांवर त्यांनी कसे घूमजाव केले, हे सांगणारे प्रसंग काँग्रेसने पुस्तिकेत दिले आहेत.