नवी दिल्ली : अचानक रेल्वे प्रवास करावा लागणाऱ्या प्रवाशांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. १२ नोव्हेंबरपासून रेल्वे सुटण्यापूर्वी अर्धा तास आधी आॅनलाईन किंवा काऊंटरवरून तिकीट बुक करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे तिकीट कन्फर्म होण्याचीही शक्यता वाढणार आहे. तिकीट परत केल्यानंतर आरक्षणाची अंतिम यादी तयार करण्याच्या प्रणालीत बदल करण्यात आल्याने ही सुविधा मिळणार आहे.यामुळे अचानक रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी चांगला पर्याय उपलब्ध होईल. तसेच रेल्वेच्या कमाईतही भर पडेल. विशेष म्हणजे ट्रेनमधील रिकाम्या जागांसाठी होणारा सौदाही संपुष्टात येईल. (लोकमत न्यूज नेटवर्क)
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}