शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

दादरी हत्या ही भाजपाची पूर्वनियोजित खेळी - अखिलेश यादव

By admin | Updated: October 13, 2015 16:20 IST

दादरीमध्ये बीफ बाळगल्याच्या अफवेवरून एका मुस्लीमाची झालेली हत्या ही भाजपाची पूर्वनियोजित खेळी असल्याचा आरोप उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी केला आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १३ - दादरीमध्ये बीफ बाळगल्याच्या अफवेवरून एका मुस्लीमाची झालेली हत्या ही भाजपाची पूर्वनियोजित खेळी असल्याचा आरोप उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी केला आहे. मोहम्मद अखलाख यांची बिसारा गावामध्ये जमावाने हत्या केल्यानंतर त्याचे पडसाद देशभर उमटले. या घटनेवर एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना अखिलेश यांनी हा हल्ला उत्स्फूर्त होता यावर आपला विश्वास नसल्याचे सांगितले.
सरकारने केलेल्या तपासात आढळलेल्या तथ्यांनुसार भाजपा आणि भाजपाशी संबंधित व्यक्तिंनी अत्यंत पूर्वनियोजित पद्धतीने हा प्रकार घडवून आणल्याचे जाणवत असल्याचे अखिलेश म्हणाले.
भाजपाच्या वरीष्ठ नेत्यांना उत्तर प्रदेशातले भाजपाचे नेते काय करत आहेत, याची व्यवस्थित कल्पना असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. भाजपा उत्तर प्रदेशात धार्मिक भावना भडकावण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. लोकांचं लक्ष राजकीय मुद्यांवरून हटवण्यासाठी आणि समाजामध्ये दुफळी निर्माण करण्यासाठी भाजपा युपीमध्ये सारखे वेगळे मुद्दे उचलत असल्याचे सांगताना अखिलेश यांनी आधी लव्ह जिहाद मग धरवापसी नंतर मुरादाबादमध्ये ध्वनीवर्धक यंत्रणेविरुद्ध आक्षेप आदी उदाहरणे दिली. 
अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीची मुस्लीमांची मते मिळावी यासाठी भाजपाच्या ध्रुवीकरणाच्या प्रयत्नांना फूस असल्याचा आरोप अखिलेश यांनी फेटाळला आहे. मुझफ्फरनगरच्या दंगलीचा लाभ कुणाला झाला असा प्रतिप्रश्न करताना नंतरच्या झालेल्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये युपीमध्ये भाजपाला ७३ जागा मिळाल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. समाजवादी पार्टीला आधीच्या निवडणुकीत ३९ जागा मिळाल्या होत्या, ज्यांची संख्या ५ वर आली. उत्तर प्रदेशात तणाव निर्माण करण्याची भाजपाची योजना असल्याचा आरोप अखिलेश यादव यांनी केला आहे. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुंतवणुकीसाठी जगभरात फिरत असल्याचे सांगताना अखिलेश म्हणाले की अशा घटनांमुळे मोदींच्या प्रयत्नांना खिळ बसेल. भाजपाचे काही नेते वाट्टेल ते बोलत आहेत, त्यांच्यावर कुणाचा अंकुश आहे ते भाजपाने स्पष्ट करावे अशी मागणीही त्यांनी केली. 
बिहारच्या निवडणुकांमागोमाग काही महिन्यातच, २०१७च्या सुरुवातीला उत्तर प्रदेशात निवडणुका आहेत आणि २०१२मध्ये लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या अखिसेलश यादव यांचा कस लागणार आहे. राज्यातली कायदा व सुव्यवस्था आणि वाढता धार्मिक तणाव यामुळे त्यांच्यावर सध्या सर्व स्तरातून टीका होत आहे.