शहरं
Join us  
Trending Stories
1
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
2
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
3
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
4
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
5
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
6
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
7
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
8
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
9
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
10
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
11
Operation Sindoor Live Updates: "जर पाकिस्तानने आज रात्री शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं तर आम्ही त्याला जोरदार प्रत्युत्तर देऊ"
12
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
13
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
14
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
15
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
16
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
17
मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची 8 ग्रँम सोने व १० ग्रँम चांदीसाठी हत्या
18
Seema Haider : "तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
19
१० वर्षांच्या प्रवासानंतर, एकमेकांचे झाले, अक्षय-साधनाचा सुंदर क्षण, पाहा भावूक करणारा Video
20
तिरंगी वनडे मालिकेत टीम इंडियाचा डंका! यजमान श्रीलंकेला पराभूत करत हरमनप्रीत ब्रिगेडनं जिंकली ट्रॉफी

दादरी हत्या ही भाजपाची पूर्वनियोजित खेळी - अखिलेश यादव

By admin | Updated: October 13, 2015 16:20 IST

दादरीमध्ये बीफ बाळगल्याच्या अफवेवरून एका मुस्लीमाची झालेली हत्या ही भाजपाची पूर्वनियोजित खेळी असल्याचा आरोप उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी केला आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १३ - दादरीमध्ये बीफ बाळगल्याच्या अफवेवरून एका मुस्लीमाची झालेली हत्या ही भाजपाची पूर्वनियोजित खेळी असल्याचा आरोप उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी केला आहे. मोहम्मद अखलाख यांची बिसारा गावामध्ये जमावाने हत्या केल्यानंतर त्याचे पडसाद देशभर उमटले. या घटनेवर एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना अखिलेश यांनी हा हल्ला उत्स्फूर्त होता यावर आपला विश्वास नसल्याचे सांगितले.
सरकारने केलेल्या तपासात आढळलेल्या तथ्यांनुसार भाजपा आणि भाजपाशी संबंधित व्यक्तिंनी अत्यंत पूर्वनियोजित पद्धतीने हा प्रकार घडवून आणल्याचे जाणवत असल्याचे अखिलेश म्हणाले.
भाजपाच्या वरीष्ठ नेत्यांना उत्तर प्रदेशातले भाजपाचे नेते काय करत आहेत, याची व्यवस्थित कल्पना असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. भाजपा उत्तर प्रदेशात धार्मिक भावना भडकावण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. लोकांचं लक्ष राजकीय मुद्यांवरून हटवण्यासाठी आणि समाजामध्ये दुफळी निर्माण करण्यासाठी भाजपा युपीमध्ये सारखे वेगळे मुद्दे उचलत असल्याचे सांगताना अखिलेश यांनी आधी लव्ह जिहाद मग धरवापसी नंतर मुरादाबादमध्ये ध्वनीवर्धक यंत्रणेविरुद्ध आक्षेप आदी उदाहरणे दिली. 
अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीची मुस्लीमांची मते मिळावी यासाठी भाजपाच्या ध्रुवीकरणाच्या प्रयत्नांना फूस असल्याचा आरोप अखिलेश यांनी फेटाळला आहे. मुझफ्फरनगरच्या दंगलीचा लाभ कुणाला झाला असा प्रतिप्रश्न करताना नंतरच्या झालेल्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये युपीमध्ये भाजपाला ७३ जागा मिळाल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. समाजवादी पार्टीला आधीच्या निवडणुकीत ३९ जागा मिळाल्या होत्या, ज्यांची संख्या ५ वर आली. उत्तर प्रदेशात तणाव निर्माण करण्याची भाजपाची योजना असल्याचा आरोप अखिलेश यादव यांनी केला आहे. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुंतवणुकीसाठी जगभरात फिरत असल्याचे सांगताना अखिलेश म्हणाले की अशा घटनांमुळे मोदींच्या प्रयत्नांना खिळ बसेल. भाजपाचे काही नेते वाट्टेल ते बोलत आहेत, त्यांच्यावर कुणाचा अंकुश आहे ते भाजपाने स्पष्ट करावे अशी मागणीही त्यांनी केली. 
बिहारच्या निवडणुकांमागोमाग काही महिन्यातच, २०१७च्या सुरुवातीला उत्तर प्रदेशात निवडणुका आहेत आणि २०१२मध्ये लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या अखिसेलश यादव यांचा कस लागणार आहे. राज्यातली कायदा व सुव्यवस्था आणि वाढता धार्मिक तणाव यामुळे त्यांच्यावर सध्या सर्व स्तरातून टीका होत आहे.