शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाचा टक्का कमी

By admin | Updated: May 22, 2016 03:04 IST

नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांतून काँग्रेसच्या हातातून आसाम आणि केरळ ही राज्ये गेली असली आणि भाजपला आसामची सत्ता मिळाली

मुंबई/नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांतून काँग्रेसच्या हातातून आसाम आणि केरळ ही राज्ये गेली असली आणि भाजपला आसामची सत्ता मिळाली असली तरी प्रत्यक्षात २0१४ च्या तुलनेत यंदा भाजपच्या मतांमध्ये घट झाल्याचे आणि काँग्रेसची मते काही प्रमाणात वाढली असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.केरळ आणि आसाम या दोन राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता होती. ती दोन्ही राज्ये काँग्रेसकडून गेली. केरळमध्ये डाव्या आघाडीच्या, तर आसामात भारतीय जनता पक्षाचा विजय झाला. याउलट पुडुच्चेरी, ज्या अत्यंत लहान राज्यात रंगासामी काँग्रेस सत्तेवर होती, ते काँग्रेसकडे आले. बाकी पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये सत्ता परिवर्तन झालेच नाही. असे असले तरी यावेळी निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये भाजपापेक्षा काँग्रेसचे अधिक आहेत. ज्या केरळमध्ये काँग्रैसचा पराभव झाला, तिथे काँग्रेसचे २८ तर भाजपाचा एकच उमेदवार विजयी झाला. आसाममध्ये भाजपाला सत्ता मिळाली. तिथे भाजपाचे ६0 आणि काँग्रेसचे २६ उमेदवार निवडून आले. पुडुच्चेरीमध्ये काँग्रेसचे १५ जण निवडून आले. तिथे भाजपाने उमेदवारच उभे केले नव्हते. पश्चिम बंगालमध्ये भाजपाच्या वाट्याला ३, तर काँग्रेसच्या वाट्याला ४४ जागा आल्या. तामिळनाडूमध्ये काँग्रेसचे ८ जण विजयी झाले, पण भाजपला तिथे खातेही उघडता आले नाही.म्हणजेच भाजपला या निवडणुकीत भाजपचे ६४ उमेदवारच निवडून आले. त्यातही ६0 एकट्या आसाममध्ये. तामिळनाडू आणि पुडुच्चेरीमध्ये भाजपाला प्रतिनिधीत्वही नाही. केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये मिळून एका हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच उमेदवार विजयी झाले. > 05राज्यांतील विधानसभेच्या ८२२ जागा होत्या आणि भाजपाने ६६१ उमेदवार रिंगणात उतरवले. विजयी उमेदवारांचे प्रमाण सुमारे १0 ते ११ टक्के आहे. काँग्रेसचे याच राज्यांत मिळून ३४१ उमेदवार उभे होते. त्यापैकी १२२ उमेदवार निवडून आले. याचा अर्थ निवडून आलेल्या उमेदवारांचे प्रमाणही २८ ते ३0 टक्क्यांच्या दरम्यान आहे.> पक्षीय बलाबलराज्यजागाभाजपाकाँग्रेसकेरळ140141(यूडीएफ)प. बंगाल294344आसाम1266026तामिळनाडू23208पुडुच्चेरी30015एकूण82264140