शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदारांना देण्यासाठी साडेपाच कोटी ठेवले रुम नं. 102मध्ये, अनिल गोटेंनी ठोकले कुलूप; संजय राऊत सरकारवर भडकले
2
IPL 2025 : मुंबईकरांसमोर दिल्लीकरांची डाळ नाही शिजली! MI नं थाटात मारली प्लेऑफ्समध्ये एन्ट्री
3
'काम करा नाहीतर निलंबित होण्यासाठी तयार रहा', मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचा अधिकाऱ्यांना इशारा
4
ती म्हणाली होती की,... 'मॅन ऑफ द मॅच' वेळी सूर्या भाऊला आली बायकोची आठवण
5
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
6
अजित पवारांची राष्ट्रवादी 'शक्ति स्थळा'वरून फुंकणार रणशिंग! साताऱ्यात मेळावा
7
IPL 2025 : कुलदीप यादवची 'सेंच्युरी'; मोडला हरभजन सिंगचा विक्रम
8
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
9
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
10
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
11
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
12
MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी
13
लातुरात लॉजवरच सुरू होता वेश्या व्यवसाय; पोलिसांची धाड, दोन महिलांची सुटका; सात जणांना अटक
14
Thane: रस्त्याच्या कडेला लघुशंका करताना विजेच्या तारेला स्पर्श, १७ वर्षीय मुलाचा दुर्देवी अंत
15
Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप
16
Mumbai: कधीही कोसळण्याची भीती! 'या' आहेत मुंबईतील अतिधोकायदायक इमारती, पहा संपूर्ण यादी
17
Mumbai: वाडिया रुग्णालयाला मोठं यश, झिपर स्टॉपर गिळलेल्या १० महिन्याच्या बाळाला वाचवलं!
18
'मुंबईचा राजा' नावासह छापलेल्या खास जर्सीसह रोहितचा सन्मान; MI नं चाहत्यांनाही केलं खुश
19
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
20
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव

भाजपाचा टक्का कमी

By admin | Updated: May 22, 2016 03:04 IST

नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांतून काँग्रेसच्या हातातून आसाम आणि केरळ ही राज्ये गेली असली आणि भाजपला आसामची सत्ता मिळाली

मुंबई/नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांतून काँग्रेसच्या हातातून आसाम आणि केरळ ही राज्ये गेली असली आणि भाजपला आसामची सत्ता मिळाली असली तरी प्रत्यक्षात २0१४ च्या तुलनेत यंदा भाजपच्या मतांमध्ये घट झाल्याचे आणि काँग्रेसची मते काही प्रमाणात वाढली असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.केरळ आणि आसाम या दोन राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता होती. ती दोन्ही राज्ये काँग्रेसकडून गेली. केरळमध्ये डाव्या आघाडीच्या, तर आसामात भारतीय जनता पक्षाचा विजय झाला. याउलट पुडुच्चेरी, ज्या अत्यंत लहान राज्यात रंगासामी काँग्रेस सत्तेवर होती, ते काँग्रेसकडे आले. बाकी पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये सत्ता परिवर्तन झालेच नाही. असे असले तरी यावेळी निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये भाजपापेक्षा काँग्रेसचे अधिक आहेत. ज्या केरळमध्ये काँग्रैसचा पराभव झाला, तिथे काँग्रेसचे २८ तर भाजपाचा एकच उमेदवार विजयी झाला. आसाममध्ये भाजपाला सत्ता मिळाली. तिथे भाजपाचे ६0 आणि काँग्रेसचे २६ उमेदवार निवडून आले. पुडुच्चेरीमध्ये काँग्रेसचे १५ जण निवडून आले. तिथे भाजपाने उमेदवारच उभे केले नव्हते. पश्चिम बंगालमध्ये भाजपाच्या वाट्याला ३, तर काँग्रेसच्या वाट्याला ४४ जागा आल्या. तामिळनाडूमध्ये काँग्रेसचे ८ जण विजयी झाले, पण भाजपला तिथे खातेही उघडता आले नाही.म्हणजेच भाजपला या निवडणुकीत भाजपचे ६४ उमेदवारच निवडून आले. त्यातही ६0 एकट्या आसाममध्ये. तामिळनाडू आणि पुडुच्चेरीमध्ये भाजपाला प्रतिनिधीत्वही नाही. केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये मिळून एका हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच उमेदवार विजयी झाले. > 05राज्यांतील विधानसभेच्या ८२२ जागा होत्या आणि भाजपाने ६६१ उमेदवार रिंगणात उतरवले. विजयी उमेदवारांचे प्रमाण सुमारे १0 ते ११ टक्के आहे. काँग्रेसचे याच राज्यांत मिळून ३४१ उमेदवार उभे होते. त्यापैकी १२२ उमेदवार निवडून आले. याचा अर्थ निवडून आलेल्या उमेदवारांचे प्रमाणही २८ ते ३0 टक्क्यांच्या दरम्यान आहे.> पक्षीय बलाबलराज्यजागाभाजपाकाँग्रेसकेरळ140141(यूडीएफ)प. बंगाल294344आसाम1266026तामिळनाडू23208पुडुच्चेरी30015एकूण82264140