शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाचे मिशन यूपी!

By admin | Updated: June 14, 2016 04:55 IST

आसाम विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर भाजपाने देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशची सत्ता मिळवण्याच्या दृष्टीने पावले टाकायला सुरुवात केली आहे.

अलाहाबाद : आसाम विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर भाजपाने देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशची सत्ता मिळवण्याच्या दृष्टीने पावले टाकायला सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी हे मिशन उत्तर प्रदेशच असून, अलाहाबादमधील राष्ट्रीय कार्यकारिणीच्या निमित्ताने त्यावर शिक्कामोर्तबच करण्यात आले आहे. कार्यकारिणीच्या बैठकीनंतर झालेल्या जाहीर सभेत नरेंद्र मोदी यांनी मिशन उत्तर प्रदेशची जणू अधिकृत घोषणा व सुरुवातच केली. या सभेत मोदी म्हणाले की, उत्तर प्रदेशनेच भाजपाला केंद्राची सत्ता दिली. ते ऋण फेडण्यासाठी आम्हाला उत्तर प्रदेशला विकासाच्या मार्गावर न्यायचे आहे. येथील भ्रष्टाचार, वशिलेबाजी आणि गलिच्छ राजकारण संपवण्याची इच्छा आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत येथील जनतेने आम्हाला सत्ता दिली, तरच हे शक्य होईल. याच राज्याने देशाला पंतप्रधान आणि गृहमंत्री दिले आहेत. पाच वर्षांत इथे बदल घडवून दाखवू. तो क़रून दाखवला नाही, तर आम्हालाही लाथ मारून दूर करा. पण आधी संधी द्या. (वृत्तसंस्था)उत्तर प्रदेशही विकासाच्या मार्गावर नेऊ- समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांना पाळीपाळीने सत्ता देण्याचे येथील जनतेने बंद करा. राज्यात धर्मांधता, जातीयता वाढविणाऱ्या पक्षांना स्थान असता कामा नये. - भ्रष्टाचार व वशिलेबाजी संपल्याशिवाय राज्य विकासाकडे वाटचाल करू शकणार नाही. त्यासाठी आम्हाला सत्ता द्या. आम्ही गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र या राज्यांना जसे विकासाच्या मार्गावर नेले, तसेच इथेही करून दाखवू.हाताला मिळेल काम!केंद्राच्या अनेक योजनांचा उल्लेख करीत मोदी यांनी सांगितले की, आमचे सरकार आल्यानंतरच परकीय गंगाजळीमध्ये वाढ झाली, जे साठ वर्षांत झाले नव्हते, ते आम्ही अवघ्या दोन वर्षांत करून दाखवले आहे. उत्तर प्रदेश मागे राहण्यास सपा आणि बसपाच कारणीभूत आहेत. प्रादेशिक, संकुचित वृत्तीने उत्तर प्रदेश पुढे जाणार नाही. त्यांना घरी बसवून भाजपाकडे सत्तेची सूत्रे दिल्यास कृषी, उद्योग क्षेत्रांत राज्य पुढे जाईल आणि बेरोजगारांनाही मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल.