शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

आसाम अशांत करण्याचं भाजपाचं षडयंत्र - मुख्यमंत्री तरूण गोगोई

By admin | Updated: December 9, 2015 16:40 IST

आसाममध्ये कायदा व सुव्यवस्थेची समस्य निर्माण करण्याचं आणि राष्ट्रपती राजवट लागू करण्याचं षडयंत्र भाजपा रचत असल्याचा आरोप मुख्यमंत्री तरूण गोगोई यांनी केला आहे

ऑनलाइन लोकमत
गुवाहाटी, दि. ९ - आसाममध्ये कायदा व सुव्यवस्थेची समस्य निर्माण करण्याचं आणि राष्ट्रपती राजवट लागू करण्याचं षडयंत्र भाजपा रचत असल्याचा आरोप मुख्यमंत्री तरूण गोगोई यांनी केला आहे. मोदी सरकारने दिलेली वचने पूर्ण करण्यात आलेले अपयश झाकण्यासाठी आजच्या दिसपूर घेरावचे आयोजन करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. 
पत्रकारांशी बोलताना गोगोई म्हणाले की, राज्यामध्ये धार्मिक तणाव निर्माण करण्याचा भाजपाचा प्रयत्न असून मंदीरामध्ये बीफ ठेवण्याचं कारस्थान रचण्यात आलं होतं अशी गुप्तचरांची माहिती आहे. कट्टरतावाद्यांना, ज्यामध्ये बंडखोर आणि जिहादी यांचा समावेश आहे, अशांना भाजपा प्रोत्साहन देत असल्याचा आरोप गोगोईंनी केला आहे. 
भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, हिंदू सेना आणि अन्य संघटना कायदा व सुव्यवस्थेची समस्या निर्माण करण्यामध्ये गुंतली असल्याचे गोगोई म्हणाले. काँग्रेस येत्या महिन्यांमध्ये चांगलं काम करेल आणि भाजपाला सत्तेत येता येणार नाही या भीतीपोटी त्यांना राष्ट्रपती राजवट आणायची आहे, आणि त्यासाठीच हे षडयंत्र रचण्यात येत असल्याचा आरोप गोगोईंनी केला आहे. 
भाजपाच्या राज्यपातळीवरील नेत्यांनी काँग्रेस सरकार भ्रष्टाचारी असल्याचा आरोप करत निदर्शने केली. त्यासंदर्भात गोगोईंनी आपली भूमिका पत्रकारांसमोर मांडली.