शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा ठेवणार शिवसेनेसमोर अटी

By admin | Updated: August 6, 2014 03:06 IST

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत भाजपाने शिवसेनेसमोर अटी ठेवून जेरीस आणण्याचा घाट घातला आहे

हरीश गुप्ता - नवी दिल्ली
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत भाजपाने शिवसेनेसमोर अटी ठेवून जेरीस आणण्याचा घाट घातला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी ठरवलेल्या व्यूहरचनेनुसार भाजपा राज्यात शिवसेनेला सोबत घेऊन 5क् टक्क्यांपेक्षा कमी जागा लढणार नाही. त्याचबरोबर मुख्यमंत्रिपदाबाबतही तडजोड करायची नाही, असे त्यांनी ठरविल्याचे समजते.
मोदी आणि शाह यांच्या निकटवर्तीय सूत्रंनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील विविध नेत्यांशी व्यापक चर्चेच्या फे:या घेतल्या. फडणवीस यांनी यापूर्वी अमित शाह यांच्याशी यापूर्वीही अनेकदा चर्चा केली आहे, तसेच मोदी यांच्याशीही दोन वेळा सविस्तर चर्चा केली आहे. विशेष म्हणजे या चर्चेमध्ये पक्ष सरचिटणीस राजीव प्रताप रुडी यांच्यासह कोणत्याही केंद्रीय नेत्याला सहभागी करून घेण्यात आले नाही. तथापि, भूपृष्ठ वाहतूक व जलवाहतूकमंत्री नितीन गडकरी या निर्णय प्रक्रियेत सहभागी होते ते महाराष्ट्रातील महत्त्वाचे नेते आणि नागपूर लोकसभेचे खासदार असल्याने त्यांचाही यात सहभाग होता. 
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर मोदी-शाह-फडणवीस या त्रिमूर्तीने राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघांचा शास्त्रशुद्ध अभ्यास करून अहवाल तयार केला आहे. मोदी यांनी हिरवा कंदील दाखवल्यानंतर फडणवीस यांनी अमित शाह यांची काल भेट घेतली. या दोहोंनी सविस्तर व्यूहरचना, संभाव्य समीकरणो आणि पर्याय यांच्यावर चर्चाही केली. 
भाजपा आता महाराष्ट्रात लहान भावाची भूमिका बजावणार नाही, तसेच यापूर्वी केली तशी मुख्यमंत्रिपदाबाबत आता तडजोड करणार नाही, असेही पक्षश्रेष्ठींनी ठरवले आहे. लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेनेने 18 जागा जिंकल्या असल्या तरी त्यासाठी त्यांना मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपाचा निश्चितच फायदा झाला. त्यामुळे शिवसेनेने कोणतेही पाऊल उचलण्याआधी या वास्तवाचा विचार केला पाहिजे. शिवसेना भाजपाला 144 जागा देणो कबूल होण्यासारखे नाही; परंतु त्याचबरोबर विधानसभेच्या आखाडय़ात एकटय़ाने उतरण्याचे धाडसही दाखवण्याची शक्यता नाही. याबाबतचा अंतिम निर्णय घेण्यासाठी भाजपाने सेनेला 16 ऑगस्टची डेडलाइन दिली असल्याचेही समजते.
मोदींनी आज रात्री महाराष्ट्राच्या खासदारांना मेजवानीचे आवतन दिले आहे. या वेळी राजकीय स्थितीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. मोदी प्रत्येक राज्यातील खासदारांशी बैठका घेत आहेत, ही मेजवानी त्याचाच एक भाग आहे.
 
च्राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या युतीत या घडामोडी सुरू असतानाच सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीमध्येही शरद पवार यांना 144 जागा हव्या असल्याने घमासान सुरू आहे. 2क्क्9मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने 114 जागा लढविल्या होत्या; परंतु लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पक्षाने 3क् जागा जास्त मागितल्या आहेत. याबाबतचा निर्णय काँग्रेस लांबणीवर टाकत आहे; परंतु काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बैठक होऊन सर्वकाही मार्गी लागेल, अशी शक्यता आहे. कारण काँग्रेसला संपुआमध्ये फाटाफूट नको आहे. दुसरीकडे लोकसभा निवडणुकीनंतर उद्भवलेल्या अनिश्चिततेच्या वातावरणात राष्ट्रवादी एकला चलोरेच्या बाजूने आहे. 
च्दरम्यान, महाराष्ट्रातील ज्येष्ठ काँग्रेस नेते व राज्यसभा सदस्य खा. विजय दर्डा यांनी मंगळवारी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली. राज्यातील स्थितीबाबत विजय दर्डा यांनी सोनिया गांधी यांना या भेटीत माहिती दिली.