शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
4
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
5
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
6
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
7
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
8
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
9
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
10
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
11
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
12
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
13
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
14
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
15
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
16
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
17
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
18
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
19
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
20
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  

भाजपा, काँग्रेस कचाट्यातून मुक्त

By admin | Updated: April 3, 2016 03:50 IST

राजकीय पक्षांना परकीय कंपन्यांकडून देणग्या घेण्यास प्रतिबंध करणाऱ्या कायद्यात मोदी सरकारने पूर्वलक्षी प्रभावाने दुरुस्ती केल्याने, सत्ताधारी भारतीय जनता पार्टी व प्रमुख विरोधी

नवी दिल्ली: राजकीय पक्षांना परकीय कंपन्यांकडून देणग्या घेण्यास प्रतिबंध करणाऱ्या कायद्यात मोदी सरकारने पूर्वलक्षी प्रभावाने दुरुस्ती केल्याने, सत्ताधारी भारतीय जनता पार्टी व प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस हे या कायद्याच्या कचाट्यात सापडलेले दोन प्रमुख पक्ष त्यातून मुक्त होणार आहेत. त्याचप्रमाणे, आधी या कायद्यानुसार ‘विदेशी’ असलेल्या कंपन्या या दुरुस्तीनंतर ‘देशी’ ठरणार असल्याने, त्यांच्याकडून देणग्या घेण्याचा मार्ग सर्वच राजकीय पक्षांना व स्वयंसेवी संस्था खुला होणार आहे.परदेशांतून मिळणाऱ्या देणग्यांचे नियमन करण्यासाठी आधीच्या संपुआ सरकारने सन २०१० मध्ये ‘फॉरेन काँट्रीब्युशन (रेग्युलेशन) अ‍ॅक्ट’ हा कायदा केला. त्या कायद्याच्या कलम २(१)(जे) नुसार ज्या भारतीय कंपनीत ५० टक्क्यांहून अधिक भांडवल परकीय कंपनीने गुंतविलेले असेल, अशा कंपनीस ‘विदेशी’ कंपनी मानले गेले होते.केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी यंदाच्या अर्थसंकल्पासोबत जे वित्त विधेयक मांडले. त्यानुसार, उपयुक्त कायद्याच्या संबंधित कलमात एक नवे कलम समाविष्ट करून, ‘विदेशी’ कंपनीच्या व्याख्येत सुधारणा केली गेली. त्यानुसार, आता एखाद्या भारतीय कंपनीत परकीय भागभांडवल ५० टक्क्यांहून जास्त असेल, पण ही भांडवल गुंतवणूक त्या क्षेत्रासाठी सरकारने ठरविलेल्या विदेशी गुंतवणुकीच्या कमाल मर्यादेत असेल, तर अशी कंपनी ‘विदेशी’ नव्हे, तर ‘देशी’ मानली जाईल. ही दुरुस्ती मूळ कायदा ज्या दिवसापासून लागू झाला, त्या दिवसापासून म्हणजे २६ सप्टेंबर २०१० पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणारी आहे.‘वेदान्त’ या लंडनस्थित बहुराष्ट्रीय कंपनीच्या भारतीय कंपनीकडून मिळालेल्या देणग्यांमुळे काँग्रेस व भारतीय जनता पार्टी हे देशातील दोन प्रमुख राजकीय पक्ष वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. प्रकरण कोर्टात गेले, तेव्हा दिल्ली उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने मार्च २०१४ मध्ये केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगास असा आदेश दिला होता की, या दोन पक्षांना वेदान्तच्या भारतीय उपकंपन्यांकडून मिळालेल्या देणग्यांचा फेरआढावा घेऊन, सहा महिन्यांत योग्य ती कारवाई केली जावी.याविरुद्ध केंद्र सरकारने केलेले अपील सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे, तसेच राजकीय पक्ष व स्वयंसेवी संस्थांना मिळणाऱ्या विदेशी देणग्या व त्यांचे संभाव्य दुष्परिणाम या विषयीची एक जनहित याचिकाही सर्वोच्च न्यायालयात आहे. अशा वेळी सरकारने आता ही पूर्वलक्षी कायदादुरुस्ती केल्याने, भाजपा व काँग्रेस हे दोन पक्ष कायद्याच्या कचाट्यातून सुटणार आहेत, तसेच इतरांचा मार्गही त्यामुळे खुला होणार आहे. (विशेष प्रतिनिधी)स्वयंसेवी संस्थांचा ससेमिरायाच कायद्याचा आधार घेत, केंद्रीय गृहमंत्रालयाने मध्यंतरी फोर्ड फाउंडेशन, ग्रीनपीस यासारख्या प्रतिष्ठित स्वयंसेवी संस्थांना कथित उल्लंघनाबद्दल नोटिसा काढल्या होत्या. त्या वेळी सरकार या कायद्याचा राजकीय अस्त्र म्हणून वापर करून, स्वयंसेवी संस्थांच्या मागे ससेमिरा लावत असल्याची टीका झाली होती, पण आता सरकारने ही कायदादुरुस्ती केल्याने, या टिकेला वेगळेच वळण मिळण्याची चिन्हे आहेत.