शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

बिस्मिल्ला खान यांच्या सनया नातवाने चोरल्या!

By admin | Updated: January 11, 2017 04:12 IST

सनईचे जादूगार भारत रत्न बिस्मिल्ला खान यांच्या महिन्यापूर्वी चोरील्या गेलेल्या चार चांदीच्या व एक लाकडी अशा एकूण पाच सनया त्यांच्या नातवानेच चोरल्याचे उघड झाले

वाराणसी : सनईचे जादूगार भारत रत्न बिस्मिल्ला खान यांच्या महिन्यापूर्वी चोरील्या गेलेल्या चार चांदीच्या व एक लाकडी अशा एकूण पाच सनया त्यांच्या नातवानेच चोरल्याचे उघड झाले असून, पोलिसांनी या नातवाला आणि त्याच्याकडून या सनया विकत घेणाऱ्या दोन सोनारांना अटक केली आहे.या चोरीचा छडा लावण्यासाठी स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमित पाठक यांनी सांगितले की, बिस्मिल्ला खान यांचा नातू नझरे हसन उर्फ शदाब आणि शंकरलाल शेठ व त्यांचा मुलगा सुजित शेठ या दोन सोनारांना अटक करण्यात आली.पाठक म्हणाले की, नझरे हसन याने चार चांदीच्या सनया चोरल्याची कबुली दिली. या सनया वितळवून तयार केलेला एक किलो चांदीचा गोळाही हस्तगत करण्यात आला. या बदल्यात सोनाराने नझरे हसन यास १७ हजार रुपये दिले होते. बिस्मिल्ला खान यांचा मुलगा काझिम हुसैन यांच्या दालमंडी भागातील घरातून ही चोरी २९ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर दरम्यान झाल्याची तक्रार नोंदविण्यात आली होती. या पाच सनयांखेरीज खानसाहेबांना त्यांच्या चहात्यांनी दिलेली दोन सोन्याची कडी आणि इनायत खान पुरस्काराचे सन्मानचिन्हही चोरीला गेले होते. चार चांदीच्या सनया वगळून चोरीला गेलेल्या अन्य वस्तूंचा शोध घेण्यात येत आहे. चोरून वितळविण्यात आलेल्या या चार चांदीच्या सनया बिस्मिल्ला खान यांना माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव, बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव, माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल आणि मुंबईतील एक रसिक शैलेश भागवत यांनी भेट दिलेल्या होत्या. या सनया मुख्यत्वे शोभेच्या होत्या व उस्ताद त्या कधी कार्यक्रमांत वाजविण्यासाठी नेत नसत. मात्र पाचवी लाकडी सनई त्यांची खास पसंतीची सनई होती. तिला चांदीचा कर्णा होता व मुखाजवळली तिच्यावर चांदीची नक्षीदार पट्टी बसवलेली होती. दरवर्षी बिस्मिल्ला खान मुहर्रमच्या मिरवणुकीत हिच सनई वाजवायचे.ज्या महान कलावंताने सनईसारख्या मंगलवाद्यास जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवून दिगंत कीर्ति मिळवून दिली त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्याच कुटुंबातील व्यक्तीने त्यांच्या सनया चोरून त्या वितळवून टाकण्याचा नतद्रष्टेपणा करावा, याबद्दल संगीतप्रेमींमध्ये कमालीची चीड व्यक्त करण्यात येत आहे. उस्तादांच्या जन्मशताब्दी वर्षातच हे घडावे याची विशेष बोंच रसिकमनाला लागली आहे. (वृत्तसंस्था)संग्रहालय राहून गेलेबिस्मिल्ला खान हे संपूर्ण देशाचे भूषण असल्याने सरकारने त्यांना मिळालेली सन्मानचिन्हे व त्यांच्याशी संबंधित इतर निवडक वस्तू ताब्यात घेऊन त्यांचे संग्रहालय करावे, अशी मागणी त्यांचे कुटुंबीय गेली १० वर्षे करीत आहेत. या सनया, सोन्याची कडी व इनायत खान सन्मानचिन्ह चोरीला गेल्यानंतर कुटुंबाकडे आता ‘अब्बाजीं’चे भारत रत्न, पद्मश्री व अन्य काही पदके व सन्मानचिन्हे शिल्लक राहिली आहेत.