शहरं
Join us  
Trending Stories
1
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
3
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
4
वाचवा म्हणत तरुणीची कारमधून उडी, पाठलाग सुरु असतानाच थारची रिक्षाला धडक, ५ जणांचा मृत्यू
5
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
6
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
7
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
8
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
9
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
10
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
11
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
12
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
13
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
14
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
15
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
16
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
17
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
18
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
19
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
20
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?

बिहारच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा, नितीशकुमारांचा मार्ग मोकळा

By admin | Updated: February 20, 2015 11:20 IST

विश्वासदर्शक ठरावाआधीच बिहारचे मुख्यमंत्री जितनमार मांझी यांनी राजीनामा दिला आहे. विधानसभेमध्ये बहुमत सिद्ध करण्यामध्ये अपयश येणार असल्याची कल्पना आल्यामुळे

ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. २० - विश्वासदर्शक ठरावाआधीच बिहारचे मुख्यमंत्री जितनराम मांझी यांनी राजीनामा दिला आहे. विधानसभेमध्ये बहुमत सिद्ध करण्यामध्ये अपयश येणार असल्याची कल्पना आल्यामुळे त्यांनी आधीच राजीनामा दिल्याची चर्चा आहे. महादलित नेत्याचा अपमान सहन केला जाणार नाही असे सांगत भाजपाने मांझी यांना पाठिंबा घोषित केला होता. त्यापूर्वी नितीशकुमार यांनी मांझी यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. नितीशकुमार यांनी आपल्याकडे बहुमत असल्याचे सांगत मुख्यमंत्रीपदासाठी दावा केला होता. परंतु, मांझी यांनी पायउतार होण्यास नकार दिला आणि विश्वासदर्शक ठरावाच्या माध्यमातून बहुमत सिद्ध करण्याचा विडा उचलला.
मात्र, आज विधानसभेमध्ये विश्वासदर्शक ठराव होण्यापूर्वीच  मांझी यांनी राजीनामा दिल्याने त्यांच्याकडे अपेक्षित आमदारांचा पाठिंबा नसल्याचा तर्क वर्तवण्यात येत आहे. त्याचप्रमाणे मांझीच्या आडून नितीशकुमारांवर वार करण्याचा भाजपाचा प्रयत्न फसल्याचेही दिसून येत आहे. अर्थात, आम्ही केवळ मांझींच्या म्हणजेच न्यायाच्या बाजुने उभे होतो, महादलितांचा अपमान होऊ नये यासाठी मांझींना पाठिंबा देत होतो आणि हा जनता दलाचा अतर्गत मामला आहे अशी भूमिका भाजपाचे नेते शहानवाझ हुसेन यांनी मांडली आहे.
आम्ही जे सांगत होतो त्यावर शिक्कामोर्तब झाल्याची प्रतिक्रिया नितीशकुमार यांनी व्यक्त केली आहे. मांझी यांनी पूर्वीच राजीनामा द्यायला हवा होता असे सांगत आमदारांना विकत घेत घोडेबाजार करण्याचा भाजपाची योजना धुळीस मिळाल्याचेही नितीशकुमार यांनी म्हटले आहे. बिहारमध्ये वर्षभरात निवडणुका होणार असून त्यादृष्टीने येत्या काळात मुख्यमंत्री कुणाचा असेल यावर निवडणुकांचं भविष्य अवलंबून असणार आहे. त्यामुळे सध्यातरी बारतीय जनता पार्टीवर नितीशकुमार शिरजोर झाल्याचे दिसून येत आहे.
बिहारचे राजकारण गेले काही महिने ढवळून निघाले असून वर्षभरात होऊ घातलेल्या निवडणुका जिंकण्यासाठी नितीशकुमार व लालूप्रसाद यादव यांची जोडी व केंद्राचा भक्कम पाठिंबा असलेली भाजपा एकमेकांविरोधात निकरानं लढतिल अशी चिन्हे आहेत. येत्या काही काळात हे दोन्ही गट एकमेकांवर प्रचंड चिखलफेक करतील आणि बिहारचे राजकारण आणखी ढवळून निघेल याची नांदीच जितनराम मांझी प्रकरणाने वाजली आहे.
बिहारमध्ये मोठ्या प्रमाणावर असलेला महादलित मतदार मांझींच्या माध्यमातून भाजपाकडे सरकतो की तो नितीशकुमार यांच्यामागे जातो याकडेही सगळ्यांचे लक्ष असणार आहे. त्याचप्रमाणे बिहारमध्ये निवडणुका कधी घ्यायच्या, राष्ट्रपती राजवट लागू करायची का, नितिशकुमारांना मुख्यमंत्री बनण्याची संधी द्यायची का या सगळ्या प्रश्नांमध्ये राज्यपाल काय भूमिका घेतात याकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे.