शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
3
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
4
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
5
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
6
Latest Marathi News LIVE: कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे नोएडामधील सेक्टर क्र. ५९, ६० आणि ६२ मधील कारखान्यातील काम ठप्प
7
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
8
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
9
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
10
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
11
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
12
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
13
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
14
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
15
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
16
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
17
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
18
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
19
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
20
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
Daily Top 2Weekly Top 5

बिहारच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा, नितीशकुमारांचा मार्ग मोकळा

By admin | Updated: February 20, 2015 11:20 IST

विश्वासदर्शक ठरावाआधीच बिहारचे मुख्यमंत्री जितनमार मांझी यांनी राजीनामा दिला आहे. विधानसभेमध्ये बहुमत सिद्ध करण्यामध्ये अपयश येणार असल्याची कल्पना आल्यामुळे

ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. २० - विश्वासदर्शक ठरावाआधीच बिहारचे मुख्यमंत्री जितनराम मांझी यांनी राजीनामा दिला आहे. विधानसभेमध्ये बहुमत सिद्ध करण्यामध्ये अपयश येणार असल्याची कल्पना आल्यामुळे त्यांनी आधीच राजीनामा दिल्याची चर्चा आहे. महादलित नेत्याचा अपमान सहन केला जाणार नाही असे सांगत भाजपाने मांझी यांना पाठिंबा घोषित केला होता. त्यापूर्वी नितीशकुमार यांनी मांझी यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. नितीशकुमार यांनी आपल्याकडे बहुमत असल्याचे सांगत मुख्यमंत्रीपदासाठी दावा केला होता. परंतु, मांझी यांनी पायउतार होण्यास नकार दिला आणि विश्वासदर्शक ठरावाच्या माध्यमातून बहुमत सिद्ध करण्याचा विडा उचलला.
मात्र, आज विधानसभेमध्ये विश्वासदर्शक ठराव होण्यापूर्वीच  मांझी यांनी राजीनामा दिल्याने त्यांच्याकडे अपेक्षित आमदारांचा पाठिंबा नसल्याचा तर्क वर्तवण्यात येत आहे. त्याचप्रमाणे मांझीच्या आडून नितीशकुमारांवर वार करण्याचा भाजपाचा प्रयत्न फसल्याचेही दिसून येत आहे. अर्थात, आम्ही केवळ मांझींच्या म्हणजेच न्यायाच्या बाजुने उभे होतो, महादलितांचा अपमान होऊ नये यासाठी मांझींना पाठिंबा देत होतो आणि हा जनता दलाचा अतर्गत मामला आहे अशी भूमिका भाजपाचे नेते शहानवाझ हुसेन यांनी मांडली आहे.
आम्ही जे सांगत होतो त्यावर शिक्कामोर्तब झाल्याची प्रतिक्रिया नितीशकुमार यांनी व्यक्त केली आहे. मांझी यांनी पूर्वीच राजीनामा द्यायला हवा होता असे सांगत आमदारांना विकत घेत घोडेबाजार करण्याचा भाजपाची योजना धुळीस मिळाल्याचेही नितीशकुमार यांनी म्हटले आहे. बिहारमध्ये वर्षभरात निवडणुका होणार असून त्यादृष्टीने येत्या काळात मुख्यमंत्री कुणाचा असेल यावर निवडणुकांचं भविष्य अवलंबून असणार आहे. त्यामुळे सध्यातरी बारतीय जनता पार्टीवर नितीशकुमार शिरजोर झाल्याचे दिसून येत आहे.
बिहारचे राजकारण गेले काही महिने ढवळून निघाले असून वर्षभरात होऊ घातलेल्या निवडणुका जिंकण्यासाठी नितीशकुमार व लालूप्रसाद यादव यांची जोडी व केंद्राचा भक्कम पाठिंबा असलेली भाजपा एकमेकांविरोधात निकरानं लढतिल अशी चिन्हे आहेत. येत्या काही काळात हे दोन्ही गट एकमेकांवर प्रचंड चिखलफेक करतील आणि बिहारचे राजकारण आणखी ढवळून निघेल याची नांदीच जितनराम मांझी प्रकरणाने वाजली आहे.
बिहारमध्ये मोठ्या प्रमाणावर असलेला महादलित मतदार मांझींच्या माध्यमातून भाजपाकडे सरकतो की तो नितीशकुमार यांच्यामागे जातो याकडेही सगळ्यांचे लक्ष असणार आहे. त्याचप्रमाणे बिहारमध्ये निवडणुका कधी घ्यायच्या, राष्ट्रपती राजवट लागू करायची का, नितिशकुमारांना मुख्यमंत्री बनण्याची संधी द्यायची का या सगळ्या प्रश्नांमध्ये राज्यपाल काय भूमिका घेतात याकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे.