शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
2
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
3
तीन महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे सर्वोच्च न्यायालय अडचणीत, अलाहाबाद प्रकरणी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अखेर केला हस्तक्षेप
4
SBI केवळ या नंबर्सवरुन करतं ग्राहकांना फोन; अन्य कोणत्याही क्रमांवरुन कॉल आल्यास व्हा सावध, काय आहे प्रकरण?
5
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
6
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
7
'किंग कोहली' परत येतोय... ऑस्ट्रेलियाची धुलाई करण्यासाठी विराटची 'लॉर्ड्स'वर नेट प्रॅक्टिस
8
२ शेअर्सवर मिळणार २५ मोफत! 'या' ८ कंपन्या देणार बोनस शेअर्स, वाचा रेकॉर्ड डेटची माहिती
9
Share Market Opening 25 August, 2025: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; मोठ्या तेजीसह उघडले 'या' कंपन्यांचे शेअर्स
10
१७ चौकार, पाच षटकार.. १४२ धावांचा धमाका; ऑस्ट्रेलियन 'हेड'मास्तरांनी घेतली आफ्रिकेची शाळा
11
भटक्या कुत्र्यांचे प्रकरण: SC आदेशानंतर केंद्राचे राज्यांना निर्देश; ७० टक्के श्वानांचे लसीकरण अनिवार्य
12
महालक्ष्मी योगात हरितालिका व्रत २०२५: पूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त; स्वर्णगौरीची कहाणी
13
Dream 11 आता सुरू करणार 'हा' नवा बिझनेस; ऑनलाइन मनी गेमिंग बॅननंतर नव्या क्षेत्रात एन्ट्री घेण्याची तयारी
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
15
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
16
जनावरासारखी कोंबली होती माणसं; भाविकांच्या ट्रॉलीला कंटेनरची धडक, ८ मृत्यूमुखी, ४३ गंभीर जखमी
17
Wife सोबत एकत्र Post Office च्या 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
18
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
19
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
20
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?

बॉलीवूडवर मोठे संकट

By admin | Updated: February 8, 2016 04:56 IST

भारताचे सिनेजगत धर्मनिरपेक्षतेसाठी केवळ देशातच नव्हे, तर संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे; पण सध्याची स्थिती पाहता सिनेजगत गंभीर संकटात सापडल्याचे दिसते.

लोकमत स्पेशल, अनुज अलंकारभारताचे सिनेजगत धर्मनिरपेक्षतेसाठी केवळ देशातच नव्हे, तर संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे; पण सध्याची स्थिती पाहता सिनेजगत गंभीर संकटात सापडल्याचे दिसते. हे संकट केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपाच्या नेत्यांशी थेट जोडले गेले आहे, हे स्पष्ट सांगावेसे वाटते. भाजपाचे नेते दररोज बॉलीवूडच्या सिताऱ्यांना ‘लक्ष्य’ करीत असून धर्माचे राजकारण ते सिनेजगताशी जोडण्याचा प्रयत्न करीत आहेत.गेल्या वर्षी दिल्लीत सत्ता हाती घेतल्यापासून भाजपाच्या सरकारने सिनेजगताशी आपला खेळ सुरू केला आहे. या खेळाची अपेक्षाच नव्हती. मात्र या खेळाचे परिणाम आता समोर येत आहेत. सेन्सॉर बोर्ड ते पुण्यातील इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थ्यांनी केलेले आंदोलन सरकारने ज्या पद्धतीने हाताळले ते पाहता या खेळामागे सरकारच असल्याचे स्पष्ट झाले. यापूर्वीच्या सरकारांनीही या पदांवर आपल्या पसंतीचे लोक बसविले होते. पण असा तमाशा कधीही झाला नव्हता. या तमाशाशिवाय भाजपाचे नेते बॉलीवूडच्या सिताऱ्यांना ज्या पद्धतीने ‘लक्ष्य’ करीत आहेत, ती पद्धत अधिक धोकादायक आहे. सहिष्णुतेच्या मुद्द्यावरून शाहरूख खान आणि आमीर खान यांचा करण्यात आलेला अपमान त्यांच्यापेक्षा भारताच्या सिनेसृष्टीचा आणि देशाच्या सिनेजगताचा झाला. सहिष्णुतेच्या मुद्द्यावर मत व्यक्त केल्याबद्दल देशातील कोणत्याही न्यायालयाने शाहरूख किंवा आमीर खान यांना दोषी ठरविलेले नाही. उलट या दोघांना अपमानित करणाऱ्या नेत्यांना न्यायालयाने लाथाडले आहे. असे असूनही हे लोक अजून सुधारत नाहीत.भूज येथे ‘रईस’ या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असताना शाहरूख खानला विरोध करण्यात आला. हा विरोध पाहता तो एखाद्या मुद्द्याच्या आधारे नव्हे, तर शाहरूख मुस्लीम आहे म्हणून करण्यात आला. त्यातही शाहरूखचे नाव मोदी समर्थक सिताऱ्यांच्या यादीत नाही म्हणून करण्यात आला. मोदी समर्थक नसलेल्या नटाला त्याच्या धर्माच्या आधारे किंवा अन्य कोणत्याही मुद्द्यावरून त्रास दिला जाऊ शकतो हे स्पष्ट आहे. शाहरूख खान आणि आमीर खान यांची मोदी समर्थक करीत असलेली अडवणूक हे याचे जिवंत उदाहरण आहे.हे सर्व लोक फार मोठा घाणेरडा आणि वाईट खेळ खेळत आहेत. विशेष म्हणजे देशाच्या प्रतिष्ठेच्या नावाखाली हे सर्व जण लाजिरवाणा खेळ खेळत आहेत. त्यातून देशाची प्रतिष्ठा धुळीस मिळत असून त्यातून त्यांच्या हलक्या मानसिकतेचे दर्शन घडते. त्यातही देशाचे सर्वोच्च नेते आणि त्यांचा पक्ष याचा पाठपुरावा करीत आहेत ही दु:खाची बाब आहे. बॉलीवूडने यापूर्वी कधीही अशा संकटाचा सामना केला नव्हता. दिल्लीत सरकारे येतात-जातात, सरकारे बदलतात. बॉलीवूडचे चरित्र बदलण्याचे चालू असलेले प्रयत्न सर्वात धोकादायक आणि आव्हानात्मक आहेत.