शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
2
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
3
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
4
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
5
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
7
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
8
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
9
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
10
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
11
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
12
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
13
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
14
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
15
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
16
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
17
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
18
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
19
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
20
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं

नोकरशाहीत मोठे खांदेपालट

By admin | Updated: June 2, 2015 23:34 IST

अनेक महिन्यांपासून नियुक्त्यांना उशीर होत असून फायलींचा ढीग वाढून निर्णय होत नसल्याच्या बातम्यांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सगळ्या रिक्त जागा भरत

हरीश गुप्ता, नवी दिल्लीअनेक महिन्यांपासून नियुक्त्यांना उशीर होत असून फायलींचा ढीग वाढून निर्णय होत नसल्याच्या बातम्यांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सगळ्या रिक्त जागा भरत आणल्या आहेत. मोदी यांनी सोमवारी मुख्य दक्षता आयुक्त आणि मुख्य माहिती आयुक्तांची नियुक्ती केल्यानंतर दुसऱ्या दिवशी १८ मंत्रालयांमध्ये प्रशासकीय पातळीवर खांदेपालट केले.त्यात नागरी उड्डयन, अन्न आणि ग्राहक व्यवहार, खाणी, सार्वजनिक उद्योग, जलस्रोत आणि गंगा शुद्धीकरण, खते, विदेश व्यवहार आणि अन्य खात्यांचा समावेश आहे. तथापि, सगळ्यात महत्त्वाचा बदल म्हणजे स्मृती इराणी यांच्या नेतृत्वाखालील मनुष्यबळ मंत्रालयातील दोन वरिष्ठ सचिवांना हलवणे. वृंदा स्वरूप व सत्यनारायण मोहंती हे शालेय शिक्षण विभागात सचिव होते. त्यांना तेथून हलविण्यात आले आहे. या दोघांचा गेल्या अनेक महिन्यांपासून स्मृती इराणींशी संघर्ष सुरू होता व त्या दोघांनीही या मंत्रालयातून बदली मागितली होती.वृंदा स्वरूप या वरिष्ठ आयएएस अधिकारी असून त्यांना बक्षीस म्हणून अन्न व सार्वजनिक वितरण विभागाचे सचिव करण्यात आले आहे. सत्यनारायण मोहंती यांना राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे सरचिटणीस म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. सुभाषचंद्र खुंतिया आणि विनयशील ओबेरॉय यांना मनुष्यबळ विकास मंत्रालयात हलविण्यात आले आहे. ओबेरॉय हे १९७९ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी असून त्यांचेही महिला व बालविकास मंत्री मेनका गांधी यांच्याशी जमत नव्हते. ओबेरॉय यांनीही बदली मागितली होती. अनुज कुमार बिश्नाई हे जलस्रोत व गंगा शुद्धीकरण मंत्री उमा भारती यांच्या हाताखाली काम करीत होते. त्यांना खते विभागाचे सचिव करण्यात आले आहे. त्यांच्या जागी मोदी यांनी शशी शेखर यांची नियुक्ती केली आहे. मोदी यांच्यासाठी महत्त्व असलेल्या गंगा शुद्धीकरण प्रकल्पाच्या देखरेखीसाठी गेल्या १० महिन्यांत नियुक्त झालेले शशी शेखर हे तिसरे सचिव आहेत. थोडक्यात सांगायचे तर मोदी यांनी विविध मंत्रालये आणि विभागात गेल्या आठवड्यात जवळपास ५ डझन जागा भरल्या.