शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

भारत-पाक मॅचपूर्वी गायलेल्या राष्ट्रगीतासाठी बिग बींनी मानधन घेतले नाही

By admin | Updated: March 20, 2016 21:21 IST

अमिताभ बच्चन यांनी राष्ट्रगीत म्हटले होते. यानंतर सोशल मिडियात वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या. मात्र, राष्ट्रगीतासाठी एक पैसाही घेतला नसल्याचं स्पष्टीकरण अमिताभ बच्चन यांनी दिलं आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २० -  कोलकातामधील ईडन गार्डनवर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये झालेल्या मॅचपूर्वी अमिताभ बच्चन यांनी राष्ट्रगीत म्हटले होते. यानंतर सोशल मिडियात वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या. मात्र, राष्ट्रगीतासाठी एक पैसाही घेतला नसल्याचं स्पष्टीकरण अमिताभ बच्चन यांनी दिलं आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये झालेल्या टी-२० मॅचपूर्वी बॉलिवूडचे शहेनशहा अर्थात अमिताभ बच्चन यांनी आपल्या भारदस्त आवाजात राष्ट्रगीत म्हटले होते. अमिताभ बच्चन यांनी राष्ट्रगीत म्हणण्यासाठी चार कोटी रुपये घेतल्याच्या चर्चा सोशल मिडियात सुरु होत्या. पण हे वृत्त पूर्णपणे निराधार असून, राष्ट्रगीत गाण्यासाठी पैसे घेणारा माणूस हा गरीब मनाचा असतो, असेही अमिताभ बच्चन यांनी म्हटलं आहे.टीम इंडियाचा माजी कॅप्टन सौरव गांगुली यानेही अमिताभ बच्चन यांची पाठराखण केली आहे. अमिताभ यांनी अशा प्रकारचं कोणतही मानधन घेतलं नव्हत असं स्पष्टीकरण बंगाल क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष सौरव गांगुली याने दिलं आहे. 
एवढेच नाही तर, अमिताभ यांनी कोलकात्यात येण्यासाठीही स्वतःच्या खिशातून चार्टर्ड प्लेनचं भाडं भरलं. तसेच कोलकात्यात त्यांच्यासाठी हॉटेलचीही व्यवस्था केली होती. पण त्या सगळ्या खर्चाला फाटा देत अमिताभ हे थेट मैदानावर आले असेही गांगुली म्हणाला.