शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! आनंदराज आंबेडकरांची एकनाथ शिंदेंना साथ; शिंदेसेना-रिपब्लिकन सेनेच्या युतीची घोषणा
2
बाबर क्रूर, अकबर सहिष्णू तर औरंगजेब मंदिर पाडणारा', NCERT ने पुस्तकात केले मोठे बदल
3
लँडिंगसाठी जागाच मिळेना, एकाच वेळी १७३ प्रवाशांचा जीव होता धोक्यात; इंडिगोच्या पायलटने 'अशी' दाखवली हुशारी!
4
गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेने कसे कमावले पैसे, भारतात स्थायिक होण्याचे कारणही सांगितले
5
मुलाच्या हव्यासापोटी जन्मदाता बापच झाला हैवान; ७ वर्षांच्या लेकीला कालव्यात फेकून मारलं
6
Chaturmas 2025: चातुर्मासात गुरुवारपासून सुरू करा दत्तबावनी, फक्त पाळा 'हे' नियम!
7
एकटे PM मोदीच आठवड्याला १०० तास काम करतात; '७० तास'वरून ट्रोल झालेल्या नारायण मूर्तींचं प्रशस्तीपत्रक
8
गुवाहाटीची रहीमा सोनमपेक्षाही भयंकर! पतीला संपवलं अन् बेडरूमध्येच गाडलं, शांततेत झोपली; कशी पकडली गेली?
9
चला हवा येऊ द्या! CHYD चं नवं शीर्षक गीत रिलीज; कॉमेडीच्या गँगवॉरची झलक बघा
10
मस्क अजूनही नंबर १, पण झुकरबर्गला बसला मोठा धक्का! AI च्या कामगिरीने 'हा' उद्योगपती झाला जगात दुसरा श्रीमंत!
11
IND vs ENG: शुभमन गिलने कोहलीसारखा ब्रँड बनण्याचा प्रयत्न करू नये, माजी क्रिकेटपटूचा महत्त्वाचा सल्ला!
12
धक्कादायक...! डोनाल्ड ट्रम्प यांना भारतात पाठवायचंय 'मांसाहारी दूध', सरकारचा स्पष्ट नकार; जाणून घ्या काय आहे हा संपूर्ण प्रकार?
13
"दीपक काटे चांगले काम करेल म्हटलं होतं, पण..."; गायकवाडांवरील हल्ल्याचा मंत्री बावनकुळेंनी केला निषेध
14
सूर्य गोचराने शुभ राजयोग: ७ राशींचे कल्याण, भाग्याची साथ; महिनाभर ‘हे’ करा, लाभच लाभ मिळवा!
15
कमाल! १ मार्काने नापास झाली पण रडत नाही बसली; जिद्दीने अभ्यास करून स्वप्न केलं साकार
16
ऑस्कर पुरस्कार विजेते सत्यजित रे यांचे बांग्लादेशातील घर पाडले; भारताने दिलेली दुरुस्तीची ऑफर
17
राहुल गांधी पंतप्रधान होणार हे तुम्हाला माहितीये का?; उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला फटकारलं, प्रकरण काय?
18
रात्रीच्या अंधारातही हल्ला करू शकणारे अमेरिकेतून येणार अपाचे हेलिकॉप्टर; पाक सीमेवर होणार तैनात
19
IND vs ENG 3rd Test: आयसीसीचा इंग्लंडला डबल दणका, लॉर्ड्स कसोटी जिंकूनही संघाचा मोठा तोटा! 

पुन्हा एकदा ‘भूरणकंदन’!

By admin | Updated: April 20, 2015 03:35 IST

सुमारे ५६ दिवसांची ‘आत्मचिंतन’ सुटी संपवून गत गुरुवारी मायदेशी परतलेले काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी रविवारी आपले मौन सोडत शेतकऱ्यांसाठीच्या संघर्षात उडी घेतली.

शीलेश शर्मा, नवी दिल्लीसुमारे ५६ दिवसांची ‘आत्मचिंतन’ सुटी संपवून गत गुरुवारी मायदेशी परतलेले काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी रविवारी आपले मौन सोडत शेतकऱ्यांसाठीच्या संघर्षात उडी घेतली. तळपत्या उन्हात खचाखच भरलेल्या रामलीला मैदानावर शेतकरी आणि मजुरांसाठी लढण्याची ग्वाही देत, राहुल यांनी मोदी सरकारवर घणाघाती टीका केली. लोकसभा जिंकण्यासाठी भाजपाने उद्योगपतींकडून मोठ्या प्रमाणात ‘कर्ज’ घेतले. आता या कर्जाची परतफेड करण्यासाठीच सरकार शेतकरीविरोधी भूसंपादन विधेयक आणू पाहत आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला.काँग्रेसने आयोजित केलेल्या ‘किसान रॅली’त ते बोलत होते. शर्टाच्या बाह्या सरसावत बोलण्याची आपली जुनी सवय मागे सोडत राहुल गांधी आज काहीशा वेगळ्याच अंदाजात बोलताना दिसले. आपल्या आक्रमक शैलीत त्यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. मोदी सरकारच्या कार्यकाळात शेतकरी भयभीत आहे. सकाळी उठू तेव्हा आपली जमीन आपलीच राहील की नाही, ही चिंता त्याला रात्री स्वस्थ झोपू देत नाही. कारण या सरकारला शेतकऱ्यांचा विसर पडला आहे. मोठ्या औद्योगिक घराण्यांसाठीच हे सरकार काम करीत आहे. त्यामुळे शेतकरी घाबरला आहे. आपली जमीन बळकावून सरकार ती औद्योगिक घराण्यांच्या घशात घालेल, ही भीती शेतकऱ्यांना सतावत आहे, असे राहुल म्हणाले.लोकसभा निवडणुकीदरम्यान उद्योगपतींकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठीच भूसंपादन विधेयक आणले जात आहे. शेतकऱ्यांकडून कवडीमोल भावाने जमीन खरेदी करून त्यातून उद्योगपतींना नफा मिळवून देण्याचा डाव आहे, असा आरोप राहुल यांनी यावेळी केला. २०१३ मध्ये तत्कालीन काँग्रेसप्रणीत संपुआ सरकारने आणलेल्या भूसंपादन कायद्याला भाजपाने पाठिंबा दिला होता. मग आज ११ महिन्यानंतर या कायद्यात दुरुस्ती करण्यासाठी वटहुकूम काढण्याची अशी काय गरज निर्माण झाली? काल पाठिंबा आणि आज सत्ता येताच त्यात बदल, असे का? असे सवाल करीत भूसंपादन कायद्यात दुरुस्ती करण्यामागे मोदी सरकारचे वेगळे मनसुबे आहेत. पण उद्योगधार्जिण्या सरकारचे हे मनसुबे काँग्रेस कधीही पूर्ण होऊ देणार नाही. संपुआ सरकारने शेतकऱ्यांना मिळणाऱ्या आधारभूत किमतीमध्ये वाढ केली. विदर्भातील दुष्काळाच्या वेळी कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले. आजही काँग्रेस शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे आणि शेतकऱ्यांसाठी सडकेपासून संसदेपर्यंत लढण्यास कटिबद्ध आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.