शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा एकदा ‘भूरणकंदन’!

By admin | Updated: April 20, 2015 03:35 IST

सुमारे ५६ दिवसांची ‘आत्मचिंतन’ सुटी संपवून गत गुरुवारी मायदेशी परतलेले काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी रविवारी आपले मौन सोडत शेतकऱ्यांसाठीच्या संघर्षात उडी घेतली.

शीलेश शर्मा, नवी दिल्लीसुमारे ५६ दिवसांची ‘आत्मचिंतन’ सुटी संपवून गत गुरुवारी मायदेशी परतलेले काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी रविवारी आपले मौन सोडत शेतकऱ्यांसाठीच्या संघर्षात उडी घेतली. तळपत्या उन्हात खचाखच भरलेल्या रामलीला मैदानावर शेतकरी आणि मजुरांसाठी लढण्याची ग्वाही देत, राहुल यांनी मोदी सरकारवर घणाघाती टीका केली. लोकसभा जिंकण्यासाठी भाजपाने उद्योगपतींकडून मोठ्या प्रमाणात ‘कर्ज’ घेतले. आता या कर्जाची परतफेड करण्यासाठीच सरकार शेतकरीविरोधी भूसंपादन विधेयक आणू पाहत आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला.काँग्रेसने आयोजित केलेल्या ‘किसान रॅली’त ते बोलत होते. शर्टाच्या बाह्या सरसावत बोलण्याची आपली जुनी सवय मागे सोडत राहुल गांधी आज काहीशा वेगळ्याच अंदाजात बोलताना दिसले. आपल्या आक्रमक शैलीत त्यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. मोदी सरकारच्या कार्यकाळात शेतकरी भयभीत आहे. सकाळी उठू तेव्हा आपली जमीन आपलीच राहील की नाही, ही चिंता त्याला रात्री स्वस्थ झोपू देत नाही. कारण या सरकारला शेतकऱ्यांचा विसर पडला आहे. मोठ्या औद्योगिक घराण्यांसाठीच हे सरकार काम करीत आहे. त्यामुळे शेतकरी घाबरला आहे. आपली जमीन बळकावून सरकार ती औद्योगिक घराण्यांच्या घशात घालेल, ही भीती शेतकऱ्यांना सतावत आहे, असे राहुल म्हणाले.लोकसभा निवडणुकीदरम्यान उद्योगपतींकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठीच भूसंपादन विधेयक आणले जात आहे. शेतकऱ्यांकडून कवडीमोल भावाने जमीन खरेदी करून त्यातून उद्योगपतींना नफा मिळवून देण्याचा डाव आहे, असा आरोप राहुल यांनी यावेळी केला. २०१३ मध्ये तत्कालीन काँग्रेसप्रणीत संपुआ सरकारने आणलेल्या भूसंपादन कायद्याला भाजपाने पाठिंबा दिला होता. मग आज ११ महिन्यानंतर या कायद्यात दुरुस्ती करण्यासाठी वटहुकूम काढण्याची अशी काय गरज निर्माण झाली? काल पाठिंबा आणि आज सत्ता येताच त्यात बदल, असे का? असे सवाल करीत भूसंपादन कायद्यात दुरुस्ती करण्यामागे मोदी सरकारचे वेगळे मनसुबे आहेत. पण उद्योगधार्जिण्या सरकारचे हे मनसुबे काँग्रेस कधीही पूर्ण होऊ देणार नाही. संपुआ सरकारने शेतकऱ्यांना मिळणाऱ्या आधारभूत किमतीमध्ये वाढ केली. विदर्भातील दुष्काळाच्या वेळी कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले. आजही काँग्रेस शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे आणि शेतकऱ्यांसाठी सडकेपासून संसदेपर्यंत लढण्यास कटिबद्ध आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.