शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
3
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
4
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
5
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
6
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
7
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
9
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
10
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
11
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
12
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
13
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
14
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
15
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
16
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
17
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
18
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
19
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
20
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा

भारतरत्नच्या प्रकरणात हस्तक्षेप करणार नाही

By admin | Updated: January 7, 2017 04:46 IST

दिवंगत जे. जयललिता यांना भारतरत्न देण्याचे निर्देश केंद्र सरकारला द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका मद्रास उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावली.

चेन्नई : अद्रमुक नेत्या दिवंगत जे. जयललिता यांना भारतरत्न देण्याचे निर्देश केंद्र सरकारला द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका मद्रास उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावली. के. के. रमेश यांनी ही याचिका दाखल केली होती. ते केम अप या तामिळनाडू जनहित याचिका केंद्राचे विश्वस्त आहेत. रमेश यांनी याचिकेत जयललितांंचा जीवन इतिहास मांडला होता. अम्मांनी इतर अनेक पुरस्कारांसह तामिळनाडूचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला होता, तसेच त्या सलग पाच वेळा राज्याच्या मुख्यमंत्री राहिल्या. त्यांनी कमी दरात जेवण मिळावे, यासाठी अम्मा कॅन्टीन्ससह विद्यार्थ्यांना नि:शुल्क लॅपटॉप आणि सायकल वाटप यासारख्या अनेक कल्याणकारी योजना राबविल्या. त्या तामिळ जनतेची आईप्रमाणे काळजी घेत. त्यामुळे लोक त्यांना अम्मा संबोधत. आपण १५ डिसेंबर २०१६ रोजी केंद्र सरकारकडे अम्मांना भारतरत्न देण्याची मागणी केली होती. तथापि, आपल्या मागणीला प्रतिसाद न मिळाल्यामुळे आपल्याला न्यायालयाचा दरवाजा ठोठावावा लागला, असे रमेश यांनी न्यायालयाला सांगितले; मात्र आपण अशा प्रकरणात हस्तक्षेप करू इच्छित नसल्याचे सांगून न्यायालयाने ही याचिका फेटाळली. (वृत्तसंस्था)>एमजीआर यांचा गौरव करातामिळनाडूचे मुख्यमंत्री दिवंगत एम. जी. रामचंद्रन (एमजीआर) यांच्या जयंतीनिमित्त स्मृती नाणे आणि विशेष टपाल तिकीट काढून त्यांचा गौरव करावा, अशी मागणी तामिळनाडू सरकार आणि सत्ताधारी अद्रमुकने केंद्राकडे केली आहे.मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम आणि अद्रमुकच्या नवनियुक्त सरचिटणीस व्ही. के. शशिकला यांनी यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठविले आहे.स्मृती नाणे आणि टपाल तिकीट जारी करणे ही या करिश्माई नेत्याला समर्पक आदरांजली ठरेल, असे पनीरसेल्वम यांनी म्हटले, तर रामचंद्रन यांचा अशा प्रकारे गौरव होणे अगत्याचे असल्याचे शशिकला म्हणाल्या.