शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

'भारत माता की जय' म्हटलंच पाहिजे, विधानावरुन काँग्रेसची मुख्यमंत्र्यांवर टीका

By admin | Updated: April 3, 2016 15:02 IST

'भारत माता की जय' म्हटलेच पाहिजे या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावर काँग्रेस आणि मुस्लिम धार्मिक नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. ३ - या देशात रहायचे असेल तर, प्रत्येक भारतीयाने 'भारत माता की जय' म्हटलेच पाहिजे या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावर काँग्रेस आणि मुस्लिम धार्मिक नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. शनिवारी नाशिकमध्ये भाजपच्या एका कार्यक्रमामध्ये बोलताना मुख्यमंत्र्यांनी काही लोक 'भारत माता की जय' म्हणणार नाही अस म्हणतात मग, काय पाकिस्तान की जय, चायना की जय म्हणणार असे विधान केले होते. 
 
काँग्रेस नेते संदीप दिक्षित यांनी फडणवीस आणि भाजपवर राजकीय फायद्यासाठी 'भारत मात की जय' या घोषणेचा उपयोग करत असल्याचा आरोप केला आहे. 'भारत माता की जय' ही घोषणाच मूळात वादाचा मुद्दा होऊ शकत नाही. पण भाजप याला वादाचा विषय बनवून आपण किती राष्ट्रवादी आणि देशभक्त आहोत ते दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. 
 
भाजप आणि त्यांच्या पूर्वजांनी भारताच्या स्वातंत्र्यलढयात कोणतेही योगदान दिलेले नाही. यांच्या नेत्यांना एकदा तुरुंगवास झाला होता मात्र त्यांनी माफीनामा लिहून दिला होता असा आरोप काँग्रेस नेते संदीप दिक्षित यांनी केला. 
 
अखिल भारतीय इमाम संघटनेचे मुख्य इमाम उमर अहमद इलियासी यांनीही देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. जे जबाबदारीच्या पदावर आहेत त्यांनी अशी विधाने करणे टाळले पाहिजे. कोणी या देशात रहावे, कोणी राहू नये हे ठरवण्याचा अधिकार कोणाकडेही नाही. जर तुम्ही लोकांवर 'भारत माता की जय' घोषणा देण्यासाठी जबरदस्ती केली तर, त्यामुळे तिरस्कार, व्देष वाढले असे इलियासी यांनी सांगितले.