शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत जास्मिन लांबोरियाची 'सुवर्ण' कामगिरी!
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
4
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
5
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
6
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
7
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
8
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
9
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
10
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
11
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
12
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
13
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
14
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
15
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
16
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
17
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
18
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
19
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
20
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!

'भारत माता की जय' म्हटलंच पाहिजे, विधानावरुन काँग्रेसची मुख्यमंत्र्यांवर टीका

By admin | Updated: April 3, 2016 15:02 IST

'भारत माता की जय' म्हटलेच पाहिजे या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावर काँग्रेस आणि मुस्लिम धार्मिक नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. ३ - या देशात रहायचे असेल तर, प्रत्येक भारतीयाने 'भारत माता की जय' म्हटलेच पाहिजे या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावर काँग्रेस आणि मुस्लिम धार्मिक नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. शनिवारी नाशिकमध्ये भाजपच्या एका कार्यक्रमामध्ये बोलताना मुख्यमंत्र्यांनी काही लोक 'भारत माता की जय' म्हणणार नाही अस म्हणतात मग, काय पाकिस्तान की जय, चायना की जय म्हणणार असे विधान केले होते. 
 
काँग्रेस नेते संदीप दिक्षित यांनी फडणवीस आणि भाजपवर राजकीय फायद्यासाठी 'भारत मात की जय' या घोषणेचा उपयोग करत असल्याचा आरोप केला आहे. 'भारत माता की जय' ही घोषणाच मूळात वादाचा मुद्दा होऊ शकत नाही. पण भाजप याला वादाचा विषय बनवून आपण किती राष्ट्रवादी आणि देशभक्त आहोत ते दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. 
 
भाजप आणि त्यांच्या पूर्वजांनी भारताच्या स्वातंत्र्यलढयात कोणतेही योगदान दिलेले नाही. यांच्या नेत्यांना एकदा तुरुंगवास झाला होता मात्र त्यांनी माफीनामा लिहून दिला होता असा आरोप काँग्रेस नेते संदीप दिक्षित यांनी केला. 
 
अखिल भारतीय इमाम संघटनेचे मुख्य इमाम उमर अहमद इलियासी यांनीही देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. जे जबाबदारीच्या पदावर आहेत त्यांनी अशी विधाने करणे टाळले पाहिजे. कोणी या देशात रहावे, कोणी राहू नये हे ठरवण्याचा अधिकार कोणाकडेही नाही. जर तुम्ही लोकांवर 'भारत माता की जय' घोषणा देण्यासाठी जबरदस्ती केली तर, त्यामुळे तिरस्कार, व्देष वाढले असे इलियासी यांनी सांगितले.