शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

लुटमारीसाठी व्यावसायिकाचे अपहरण करणारे गजाआड नाकाबंदीदरम्यान भांडुप पोलिसांनी केली अटक

By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST

लुटमारीसाठी व्यावसायिकाचे अपहरण करणारे गजाआड

लुटमारीसाठी व्यावसायिकाचे अपहरण करणारे गजाआड
नाकाबंदीदरम्यान भांडुप पोलिसांनी केली अटक
मुंबई: ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाचे अपहरण करुन त्याच्याकडून २० हजाराची खंडणी मागणार्‍या दोन आरोपींना भांडुप पोलिसांनी अटक केली. दत्तात्रय मनाले(२६), सचिन सावंत(३२) अशी या आरोपींंची नावे असून त्यांंचा तिसरा साथीदार अनिल जयस्वाल फरार आहे.
ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करणारे शरीफ पठाण शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास भांडुप लालबहाददूर शास्त्री मार्गावरून रेती घेऊन जात होते. चहा घेण्यासाठी एलबीएस मार्गाच्या कडेला ते उतरले. अशात या त्रिकुटाने त्यांना वाटेत गाठले. त्यांंच्याकडे २० हजारांची मागणी केली. पैसे देण्यास नकार देताच ठार मारण्याची धमकी देत त्यांना बाईकवर मध्यभागी बसवले आणि गाडी कांजुरच्या दिशेने नेण्यास सुरुवात केली. आवाज केला तर डोक्यात पेव्हर घालण्याच्या भितीने दोन्ही आरोपींंच्या मध्ये बसलेल्या पठाण हे शांत होते. अशात भांडुप मधुबन गार्डन येथे पोलिसांंची नाकाबंदी बघून आरोपींची पाचावर धारण बसली. तर पठाण यांनी सुटकेचा निश्वास सोडला. नाकाबंदी जवळ येताच बचाव बचाव म्हणून त्यांनी मदतीसाठी टाहो फोडला. त्यामुळे आणखीनच घाबरलेल्या आरोपींचा गोंधळ उडाला. बाईकवरील नियंत्रण सुटले आणि सारेच खाली पडले. अपघातानंतर पोलिसांनी तात्काळ शफिकची आरोपींंच्या तावडीतून सुटका केली. दरम्यान अनिल हा पोलिसांंच्या हातावार तुरी देत पळुन गेला. अशात सचिन आणि दत्तात्रयला अटक करण्यास भांडुप पोलिसांना यश आले.