शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

डिजिटल फसवणुकीपासून सावध राहा

By admin | Updated: August 1, 2016 01:40 IST

डिजिटल फसवणुकीपासून सावध राहा, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी जनतेला दिला.

नवी दिल्ली : डिजिटल फसवणुकीपासून सावध राहा, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी जनतेला दिला. रेडिओवरील ‘मन की बात’ या कार्यक्रमात ते बोलत होते. मोबाईल, ई-मेलच्या माध्यमातून आमिषाला बळी न पडता सतर्क राहा, असा सल्लाही त्यांनी दिला. मोदी म्हणाले, अशा गोष्टींमुळे नागरिकांचा मेहनतीचा पैसा लुटला जात आहे. एखादा फोन येतो आणि सांगितले जाते की, आपल्याला अमुक रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. आपण एवढे पैसे द्या आणि अमुक एवढी रक्कम बदल्यात घ्या. काही जण या आमिषाला बळी पडतात. नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून केली जाणारी ही लूट आहे. हे नवे तंत्रज्ञान विकासासाठी महत्त्वाचे आहे; पण इथे याचा दुरुपयोग करणारे अधिक आहेत. ही लूट कशाप्रकारे केली जाते याचे उदाहरण देताना मोदी म्हणाले की, एका निवृत्त कर्मचाऱ्याला मुलीचा विवाह करायचा होता. घर बांधायचे होते. एक दिवस त्यांना एक फोन आला की, विदेशातून महागड्या वस्तू आपल्यासाठी आल्या आहेत. सीमा शुल्कासाठी आपल्याला दोन लाख रुपये बँक खात्यात जमा करायचे असल्याचे सांगितले. या व्यक्तीनेही काही विचार न करता आयुष्याची कमाई बँकेतून काढून त्या अज्ञात व्यक्तीला पाठवून दिली. नंतर त्यांच्या लक्षात आले की, आपली फसवणूक झाली आहे. या आमिषाला बळी न पडता सावध राहा, असा सल्ला त्यांनी दिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)>वनीकरणाचे आवाहन जलवायू परिवर्तनासंदर्भात बोलताना संसदेत मंजूर झालेल्या एका विधेयकाचा उल्लेख करून मोदी म्हणाले की, ४० हजार कोटी रुपयांचा निधी राज्यांच्या विकासासाठी आणि विशेषत: वनीकरणासाठी देण्यात येणार आहे. एक चळवळ म्हणून नागरिकांनी वनीकरणाचे काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले. काही राज्यात वनीकरणाचे चांगले काम झाले आहे, असा उल्लेखही त्यांनी केला. नावीन्यपूर्ण योजनांसाठी दहा हजार कोटींच्या सरकारच्या योजनेवरही त्यांनी भाष्य केले.>पूरग्रस्तांना मदत करणार पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी राज्यांसोबत काम करणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. ते म्हणाले की, काही दिवसांपूर्वी आम्ही पाणीटंचाईमुळे काळजीत होतो. आता काही राज्यांत अतिवृष्टीमुळे पूर आला आहे. आसाम, बिहारसह अन्य राज्यांत पुराचे संकट आले आहे. त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल.