शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

डिजिटल फसवणुकीपासून सावध राहा

By admin | Updated: August 1, 2016 01:40 IST

डिजिटल फसवणुकीपासून सावध राहा, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी जनतेला दिला.

नवी दिल्ली : डिजिटल फसवणुकीपासून सावध राहा, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी जनतेला दिला. रेडिओवरील ‘मन की बात’ या कार्यक्रमात ते बोलत होते. मोबाईल, ई-मेलच्या माध्यमातून आमिषाला बळी न पडता सतर्क राहा, असा सल्लाही त्यांनी दिला. मोदी म्हणाले, अशा गोष्टींमुळे नागरिकांचा मेहनतीचा पैसा लुटला जात आहे. एखादा फोन येतो आणि सांगितले जाते की, आपल्याला अमुक रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. आपण एवढे पैसे द्या आणि अमुक एवढी रक्कम बदल्यात घ्या. काही जण या आमिषाला बळी पडतात. नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून केली जाणारी ही लूट आहे. हे नवे तंत्रज्ञान विकासासाठी महत्त्वाचे आहे; पण इथे याचा दुरुपयोग करणारे अधिक आहेत. ही लूट कशाप्रकारे केली जाते याचे उदाहरण देताना मोदी म्हणाले की, एका निवृत्त कर्मचाऱ्याला मुलीचा विवाह करायचा होता. घर बांधायचे होते. एक दिवस त्यांना एक फोन आला की, विदेशातून महागड्या वस्तू आपल्यासाठी आल्या आहेत. सीमा शुल्कासाठी आपल्याला दोन लाख रुपये बँक खात्यात जमा करायचे असल्याचे सांगितले. या व्यक्तीनेही काही विचार न करता आयुष्याची कमाई बँकेतून काढून त्या अज्ञात व्यक्तीला पाठवून दिली. नंतर त्यांच्या लक्षात आले की, आपली फसवणूक झाली आहे. या आमिषाला बळी न पडता सावध राहा, असा सल्ला त्यांनी दिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)>वनीकरणाचे आवाहन जलवायू परिवर्तनासंदर्भात बोलताना संसदेत मंजूर झालेल्या एका विधेयकाचा उल्लेख करून मोदी म्हणाले की, ४० हजार कोटी रुपयांचा निधी राज्यांच्या विकासासाठी आणि विशेषत: वनीकरणासाठी देण्यात येणार आहे. एक चळवळ म्हणून नागरिकांनी वनीकरणाचे काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले. काही राज्यात वनीकरणाचे चांगले काम झाले आहे, असा उल्लेखही त्यांनी केला. नावीन्यपूर्ण योजनांसाठी दहा हजार कोटींच्या सरकारच्या योजनेवरही त्यांनी भाष्य केले.>पूरग्रस्तांना मदत करणार पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी राज्यांसोबत काम करणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. ते म्हणाले की, काही दिवसांपूर्वी आम्ही पाणीटंचाईमुळे काळजीत होतो. आता काही राज्यांत अतिवृष्टीमुळे पूर आला आहे. आसाम, बिहारसह अन्य राज्यांत पुराचे संकट आले आहे. त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल.