शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
3
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
4
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
5
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
6
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
7
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
8
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
9
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
10
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
11
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
12
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
13
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
14
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
15
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
16
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
17
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
18
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
19
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
20
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल

बेळगाव शहराला पुन्हा अशांततेचे ग्रहण, तुफान दगडफेक हानीमारीनंतर जनजीवन पूर्व पदावर दोन्ही गटातील २९ जणांना अटक

By admin | Updated: June 10, 2014 01:50 IST

बेळगाव : रविवारी रात्री साडे अकरा वाजता खडक गल्ली, चांदू गल्ली आणि जालगार गल्लीत समाजकंटकानी दगडफेक आणि सोड्याच्या बाटल्या फोडल्याने संपूर्ण परिसरात तणाव निर्माण झाला असून दगडफेकीत काही लोक आणि पोलीसही जखमी झाले आहेत. तणाव निर्माण झालेल्या परिसरात दोन दिवस जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे . सार्वजनिक शांतता भंग केल्या प्रकरणी दोन्ही गातील मिळून २९ जणांना पोलिसांनी अटक करून कारागृहात रवानगी केली आहे

बेळगाव : रविवारी रात्री साडे अकरा वाजता खडक गल्ली, चांदू गल्ली आणि जालगार गल्लीत समाजकंटकानी दगडफेक आणि सोड्याच्या बाटल्या फोडल्याने संपूर्ण परिसरात तणाव निर्माण झाला असून दगडफेकीत काही लोक आणि पोलीसही जखमी झाले आहेत. तणाव निर्माण झालेल्या परिसरात दोन दिवस जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे . सार्वजनिक शांतता भंग केल्या प्रकरणी दोन्ही गातील मिळून २९ जणांना पोलिसांनी अटक करून कारागृहात रवानगी केली आहे सोमवारी सकाळी खडक गल्ली परिसरात मोठ्याप्रमणात पोलिस बंदोबास्त लावण्यात आला होता. या भगात ये जा करणार्‍यांची कसून तपासणी करण्यात येत होती. या भागातील दंगलीचे परिणाम म्हणून शहरातील अर्ध्याहून अधिक दुकाने बंद होती. दुपारनंतर जास्त लोक बाहेर न पडल्यामुळे बाजारपेठेत अनेक व्यापार्‍यांनी आपली दुकाने बंद ठेवणेच पसंद केले होते. बेळगाव शहरात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. खाजगी आणि सरकारी शाळातूनही अर्धी मुले गैरहजर होती. त्यामुळे दुपारनंतर सर्वच शाळांना देखील सु˜ी देण्यात आली मात्र तणाव हा शहरात जाणवत होता.या घटनेत वीसहून अधिक वाहनांची समाजकंटकानी मोडतोड केली असून तीसहून अधिक व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उत्तर विभागाचे आय. जी. पी. भास्कर राव यांनी जनतेला अफवावर विश्वास ठेवू नये. आपापले दैनंदिन व्यवहार सुरळीत पार पाडावेत, असे आवाहन केले आहे . खडेबाजार अिाण मार्केट पोलिस स्थानकाच्या हद्दीत १४४ कलम लागू करण्यात आले आहे. सदर परिसर अत्यंत संवेदनशील मानला असल्यामुळे घटनेचे वृत्त समजताच जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. चंद्रगुप्त आणि अधिकार्‍यांनी तेथे घेऊन परिस्थिती नियंत्रणाखाली आणली. यावेळी पोलिसांनी दरवाजे मोडून घरात झोपलेल्या तरु णांना अटक केली. पोलिसांचा धुडगूस महिला तर बेशुद्धच पडली. अनेकांना पोलिसांनी झोडपून काढले. पोलिसांच्या धरपकड सत्रामुळे संतापलेल्या महिलांनी जिल्हा पोलिस प्रमुखावर प्रश्नांचा भडीमार केला संतापलेल्या जिल्हा पोलिस प्रमुखांनी निरपराध असतील तर चौकशी करून सोडू. पोलिसांना त्यांचे काम करू द्या असे सांगितले . सोमवारी सकाळी पोलिसांनी संपूर्ण भागाची नाकाबंदी केली असून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सोमवारी दिवसभर शहरात अफवांना उत आला होता. सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी वातावरणात तणाव आहे. आठवड्यापूर्वी अनगोळ भागात तणाव निर्माण झाला होता. तेव्हापासून शहरात किरकोळ घटना घडून तणाव निर्माण होत आहे.