शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
2
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
3
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
4
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
5
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
6
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
7
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
8
अलिबाग: खांदेरीवर ‘मंकला’, ‘वाघबकरी’ खेळांचे अवशेष; शोधमोहिमेत सापडले मंकलाचे १० पट
9
बुलेट ट्रेनसाठी ४० मीटरचा बॉक्स गर्डर; महाराष्ट्रात प्रथमच बसवला पूर्ण लांबीचा गर्डर 
10
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
11
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
12
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
13
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा
14
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
15
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
16
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
17
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
18
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
19
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
20
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही

शासनाच्या अधीन धर्म असल्याने विकास चुकीच्या दिशेने -१

By admin | Updated: February 21, 2015 00:50 IST

शासनाच्या अधीन धर्म असल्याने विकास चुकीच्या दिशेनेस्वामी निश्चलानंद सरस्वती यांच्याशी लोकमतची चर्चा नागपूर : वर्तमानात कोणत्याही धर्माचे गुरु किंवा धार्मिक संस्था या राज्य सरकारच्या कृपादृष्टीपासून दूर नाहीत. राज्य शासनाच्या अधीन असल्याने धार्मिक संस्थांचा स्वतंत्र व शास्त्रोक्त प्रभाव समाजावर फारसा होताना दिसून येत नाही. राजाश्रय प्राप्त संस्था असल्याने सरकारच्या चुकीच्या धोरणाविरुद्ध ...


शासनाच्या अधीन धर्म असल्याने विकास चुकीच्या दिशेने
स्वामी निश्चलानंद सरस्वती यांच्याशी लोकमतची चर्चा

नागपूर :
वर्तमानात कोणत्याही धर्माचे गुरु किंवा धार्मिक संस्था या राज्य सरकारच्या कृपादृष्टीपासून दूर नाहीत. राज्य शासनाच्या अधीन असल्याने धार्मिक संस्थांचा स्वतंत्र व शास्त्रोक्त प्रभाव समाजावर फारसा होताना दिसून येत नाही. राजाश्रय प्राप्त संस्था असल्याने सरकारच्या चुकीच्या धोरणाविरुद्ध त्या काहीही करण्यास असमर्थ ठरतात. याचा परिणाम धोरणांवर पडत आहे. सरकारच्या योजना व धोरण धर्मसंमत नसल्याने त्या निसर्गाच्या विरोधात तयार होत आहेत. त्यामुळे विकासाच्या ऐवजी विनाशाला निमंत्रण दिले जात आहे. संपूर्ण भारताचे हे चित्र असून तोच खरा चिंतेचा विषय आहे, असे मत गोवर्धनमठ पुरीपीठाचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी नागपूर दौऱ्यादरम्यान लोकमतशी विशेष चर्चा करतांना व्यक्त केले.
स्वामीजींनी स्पष्ट सांगितले की, भारतात जितकेही धर्म आहेत ते सरकारच्या विरोधात आपले स्वतंत्र मत व्यक्त करू शकत नाहीत. धर्माच्या अधीन शासन असायला हवे, परंतु भारतात शासनाच्या अधीन धर्म असल्याने देशातील चित्रच उलटे झाले आहे. आज कोणत्याही धर्माचा गुरु हा एकतर काँग्रेसशी संबंधित अहे किंवा भाजपाशी संबंधित आहे. राजकीय नेत्यांनी याप्रकारे धर्माला आपल्या ताब्यात ठेवले आहे. त्यामुळे भारताचा विकास स्वत: आपल्या अंतरभावनेतून न होता इतर देशांच्या विकासाच्या प्रभावातून होत आहे. विकासाच्या नावावर दारिद्र्यता आणि गुलामगिरी आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
धर्माला राजकारणाच्या अधीन आणण्याचा प्रयत्न आजचा नव्हे तर इंग्रजांच्या काळापासून सुरू आहे. एकेकाळी इंग्रजांनी एका धार्मिक संस्थेच्या माध्यमातून हिंदंूवर धार्मिक रूपात शासन करण्याचा प्रयत्न केला होता. स्वातंत्र्यानंतर दोन मोठ्या सामाजिक व राजकीय नेत्यांना संत म्हणून प्रसिद्ध करण्यात आले. वस्तुत: ते साधू नसून राजकारणी होते. त्यामुळे या देशातील राजकारण्यांनी संतांचे कधी ऐकलेच नाही. उलट आपल्या स्वार्थासाठी साधूसंतांचा वापर केला. जर शासनाने संतांचे मार्गदर्शन मागितले असते तर देशाचा विकास योग्य मार्गाने झाला असता.