शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

शासनाच्या अधीन धर्म असल्याने विकास चुकीच्या दिशेने -१

By admin | Updated: February 21, 2015 00:50 IST

शासनाच्या अधीन धर्म असल्याने विकास चुकीच्या दिशेनेस्वामी निश्चलानंद सरस्वती यांच्याशी लोकमतची चर्चा नागपूर : वर्तमानात कोणत्याही धर्माचे गुरु किंवा धार्मिक संस्था या राज्य सरकारच्या कृपादृष्टीपासून दूर नाहीत. राज्य शासनाच्या अधीन असल्याने धार्मिक संस्थांचा स्वतंत्र व शास्त्रोक्त प्रभाव समाजावर फारसा होताना दिसून येत नाही. राजाश्रय प्राप्त संस्था असल्याने सरकारच्या चुकीच्या धोरणाविरुद्ध ...


शासनाच्या अधीन धर्म असल्याने विकास चुकीच्या दिशेने
स्वामी निश्चलानंद सरस्वती यांच्याशी लोकमतची चर्चा

नागपूर :
वर्तमानात कोणत्याही धर्माचे गुरु किंवा धार्मिक संस्था या राज्य सरकारच्या कृपादृष्टीपासून दूर नाहीत. राज्य शासनाच्या अधीन असल्याने धार्मिक संस्थांचा स्वतंत्र व शास्त्रोक्त प्रभाव समाजावर फारसा होताना दिसून येत नाही. राजाश्रय प्राप्त संस्था असल्याने सरकारच्या चुकीच्या धोरणाविरुद्ध त्या काहीही करण्यास असमर्थ ठरतात. याचा परिणाम धोरणांवर पडत आहे. सरकारच्या योजना व धोरण धर्मसंमत नसल्याने त्या निसर्गाच्या विरोधात तयार होत आहेत. त्यामुळे विकासाच्या ऐवजी विनाशाला निमंत्रण दिले जात आहे. संपूर्ण भारताचे हे चित्र असून तोच खरा चिंतेचा विषय आहे, असे मत गोवर्धनमठ पुरीपीठाचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी नागपूर दौऱ्यादरम्यान लोकमतशी विशेष चर्चा करतांना व्यक्त केले.
स्वामीजींनी स्पष्ट सांगितले की, भारतात जितकेही धर्म आहेत ते सरकारच्या विरोधात आपले स्वतंत्र मत व्यक्त करू शकत नाहीत. धर्माच्या अधीन शासन असायला हवे, परंतु भारतात शासनाच्या अधीन धर्म असल्याने देशातील चित्रच उलटे झाले आहे. आज कोणत्याही धर्माचा गुरु हा एकतर काँग्रेसशी संबंधित अहे किंवा भाजपाशी संबंधित आहे. राजकीय नेत्यांनी याप्रकारे धर्माला आपल्या ताब्यात ठेवले आहे. त्यामुळे भारताचा विकास स्वत: आपल्या अंतरभावनेतून न होता इतर देशांच्या विकासाच्या प्रभावातून होत आहे. विकासाच्या नावावर दारिद्र्यता आणि गुलामगिरी आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
धर्माला राजकारणाच्या अधीन आणण्याचा प्रयत्न आजचा नव्हे तर इंग्रजांच्या काळापासून सुरू आहे. एकेकाळी इंग्रजांनी एका धार्मिक संस्थेच्या माध्यमातून हिंदंूवर धार्मिक रूपात शासन करण्याचा प्रयत्न केला होता. स्वातंत्र्यानंतर दोन मोठ्या सामाजिक व राजकीय नेत्यांना संत म्हणून प्रसिद्ध करण्यात आले. वस्तुत: ते साधू नसून राजकारणी होते. त्यामुळे या देशातील राजकारण्यांनी संतांचे कधी ऐकलेच नाही. उलट आपल्या स्वार्थासाठी साधूसंतांचा वापर केला. जर शासनाने संतांचे मार्गदर्शन मागितले असते तर देशाचा विकास योग्य मार्गाने झाला असता.