शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

शासनाच्या अधीन धर्म असल्याने विकास चुकीच्या दिशेने -१

By admin | Updated: February 21, 2015 00:50 IST

शासनाच्या अधीन धर्म असल्याने विकास चुकीच्या दिशेनेस्वामी निश्चलानंद सरस्वती यांच्याशी लोकमतची चर्चा नागपूर : वर्तमानात कोणत्याही धर्माचे गुरु किंवा धार्मिक संस्था या राज्य सरकारच्या कृपादृष्टीपासून दूर नाहीत. राज्य शासनाच्या अधीन असल्याने धार्मिक संस्थांचा स्वतंत्र व शास्त्रोक्त प्रभाव समाजावर फारसा होताना दिसून येत नाही. राजाश्रय प्राप्त संस्था असल्याने सरकारच्या चुकीच्या धोरणाविरुद्ध ...


शासनाच्या अधीन धर्म असल्याने विकास चुकीच्या दिशेने
स्वामी निश्चलानंद सरस्वती यांच्याशी लोकमतची चर्चा

नागपूर :
वर्तमानात कोणत्याही धर्माचे गुरु किंवा धार्मिक संस्था या राज्य सरकारच्या कृपादृष्टीपासून दूर नाहीत. राज्य शासनाच्या अधीन असल्याने धार्मिक संस्थांचा स्वतंत्र व शास्त्रोक्त प्रभाव समाजावर फारसा होताना दिसून येत नाही. राजाश्रय प्राप्त संस्था असल्याने सरकारच्या चुकीच्या धोरणाविरुद्ध त्या काहीही करण्यास असमर्थ ठरतात. याचा परिणाम धोरणांवर पडत आहे. सरकारच्या योजना व धोरण धर्मसंमत नसल्याने त्या निसर्गाच्या विरोधात तयार होत आहेत. त्यामुळे विकासाच्या ऐवजी विनाशाला निमंत्रण दिले जात आहे. संपूर्ण भारताचे हे चित्र असून तोच खरा चिंतेचा विषय आहे, असे मत गोवर्धनमठ पुरीपीठाचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी नागपूर दौऱ्यादरम्यान लोकमतशी विशेष चर्चा करतांना व्यक्त केले.
स्वामीजींनी स्पष्ट सांगितले की, भारतात जितकेही धर्म आहेत ते सरकारच्या विरोधात आपले स्वतंत्र मत व्यक्त करू शकत नाहीत. धर्माच्या अधीन शासन असायला हवे, परंतु भारतात शासनाच्या अधीन धर्म असल्याने देशातील चित्रच उलटे झाले आहे. आज कोणत्याही धर्माचा गुरु हा एकतर काँग्रेसशी संबंधित अहे किंवा भाजपाशी संबंधित आहे. राजकीय नेत्यांनी याप्रकारे धर्माला आपल्या ताब्यात ठेवले आहे. त्यामुळे भारताचा विकास स्वत: आपल्या अंतरभावनेतून न होता इतर देशांच्या विकासाच्या प्रभावातून होत आहे. विकासाच्या नावावर दारिद्र्यता आणि गुलामगिरी आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
धर्माला राजकारणाच्या अधीन आणण्याचा प्रयत्न आजचा नव्हे तर इंग्रजांच्या काळापासून सुरू आहे. एकेकाळी इंग्रजांनी एका धार्मिक संस्थेच्या माध्यमातून हिंदंूवर धार्मिक रूपात शासन करण्याचा प्रयत्न केला होता. स्वातंत्र्यानंतर दोन मोठ्या सामाजिक व राजकीय नेत्यांना संत म्हणून प्रसिद्ध करण्यात आले. वस्तुत: ते साधू नसून राजकारणी होते. त्यामुळे या देशातील राजकारण्यांनी संतांचे कधी ऐकलेच नाही. उलट आपल्या स्वार्थासाठी साधूसंतांचा वापर केला. जर शासनाने संतांचे मार्गदर्शन मागितले असते तर देशाचा विकास योग्य मार्गाने झाला असता.