शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

बिहारचा रणसंग्राम, मतदानाला सुरुवात

By admin | Updated: October 12, 2015 09:21 IST

बिहार विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यात १० जिल्ह्यातील ४९ मतदारसंघासाठी सोमवारी सकाळी कडेकोट पोलिस बंदोबस्तात मतदानाला सुरुवात झाली आहे.

ऑनलाइन लोकमत 

पाटणा, दि. १२ - बिहार विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यात १० जिल्ह्यातील ४९ मतदारसंघासाठी सोमवारी सकाळी कडेकोट पोलिस बंदोबस्तात मतदानाला सुरुवात झाली आहे.  पहिला तासाभरात ६ टक्के मतदान झाल्याचे वृत्त असून बांका, भागलपूर आणि समस्तीपूर येथील मतदान केंद्रावर ईव्हीएम मशिन बिघडल्याने गोंधळाची स्थिती होती. 

बिहार विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यात ४९ मतदारसंघांमध्ये सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात समस्तीपूर, बेगूसराय, खगडिया, भागलपूर, बांका, मुंगेर, लखीसराय, शेखपुरा, नवादा आणि जमूई अशा १० जिल्ह्यांमध्ये मतदान होत आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार सकाळी आठ वाजेपर्यंत खगडिया आणि बांका येथे ७ ते ८ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. १ कोटी ३५ लाख मतदार पहिल्या टप्प्यात मतदान करणार असून ५८३ उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे. पोलिस व निमलष्करी दलाचे तब्बल १ लाख ५५ हजार ०७३  जवान बंदोबस्तावर तैनात असून जिल्ह्यांवर हेलिकॉप्टर आणि ड्रोनव्दारे नजर ठेवली जात आहे. 

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील जनतेने मोठ्या संख्येने मतदान करावे असे आवाहन ट्विटरव्दारे केले आहे. तर केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनीदेखील बराहिया येथील मतदार केंद्रावर मतदान केले. ४९ पैकी ३४ मतदार संघात गेल्या वेळच्या निवडणुकीत महाआघाडीत म्हणजेच राजद, जदयू आणि काँग्रेसचे वर्चस्व होते. त्यामुळे हा टप्पा महाआघाडीसाठी महत्त्वाचा मानला जात आहे.