शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

बॅँकांच्या बुडीत कर्जांचा घोटाळा ‘२जी’हून दहापट मोठा

By admin | Updated: October 17, 2016 05:17 IST

भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने ही कर्जे माफ करण्याचा सपाटा लावला आहे

नवी दिल्ली : देशातील बड्या खासगी उद्योगांकडे असलेली राष्ट्रीयीकृत बँकांची अब्जावधी रुपयांची थकित कर्जे हा ‘२जी स्पेक्ट्रम’ घोटाळयाहून दहापट मोठा घोटाळा आहे आणि ही कर्जे वसूल करण्याचे परिणामकारक उपाय योजण्याऐवजी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने ही कर्जे माफ करण्याचा सपाटा लावला आहे, असा आरोप माकपाचे सरचिटणीस सिताराम येचुरी यांनी शनिवारी केला.समाजमाध्यमांवर टाकलेल्या अनेक पोस्टमध्ये येचुरी यांनी म्हटले की, बड्या खासगी कंपन्यांनी राष्ट्रीयकृत बँकांकडून घेतलेल्या ११ लाख कोटींच्या कर्जांची परतफेड केलेली नाही. या कर्जांची वसुली करण्यासाठी सरकारने काहीच केले नाही. एवढेच नव्हे तर उलट गेल्या दोन वर्षांत सरकारच्या सांगण्यावरून बँकांनी या कंपन्यांची १.१२ लाख कोटींची कर्जे माफ केली आहेत.बँकांची बुडित कर्जे हा एक अतिप्रचंड असा घोटाळा असून त्याची व्याप्ती २जी स्पेक्ट्रम वाटपात झालेल्या कथित घोटाळ््याच्या दहापट आहे, असेही येचुरी यांनी म्हटले.येचुरी लिहितात की, शेती अडचणीत आल्याने आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची कर्जे माफ करायला हे सरकार तयार नसते व त्यासाठी पुरेसा निधीउपलब्ध नसल्याचे कारण दिले जाते. परंतु दुसरीकडे बड्या उद्योगांची अब्जावधी रुपयांची बुडित कर्जे माफ केली जातात. यावरून सरकारचा खरा चेहरा समोर येतो. (लोकमत न्यूज नेटवर्क)>‘बॅड बँक नको’, वसुली करा!विविध राष्ट्रीयीकृत बँकांची बुडीत कर्जे अंगावर घेण्यासाठी एक स्वतंत्र ‘बॅड बँक’ स्थापन करण्याच्या सरकारच्या प्रस्तावास येचुरी यांनी याआधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून विरोध केला होता. आता याच संदर्भात ते समाजमाध्यमांवर लिहितात की, बडया कर्जबुडव्यांना मोकळे रान मिळणार असल्याने ‘बॅड बँक’ स्थापन करण्याची कल्पनाच मुळात ‘बॅड’ (वाईट) आहे. राष्ट्रीयीकृत बँकांना बड्या उद्योगांना पुन्हा कर्जे देणे शक्य व्हावे यासाठी त्यांची फेररचना केली जाऊ शकत नाही. अशा प्रकारे बडित कर्जांच्या रूपाने अपहार केला गेलेला सर्व पैसा हा जनतेचा आहे. त्यामुळे ‘बॅड बँक’ स्थापन करण्याऐवजी सरकारने ही सर्व बुडीत कर्जे या कंपन्यांकडून वसूल करावी.