शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
3
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
4
तरुणींच्या ‘लाइव्ह’ हत्येनं अर्जेंटिना हादरला! 'मित्र'च बनले हैवान, तरुणींची बोटं कापली, नखं उपसली अन्... 
5
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
6
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
7
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
8
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
9
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
10
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
11
ठाणे जिल्ह्यात पुरामुळे  हजाराे नागरिकांचे ठिकठिकाणी स्थलांतर; शनिवार, रविवारी पावसाने  दिवसभर झोडपून काढले
12
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
13
स्वयंपाकघर ते मंत्रालय : ‘विदेशी’ असेल ते हाकला! बलाढ्यांशी टक्कर द्यायला स्वदेशी २.० आंदोलन
14
अतिवृष्टीमुळे शेतमाल सडला; तुटवड्यामुळे मिरचीचे दर दुप्पट
15
पाकिस्तानचे शेपूट किती वेळा नळीत घालून बघायचे?
16
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
17
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
18
राजेंद्र लोढांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; फॉरेन्सिक ऑडिट सुरू
19
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
20
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त

बांगला सीमा २ वर्षांत सील करणार - सोनोवाल

By admin | Updated: May 22, 2016 03:00 IST

घुसखोरी रोखण्यासाठी बांगलादेशलगतची आसामची सीमा आगामी दोन वर्षांत सील केली जाईल, असे भावी मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी सांगितले.

गुवाहाटी : घुसखोरी रोखण्यासाठी बांगलादेशलगतची आसामची सीमा आगामी दोन वर्षांत सील केली जाईल, असे भावी मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी सांगितले. भाजपाने निवडणुकीत घुसखोरीचा प्रश्न प्रचाराचा मुद्दा बनविला होता.घुसखोरी आणि ती रोखण्याचे प्रयत्न हे आपल्या सरकारसमोरील सर्वांत महत्त्वाचे प्रश्न असतील, असे त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, सीमेवर कायमस्वरूपी कुंपण घालण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी २ वर्षांची मुदत दिली आहे. त्या मुदतीच्या आतच कुंपण घालण्याचे काम आम्ही पूर्ण करू . यंदा जानेवारीतच राजनाथसिंह यांनी आसामच्या करीमगंज जिल्ह्यात भारत-बांगलादेश सीमेचा दौरा केला होता. त्यात त्यांनी त्या भागात काटेरी कुंपण घालण्याचे काम वर्षअखेरपर्यंत पूर्ण केले जाईल, असे सांगितले होते. कुंपण घालताच घुसखोरी आपोआपच थांबेल, असे राजनाथ यांनी त्यावेळी सांगितले होते. बांगलादेशातून घुसखोरी रोखण्यासाठी कोणती प्रणाली अमलात आणणार की कायदा करणार, असे विचारले असता सोनोवाल म्हणाले की, आसाममध्ये राष्ट्रीय नागरिकता रजिस्टरमध्ये (एनआरसी) सुधारणा चालू आहे. त्याचे अंतिम प्रारूप जाहीर झाल्यानंतर कोण नागरिक आहे आणि कोण घुसखोर आहे हे समजू शकेल. त्यावेळी सध्याच्या कायद्यानुसार घुसखोरांवर कारवाई केली जाईल.