शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

बाबरी, गोधरामुळे मनं बिघडली म्हणून तरुण दहशतवादाकडे !

By admin | Updated: June 13, 2016 07:54 IST

भारतीय उपखंडात या दहशतवादी संघटनेची (एक्यूआयएस) पाळेमुळे रोवण्याचा चंग बांधून आहेत, असा दावा दिल्ली पोलिसांनी न्यायालयात केला आहे.

दिल्ली पोलिसांचा दावानवी दिल्ली : इ.स. १९९२ चा बाबरी मशीद विध्वंस आणि २००२ च्या गोधरा दंगलींमुळेच भारतीय तरुण अल कायदा या दहशतवादी संघटनेकडे आकर्षित झाले आणि आज हे तरुण भारतीय उपखंडात या दहशतवादी संघटनेची (एक्यूआयएस) पाळेमुळे रोवण्याचा चंग बांधून आहेत, असा दावा दिल्ली पोलिसांनी न्यायालयात केला आहे.दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने १७ आरोपींविरुद्ध अतिरिक्त सत्र न्यायाधीश रितेश सिंग यांच्या न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. आरोपपत्रातील माहितीनुसार विविध मशिदींमध्ये जिहादी भाषण दिल्यावर अटकेतील आरोपी सईद अंजार शाह हा मोहम्मद उमरला (फरार आरोपी) भेटला आणि त्यांनी भारतात मुस्लिमांवर होणारे कथित अत्याचार; प्रामुख्याने गोधरा व बाबरी मशिदीच्या मुद्द्यावर चर्चा केली. शाहच्या विचारांनी उमर प्रभावित झाला व त्याने स्वत:ला जिहादासाठी झोकून दिले. त्याने पाकिस्तानात शस्त्रास्त्र आणि दारूगोळ्याचे प्रशिक्षण घेण्याची इच्छा व्यक्त केली. तो पाकिस्तानातून सर्व कारवायांवर नियंत्रण ठेवायचा. आरोपी अब्दुल रहमानने पाकिस्तानी दहशतवादी सलीम, मन्सूर आणि सज्जादला भारतात सुरक्षित आश्रय दिला. हे तिघेही जैश-ए-मोहम्मदचे सदस्य होते. इ.स. २००१ साली उत्तर प्रदेशात झालेल्या गोळीबारात ते ठार झाले. तीनही पाकिस्तानी दहशतवादी बाबरी मशीद विध्वंसाचा बदला घेण्यासाठी भारतात आले होते. अयोध्येतील राममंदिरावर हल्ला करण्याची त्यांची योजना होती.

(वृत्तसंस्था)>काही जण पाकला गेलेजिहादसाठी काही तरुण पाकिस्तानात गेले आणि तेथे त्यांनी जमात-उद-दावाचा प्रमुख हाफिज सईद, लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख झकी उर रहमान लखवी व इतर जहाल दहशतवाद्यांची भेट घेतली, असेही या आरोपपत्रात नमूद आहे.