शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

निरंकारी संप्रदाय बुडाला शोकसागरात बाबा हरदेव सिंह ब्रšालीन : प्रार्थना व शोकसभेद्वारे श्रद्धांजली

By admin | Updated: May 13, 2016 22:35 IST

जळगाव : निरंकारी संप्रदायाचे प्रमुख बाबा हरदेव सिंह यांच्या अपघाती निधनाने जळगावातील निरंकारी संप्रदायावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. शहरात बाबांना प्रार्थना व शोकसभेद्वारे श्रद्धांजली वाहण्यात आली.

जळगाव : निरंकारी संप्रदायाचे प्रमुख बाबा हरदेव सिंह यांच्या अपघाती निधनाने जळगावातील निरंकारी संप्रदायावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. शहरात बाबांना प्रार्थना व शोकसभेद्वारे श्रद्धांजली वाहण्यात आली.
देशासह जगभरात निरंकारी पंथाची महती पोहोचवण्यात महत्त्वाची कामगिरी बजावणार्‍या बाबा हरदेव सिंह यांचे कॅनडाच्या मॉन्ट्रियल शहरात एका कार्यक्रमासाठी जात असताना कारचा अपघात होऊन निधन झाले. हे वृत्त शहरात कळताच सर्वांना दु:ख अनावर झाले. त्यावेळी शिरसोली रस्त्यावरील संत निरंकारी सत्संग भवनाकडे सर्वांची पावले वळली. त्या ठिकाणी ४०० ते ५०० अनुयायांनी एकत्र येत प्रार्थना केली. तसेच रात्री आठ ते नऊ वाजे दरम्यान शोकसभा झाली.
सध्या जिल्‘ात हरदेव सिंह यांच्या निरंकारी पंथाच्या आठ शाखा असून जिल्हाभरात १० हजार अनुयायी आहे. या सर्वांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

नऊ वर्षांपूर्वी जळगावात सत्संग...
२००७ मध्ये शहरातील आयएमआर महाविद्यालयाच्या प्रांगणात बाबा हरदेव सिंह यांचा एक दिवसाचा भव्य सत्संग झाला होता. त्या निमित्त ते जळगावात येऊन गेल्याची आठवण असल्याचे अनुयायांनी सांगितले. तसेच बाबांनी जे मार्गदर्शन केले त्यामुळे आम्ही घडू शकलो, असे सांगून अनेकांना बोलताना दु:ख अनावर झाले व त्यांना आश्रू रोखता आले नाही.

अंत्यदर्शनासाठी भक्त जाणार....
संप्रदायाचे मुख्यालय दिल्लीत असून बाबांचा मृतदेह तेथे कधी आणतात हे अजून नक्की नाही. बाबांच्या अंत्यदर्शनाची हजारो भक्तांना ओढ लागली असली तरी जगभरातून भक्त येणार असल्याने दिल्लीत एवढी व्यवस्था शक्य नाही, त्यामुळे मोजकेच भक्त जिल्‘ातून जातील, असे सांगण्यात आले.

बाबा जगाचे मालक होते. ते ज्ञान देऊन गेले. त्यांच्यामुळेच संसार सुधारला गेला. संपूर्ण संप्रदायावर दु:ख कोसळले आहे.
रमेश आहुजा, जिल्हा संयोजक.

बाबांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरुन निघणार नाही. त्यांनी सर्वांना एकतेचा संदेश दिला. ते आम्ही कधीही विसरू शकत नाही.
-सुशील राका.

बाबांनी सदैव मानवतेसाठी काम केले. त्यांच्या जाण्याने मानव जातीचे नुकसान झाले आहे. ते कधीही भरुन निघणार नाही.
- राजकुमार वाणी, ज्ञान प्रचारक.


निरंकारी संप्रदाय परिवारावर दु:ख कोसळले आहे. बाबांनी जीवनाचा उद्देश शिकविला. ते शरीराने जरी गेले असले तरी त्यांचा संदेश सदैव आमच्यात राहील.
- विलास पाटील, सेवादल संघटन