शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
2
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
3
संसाराची स्वप्न रंगवून पतीच्या घरी आली अन्...; लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यात नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
4
बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मती फिरली आणि चीनला गेला...
5
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराबाबत WMO चा भयानक रिपोर्ट; भारताच्या किनारपट्टीवरील शहरांना धोका
6
Turmeric Glow Trend: हळद ट्रेंड फॉलो कराल तर भयंकर संकट ओढावून घ्याल; ज्योतिषांचा अनोखा दावा!
7
'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत
8
विमान प्रवास स्वस्त होणार! इंधन भरण्याचा त्रास संपणार, पहिल्यांदाच 'या' तंत्रज्ञानाचा वापर करुन विमान उड्डाण करणार
9
IND vs ENG: ऋषभ पंतची दोन डावात दोन शतकं, पण ICC ने केली कारवाई, कारण काय?
10
इराणच्या हल्ल्यात प्रचंड वित्तहानी, आयरन डोमच्या मर्यादा उघड, युद्धातून इस्राइलला मिळाले हे पाच धडे 
11
Raigad Boat Capsizes: रायगडमध्ये सावित्री नदीत बोट उलटली; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ समोर!
12
कमी व्याजदरावर होम लोन घ्यायचंय? 'या' सरकारी बँका ठरू शकतात बेस्ट; ७.५०% पेक्षाही कमी आहेत दर 
13
ड्रॅगनची वळवळ; पँगाँग सरोवराजवळ चीन नेमकं करतोय काय? सॅटेलाईट फोटोंमधून झाली पोलखोल  
14
Raipur Crime: रायपूरमध्ये 'नीळ्या ड्रम'सारखी घटना, सुटकेसमध्ये सिमेंट भरुन गोठवला तरुणाचा मृतदेह
15
'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी पाकिस्तानने पैसे दिले'; लष्करातील गद्दार जवानाने उघड केले गुपित, बँके खात्यांची चौकशी सुरू
16
खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना, अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा
17
Zerodha च्या कामथ बंधूंनी 'या' कंपनीचे २५० कोटींचे शेअर्स खरेदी केले; मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी खेळला मोठा डाव 
18
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
19
'ट्रॅजेडी क्वीन'वर येणार सिनेमा, 'या' अभिनेत्रीला ऑफर झाली मीना कुमारींची भूमिका
20
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!

निरंकारी संप्रदाय बुडाला शोकसागरात बाबा हरदेव सिंह ब्रšालीन : प्रार्थना व शोकसभेद्वारे श्रद्धांजली

By admin | Updated: May 13, 2016 22:35 IST

जळगाव : निरंकारी संप्रदायाचे प्रमुख बाबा हरदेव सिंह यांच्या अपघाती निधनाने जळगावातील निरंकारी संप्रदायावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. शहरात बाबांना प्रार्थना व शोकसभेद्वारे श्रद्धांजली वाहण्यात आली.

जळगाव : निरंकारी संप्रदायाचे प्रमुख बाबा हरदेव सिंह यांच्या अपघाती निधनाने जळगावातील निरंकारी संप्रदायावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. शहरात बाबांना प्रार्थना व शोकसभेद्वारे श्रद्धांजली वाहण्यात आली.
देशासह जगभरात निरंकारी पंथाची महती पोहोचवण्यात महत्त्वाची कामगिरी बजावणार्‍या बाबा हरदेव सिंह यांचे कॅनडाच्या मॉन्ट्रियल शहरात एका कार्यक्रमासाठी जात असताना कारचा अपघात होऊन निधन झाले. हे वृत्त शहरात कळताच सर्वांना दु:ख अनावर झाले. त्यावेळी शिरसोली रस्त्यावरील संत निरंकारी सत्संग भवनाकडे सर्वांची पावले वळली. त्या ठिकाणी ४०० ते ५०० अनुयायांनी एकत्र येत प्रार्थना केली. तसेच रात्री आठ ते नऊ वाजे दरम्यान शोकसभा झाली.
सध्या जिल्‘ात हरदेव सिंह यांच्या निरंकारी पंथाच्या आठ शाखा असून जिल्हाभरात १० हजार अनुयायी आहे. या सर्वांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

नऊ वर्षांपूर्वी जळगावात सत्संग...
२००७ मध्ये शहरातील आयएमआर महाविद्यालयाच्या प्रांगणात बाबा हरदेव सिंह यांचा एक दिवसाचा भव्य सत्संग झाला होता. त्या निमित्त ते जळगावात येऊन गेल्याची आठवण असल्याचे अनुयायांनी सांगितले. तसेच बाबांनी जे मार्गदर्शन केले त्यामुळे आम्ही घडू शकलो, असे सांगून अनेकांना बोलताना दु:ख अनावर झाले व त्यांना आश्रू रोखता आले नाही.

अंत्यदर्शनासाठी भक्त जाणार....
संप्रदायाचे मुख्यालय दिल्लीत असून बाबांचा मृतदेह तेथे कधी आणतात हे अजून नक्की नाही. बाबांच्या अंत्यदर्शनाची हजारो भक्तांना ओढ लागली असली तरी जगभरातून भक्त येणार असल्याने दिल्लीत एवढी व्यवस्था शक्य नाही, त्यामुळे मोजकेच भक्त जिल्‘ातून जातील, असे सांगण्यात आले.

बाबा जगाचे मालक होते. ते ज्ञान देऊन गेले. त्यांच्यामुळेच संसार सुधारला गेला. संपूर्ण संप्रदायावर दु:ख कोसळले आहे.
रमेश आहुजा, जिल्हा संयोजक.

बाबांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरुन निघणार नाही. त्यांनी सर्वांना एकतेचा संदेश दिला. ते आम्ही कधीही विसरू शकत नाही.
-सुशील राका.

बाबांनी सदैव मानवतेसाठी काम केले. त्यांच्या जाण्याने मानव जातीचे नुकसान झाले आहे. ते कधीही भरुन निघणार नाही.
- राजकुमार वाणी, ज्ञान प्रचारक.


निरंकारी संप्रदाय परिवारावर दु:ख कोसळले आहे. बाबांनी जीवनाचा उद्देश शिकविला. ते शरीराने जरी गेले असले तरी त्यांचा संदेश सदैव आमच्यात राहील.
- विलास पाटील, सेवादल संघटन