शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

निरंकारी संप्रदाय बुडाला शोकसागरात बाबा हरदेव सिंह ब्रšालीन : प्रार्थना व शोकसभेद्वारे श्रद्धांजली

By admin | Updated: May 13, 2016 22:35 IST

जळगाव : निरंकारी संप्रदायाचे प्रमुख बाबा हरदेव सिंह यांच्या अपघाती निधनाने जळगावातील निरंकारी संप्रदायावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. शहरात बाबांना प्रार्थना व शोकसभेद्वारे श्रद्धांजली वाहण्यात आली.

जळगाव : निरंकारी संप्रदायाचे प्रमुख बाबा हरदेव सिंह यांच्या अपघाती निधनाने जळगावातील निरंकारी संप्रदायावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. शहरात बाबांना प्रार्थना व शोकसभेद्वारे श्रद्धांजली वाहण्यात आली.
देशासह जगभरात निरंकारी पंथाची महती पोहोचवण्यात महत्त्वाची कामगिरी बजावणार्‍या बाबा हरदेव सिंह यांचे कॅनडाच्या मॉन्ट्रियल शहरात एका कार्यक्रमासाठी जात असताना कारचा अपघात होऊन निधन झाले. हे वृत्त शहरात कळताच सर्वांना दु:ख अनावर झाले. त्यावेळी शिरसोली रस्त्यावरील संत निरंकारी सत्संग भवनाकडे सर्वांची पावले वळली. त्या ठिकाणी ४०० ते ५०० अनुयायांनी एकत्र येत प्रार्थना केली. तसेच रात्री आठ ते नऊ वाजे दरम्यान शोकसभा झाली.
सध्या जिल्‘ात हरदेव सिंह यांच्या निरंकारी पंथाच्या आठ शाखा असून जिल्हाभरात १० हजार अनुयायी आहे. या सर्वांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

नऊ वर्षांपूर्वी जळगावात सत्संग...
२००७ मध्ये शहरातील आयएमआर महाविद्यालयाच्या प्रांगणात बाबा हरदेव सिंह यांचा एक दिवसाचा भव्य सत्संग झाला होता. त्या निमित्त ते जळगावात येऊन गेल्याची आठवण असल्याचे अनुयायांनी सांगितले. तसेच बाबांनी जे मार्गदर्शन केले त्यामुळे आम्ही घडू शकलो, असे सांगून अनेकांना बोलताना दु:ख अनावर झाले व त्यांना आश्रू रोखता आले नाही.

अंत्यदर्शनासाठी भक्त जाणार....
संप्रदायाचे मुख्यालय दिल्लीत असून बाबांचा मृतदेह तेथे कधी आणतात हे अजून नक्की नाही. बाबांच्या अंत्यदर्शनाची हजारो भक्तांना ओढ लागली असली तरी जगभरातून भक्त येणार असल्याने दिल्लीत एवढी व्यवस्था शक्य नाही, त्यामुळे मोजकेच भक्त जिल्‘ातून जातील, असे सांगण्यात आले.

बाबा जगाचे मालक होते. ते ज्ञान देऊन गेले. त्यांच्यामुळेच संसार सुधारला गेला. संपूर्ण संप्रदायावर दु:ख कोसळले आहे.
रमेश आहुजा, जिल्हा संयोजक.

बाबांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरुन निघणार नाही. त्यांनी सर्वांना एकतेचा संदेश दिला. ते आम्ही कधीही विसरू शकत नाही.
-सुशील राका.

बाबांनी सदैव मानवतेसाठी काम केले. त्यांच्या जाण्याने मानव जातीचे नुकसान झाले आहे. ते कधीही भरुन निघणार नाही.
- राजकुमार वाणी, ज्ञान प्रचारक.


निरंकारी संप्रदाय परिवारावर दु:ख कोसळले आहे. बाबांनी जीवनाचा उद्देश शिकविला. ते शरीराने जरी गेले असले तरी त्यांचा संदेश सदैव आमच्यात राहील.
- विलास पाटील, सेवादल संघटन