शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
2
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
3
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
4
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
5
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
6
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
7
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
8
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
10
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
11
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
12
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
13
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
14
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
15
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
16
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
17
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
18
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
19
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
20
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
Daily Top 2Weekly Top 5

निरंकारी संप्रदाय बुडाला शोकसागरात बाबा हरदेव सिंह ब्रšालीन : प्रार्थना व शोकसभेद्वारे श्रद्धांजली

By admin | Updated: May 13, 2016 22:35 IST

जळगाव : निरंकारी संप्रदायाचे प्रमुख बाबा हरदेव सिंह यांच्या अपघाती निधनाने जळगावातील निरंकारी संप्रदायावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. शहरात बाबांना प्रार्थना व शोकसभेद्वारे श्रद्धांजली वाहण्यात आली.

जळगाव : निरंकारी संप्रदायाचे प्रमुख बाबा हरदेव सिंह यांच्या अपघाती निधनाने जळगावातील निरंकारी संप्रदायावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. शहरात बाबांना प्रार्थना व शोकसभेद्वारे श्रद्धांजली वाहण्यात आली.
देशासह जगभरात निरंकारी पंथाची महती पोहोचवण्यात महत्त्वाची कामगिरी बजावणार्‍या बाबा हरदेव सिंह यांचे कॅनडाच्या मॉन्ट्रियल शहरात एका कार्यक्रमासाठी जात असताना कारचा अपघात होऊन निधन झाले. हे वृत्त शहरात कळताच सर्वांना दु:ख अनावर झाले. त्यावेळी शिरसोली रस्त्यावरील संत निरंकारी सत्संग भवनाकडे सर्वांची पावले वळली. त्या ठिकाणी ४०० ते ५०० अनुयायांनी एकत्र येत प्रार्थना केली. तसेच रात्री आठ ते नऊ वाजे दरम्यान शोकसभा झाली.
सध्या जिल्‘ात हरदेव सिंह यांच्या निरंकारी पंथाच्या आठ शाखा असून जिल्हाभरात १० हजार अनुयायी आहे. या सर्वांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

नऊ वर्षांपूर्वी जळगावात सत्संग...
२००७ मध्ये शहरातील आयएमआर महाविद्यालयाच्या प्रांगणात बाबा हरदेव सिंह यांचा एक दिवसाचा भव्य सत्संग झाला होता. त्या निमित्त ते जळगावात येऊन गेल्याची आठवण असल्याचे अनुयायांनी सांगितले. तसेच बाबांनी जे मार्गदर्शन केले त्यामुळे आम्ही घडू शकलो, असे सांगून अनेकांना बोलताना दु:ख अनावर झाले व त्यांना आश्रू रोखता आले नाही.

अंत्यदर्शनासाठी भक्त जाणार....
संप्रदायाचे मुख्यालय दिल्लीत असून बाबांचा मृतदेह तेथे कधी आणतात हे अजून नक्की नाही. बाबांच्या अंत्यदर्शनाची हजारो भक्तांना ओढ लागली असली तरी जगभरातून भक्त येणार असल्याने दिल्लीत एवढी व्यवस्था शक्य नाही, त्यामुळे मोजकेच भक्त जिल्‘ातून जातील, असे सांगण्यात आले.

बाबा जगाचे मालक होते. ते ज्ञान देऊन गेले. त्यांच्यामुळेच संसार सुधारला गेला. संपूर्ण संप्रदायावर दु:ख कोसळले आहे.
रमेश आहुजा, जिल्हा संयोजक.

बाबांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरुन निघणार नाही. त्यांनी सर्वांना एकतेचा संदेश दिला. ते आम्ही कधीही विसरू शकत नाही.
-सुशील राका.

बाबांनी सदैव मानवतेसाठी काम केले. त्यांच्या जाण्याने मानव जातीचे नुकसान झाले आहे. ते कधीही भरुन निघणार नाही.
- राजकुमार वाणी, ज्ञान प्रचारक.


निरंकारी संप्रदाय परिवारावर दु:ख कोसळले आहे. बाबांनी जीवनाचा उद्देश शिकविला. ते शरीराने जरी गेले असले तरी त्यांचा संदेश सदैव आमच्यात राहील.
- विलास पाटील, सेवादल संघटन