शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

‘आयुर्वेदिक’ने रुग्ण पूर्णपणे बरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 05:12 IST

दिल्लीच्या संस्थेत उपचार : एकही जण दगावला नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : दिल्ली येथील आॅल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ आयुर्वेद (एआयआयए) या संस्थेच्या रुग्णालयात दाखल केलेल्यांपैकी अनेक जण पूर्णपणे बरे झाले आहेत. या संस्थेतील एकही कोरोना रुग्ण दगावल्याची घटना घडलेली नाही, असे आयुष मंत्रालयाने म्हटले आहे.आयुष मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे की, एआयआयएमध्ये संपूर्ण आयुर्वेदिक उपचार करण्यात आलेल्या रुग्णांना औषधे देण्याबरोबरच उपचारांमध्ये संतुलित आहार व योगासनांची जोड देण्यात आली. त्यामुळे कोरोनाचे अनेक रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना कोरोना संसगार्मुळे अन्य कोणतीही व्याधी जडली नसल्याचे दिसून आले आहे. या संस्थेच्या रुग्णालयात दाखल केलेल्या रुग्णांपैकी एकही रुग्ण दगावलेला नाही.आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी सरिता विहार येथील एआयआयएच्या कोरोना उपचार केंद्राला नुकतीच भेट दिली. तिथे उपचारांच्या सोयीची त्यांनी पाहणी केली. ते म्हणाले, प्राचीन संस्कृतीचा वारसा लाभलेल्या आयुर्वेदिक उपचार पद्धतीमध्ये कोरोनाचा संसर्ग रोखण्याची मोठी क्षमता आहे.सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झालाआयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी म्हटले की, एआयआयएने कोरोना रुग्णांना पूर्णपणे बरे करून एक महत्त्वाची कामगिरी केली आहे. एआयआयएच्या कोरोना उपचार केंद्रांमधून बरे होऊन घरी गेलेल्या सर्व रुग्णांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला आहे. त्याचा त्यांना आयुष्यातील इतर प्रसंगांच्या वेळीही चांगला उपयोग होईल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या