शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

राम मंदिराच्या प्रवेशद्वारावर लाखो बूट आणि चप्पलांचा ढीग; नव्या नियमामुळे लोकांनी परत घेऊन येणं टाळलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 17:56 IST

अयोध्येत राम मंदिराच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना नव्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

Ayodhya Ram Mandir: महाकुंभ मेळ्यानंतर आता भाविकांची पावले अयोध्येतल्या राम मंदिराकडे वळाली आहेत. गेल्या काही महिन्यांपासून अयोध्येतील राम मंदिरांत मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत आहे. त्यामुळे प्रशासनालाही कोणतीही दुर्घटना होऊ नये म्हणून काळजी घ्यावी लागतेय. प्रशासनाकडून गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी चोख बंदोबस्त आणि नियोजन करण्यात आलं आहे. मात्र याचा काही प्रमाणात भाविकांनाही त्रास होताना दिसत आहे. राम मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांना त्यांच्या चप्पल किंवा बुटांसाठी पाच किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे.

प्रभू रामाचे दर्शन घेण्यासाठी गेल्या दीड महिन्यापासून अयोध्येत मोठ्या प्रमाणात गर्दी होतेय. त्यामुळे तिथल्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना वेगळ्याच समस्येचा सामना करावा लागतोय. गर्दीमुळे तिथल्या दर्शनाच्या व्यवस्थापनाचे काही नियम बदलण्यात आले आहेत. त्यामुळे भाविक मंदिराच्या मुख्य प्रवेशदाराच्या आसपास त्याच्या चपला आणि बूट काढून जात आहे. मात्र ते परत घेण्यासाठी अनेक जण येत नसल्याने त्यांना हटवणे हे प्रशासनासाठी मोठं आव्हान बनलं आहे. त्यामुळे मंदिराच्या प्रवेशद्वारावर दररोज लाखो बूट आणि चप्पल जेसीबी मशिनद्वारे ट्रॉलीमध्ये भरून ४-५ किलोमीटर अंतरावर टाकले जात आहेत.

गेल्या महिनाभरापासून अयोध्या महानगरपालिकेचा राम मंदिराजवळ काढलेल्या चपला आणि बुटांची विल्हेवाट लावण्याचा कार्यक्रम सुरु आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारातून जेसीबीच्या साहाय्याने दररोज सुमारे लाखो बूट आणि चप्पल गोळा केल्या जातात. त्यानंतर ते ट्रॉलीमध्ये भरून ५ किलोमीटर अंतरावर फेकल्या जात आहेत.

गर्दी व्यवस्थापनाच्या नियमात बदल केल्यापासून महापालिका आणि भाविकांना या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. राममंदिराचे गेट क्रमांक एक हे राम मार्गावर असलेले प्रवेशद्वार आहे. भाविकांना चपल्ल येथे जमा करण्यास सांगितले जात आहे. दर्शन झाल्यानंतर मंदिर परिसरात सुमारे अर्धा किलोमीटरची पायपीट केल्यानंतर लोकांना चप्पल घेण्यासाठी त्याच गेटवर परतावे लागतं. मात्र गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अयोध्या प्रशासनाने लोकांना गेट क्रमांक तीन आणि इतर गेटमधून बाहेर पडण्याच्या सूचना दिल्या आहेत.

त्यामुळे भाविकांना त्यांची चप्पल आणि बूट परत मिळवण्यासाठी गेट क्रमांक एकवर यावे लागत आहे. त्यासाठी लोकांना ४-५ किलोमीटरचा प्रवास करावा लागतोय. अनेक लोक बूट आणि चप्पल तिथेच सोडून अनवाणी मंदिरातून बाहेर पडत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

"दर्शनानंतर भाविक श्री राम हॉस्पिटलच्या पुढे जातात. रामपथ हा एकेरी मार्ग असल्याने भाविकांना चप्पल ठेवण्याच्या ठिकाणी जाण्यासाठी पुन्हा ५ ते ६ किलोमीटर चालत जावे लागते. त्यामुळेच गेट क्रमांक एकवर चपला-चप्पलांचा ढीग साचला आहे," अशी माहिती श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्रा यांनी म्हटलं.

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरUttar Pradeshउत्तर प्रदेश