शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
4
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
5
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
6
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
7
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
8
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
9
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
10
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
11
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
12
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
13
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
14
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
15
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
16
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
17
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
18
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
19
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा

राम मंदिराच्या प्रवेशद्वारावर लाखो बूट आणि चप्पलांचा ढीग; नव्या नियमामुळे लोकांनी परत घेऊन येणं टाळलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 17:56 IST

अयोध्येत राम मंदिराच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना नव्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

Ayodhya Ram Mandir: महाकुंभ मेळ्यानंतर आता भाविकांची पावले अयोध्येतल्या राम मंदिराकडे वळाली आहेत. गेल्या काही महिन्यांपासून अयोध्येतील राम मंदिरांत मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत आहे. त्यामुळे प्रशासनालाही कोणतीही दुर्घटना होऊ नये म्हणून काळजी घ्यावी लागतेय. प्रशासनाकडून गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी चोख बंदोबस्त आणि नियोजन करण्यात आलं आहे. मात्र याचा काही प्रमाणात भाविकांनाही त्रास होताना दिसत आहे. राम मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांना त्यांच्या चप्पल किंवा बुटांसाठी पाच किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे.

प्रभू रामाचे दर्शन घेण्यासाठी गेल्या दीड महिन्यापासून अयोध्येत मोठ्या प्रमाणात गर्दी होतेय. त्यामुळे तिथल्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना वेगळ्याच समस्येचा सामना करावा लागतोय. गर्दीमुळे तिथल्या दर्शनाच्या व्यवस्थापनाचे काही नियम बदलण्यात आले आहेत. त्यामुळे भाविक मंदिराच्या मुख्य प्रवेशदाराच्या आसपास त्याच्या चपला आणि बूट काढून जात आहे. मात्र ते परत घेण्यासाठी अनेक जण येत नसल्याने त्यांना हटवणे हे प्रशासनासाठी मोठं आव्हान बनलं आहे. त्यामुळे मंदिराच्या प्रवेशद्वारावर दररोज लाखो बूट आणि चप्पल जेसीबी मशिनद्वारे ट्रॉलीमध्ये भरून ४-५ किलोमीटर अंतरावर टाकले जात आहेत.

गेल्या महिनाभरापासून अयोध्या महानगरपालिकेचा राम मंदिराजवळ काढलेल्या चपला आणि बुटांची विल्हेवाट लावण्याचा कार्यक्रम सुरु आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारातून जेसीबीच्या साहाय्याने दररोज सुमारे लाखो बूट आणि चप्पल गोळा केल्या जातात. त्यानंतर ते ट्रॉलीमध्ये भरून ५ किलोमीटर अंतरावर फेकल्या जात आहेत.

गर्दी व्यवस्थापनाच्या नियमात बदल केल्यापासून महापालिका आणि भाविकांना या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. राममंदिराचे गेट क्रमांक एक हे राम मार्गावर असलेले प्रवेशद्वार आहे. भाविकांना चपल्ल येथे जमा करण्यास सांगितले जात आहे. दर्शन झाल्यानंतर मंदिर परिसरात सुमारे अर्धा किलोमीटरची पायपीट केल्यानंतर लोकांना चप्पल घेण्यासाठी त्याच गेटवर परतावे लागतं. मात्र गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अयोध्या प्रशासनाने लोकांना गेट क्रमांक तीन आणि इतर गेटमधून बाहेर पडण्याच्या सूचना दिल्या आहेत.

त्यामुळे भाविकांना त्यांची चप्पल आणि बूट परत मिळवण्यासाठी गेट क्रमांक एकवर यावे लागत आहे. त्यासाठी लोकांना ४-५ किलोमीटरचा प्रवास करावा लागतोय. अनेक लोक बूट आणि चप्पल तिथेच सोडून अनवाणी मंदिरातून बाहेर पडत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

"दर्शनानंतर भाविक श्री राम हॉस्पिटलच्या पुढे जातात. रामपथ हा एकेरी मार्ग असल्याने भाविकांना चप्पल ठेवण्याच्या ठिकाणी जाण्यासाठी पुन्हा ५ ते ६ किलोमीटर चालत जावे लागते. त्यामुळेच गेट क्रमांक एकवर चपला-चप्पलांचा ढीग साचला आहे," अशी माहिती श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्रा यांनी म्हटलं.

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरUttar Pradeshउत्तर प्रदेश