शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

राम मंदिराच्या प्रवेशद्वारावर लाखो बूट आणि चप्पलांचा ढीग; नव्या नियमामुळे लोकांनी परत घेऊन येणं टाळलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 17:56 IST

अयोध्येत राम मंदिराच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना नव्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

Ayodhya Ram Mandir: महाकुंभ मेळ्यानंतर आता भाविकांची पावले अयोध्येतल्या राम मंदिराकडे वळाली आहेत. गेल्या काही महिन्यांपासून अयोध्येतील राम मंदिरांत मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत आहे. त्यामुळे प्रशासनालाही कोणतीही दुर्घटना होऊ नये म्हणून काळजी घ्यावी लागतेय. प्रशासनाकडून गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी चोख बंदोबस्त आणि नियोजन करण्यात आलं आहे. मात्र याचा काही प्रमाणात भाविकांनाही त्रास होताना दिसत आहे. राम मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांना त्यांच्या चप्पल किंवा बुटांसाठी पाच किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे.

प्रभू रामाचे दर्शन घेण्यासाठी गेल्या दीड महिन्यापासून अयोध्येत मोठ्या प्रमाणात गर्दी होतेय. त्यामुळे तिथल्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना वेगळ्याच समस्येचा सामना करावा लागतोय. गर्दीमुळे तिथल्या दर्शनाच्या व्यवस्थापनाचे काही नियम बदलण्यात आले आहेत. त्यामुळे भाविक मंदिराच्या मुख्य प्रवेशदाराच्या आसपास त्याच्या चपला आणि बूट काढून जात आहे. मात्र ते परत घेण्यासाठी अनेक जण येत नसल्याने त्यांना हटवणे हे प्रशासनासाठी मोठं आव्हान बनलं आहे. त्यामुळे मंदिराच्या प्रवेशद्वारावर दररोज लाखो बूट आणि चप्पल जेसीबी मशिनद्वारे ट्रॉलीमध्ये भरून ४-५ किलोमीटर अंतरावर टाकले जात आहेत.

गेल्या महिनाभरापासून अयोध्या महानगरपालिकेचा राम मंदिराजवळ काढलेल्या चपला आणि बुटांची विल्हेवाट लावण्याचा कार्यक्रम सुरु आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारातून जेसीबीच्या साहाय्याने दररोज सुमारे लाखो बूट आणि चप्पल गोळा केल्या जातात. त्यानंतर ते ट्रॉलीमध्ये भरून ५ किलोमीटर अंतरावर फेकल्या जात आहेत.

गर्दी व्यवस्थापनाच्या नियमात बदल केल्यापासून महापालिका आणि भाविकांना या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. राममंदिराचे गेट क्रमांक एक हे राम मार्गावर असलेले प्रवेशद्वार आहे. भाविकांना चपल्ल येथे जमा करण्यास सांगितले जात आहे. दर्शन झाल्यानंतर मंदिर परिसरात सुमारे अर्धा किलोमीटरची पायपीट केल्यानंतर लोकांना चप्पल घेण्यासाठी त्याच गेटवर परतावे लागतं. मात्र गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अयोध्या प्रशासनाने लोकांना गेट क्रमांक तीन आणि इतर गेटमधून बाहेर पडण्याच्या सूचना दिल्या आहेत.

त्यामुळे भाविकांना त्यांची चप्पल आणि बूट परत मिळवण्यासाठी गेट क्रमांक एकवर यावे लागत आहे. त्यासाठी लोकांना ४-५ किलोमीटरचा प्रवास करावा लागतोय. अनेक लोक बूट आणि चप्पल तिथेच सोडून अनवाणी मंदिरातून बाहेर पडत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

"दर्शनानंतर भाविक श्री राम हॉस्पिटलच्या पुढे जातात. रामपथ हा एकेरी मार्ग असल्याने भाविकांना चप्पल ठेवण्याच्या ठिकाणी जाण्यासाठी पुन्हा ५ ते ६ किलोमीटर चालत जावे लागते. त्यामुळेच गेट क्रमांक एकवर चपला-चप्पलांचा ढीग साचला आहे," अशी माहिती श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्रा यांनी म्हटलं.

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरUttar Pradeshउत्तर प्रदेश