शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
2
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
3
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
4
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
5
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
6
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
7
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
8
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
9
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
10
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
11
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
12
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
13
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
14
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
15
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
16
Nagpur: संधी मिळताच प्रवाशांना लुटायचे, रेल्वे स्थानकांवर चोऱ्या करणारी टोळी अटकेत
17
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट
18
"बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे, छोट्या कलाकारांकडे तर...", कल्कि कोचलीनचा खुलासा
19
प्रीतीचा 'मोहरा' विमानातून उतरला जयपूरमध्ये अन् त्याचं लगेज पोहचलं बंगळुरुला; मग भाऊनं असा काढला राग
20
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प

रस्ते अपघात ५० टक्के कमी करण्याचे प्रयत्न

By admin | Updated: January 12, 2016 02:06 IST

भारतात दरवर्षी सुमारे पाच लाख अपघात होतात. त्यात साधारणत: दीड लाख लोक मृत्युमुखी पडतात आणि तीन लाख लोक कायमचे अपंग होतात. अपघातात जीव गमावणाऱ्यांमध्ये

- सुरेश भटेवरा,  नवी दिल्लीभारतात दरवर्षी सुमारे पाच लाख अपघात होतात. त्यात साधारणत: दीड लाख लोक मृत्युमुखी पडतात आणि तीन लाख लोक कायमचे अपंग होतात. अपघातात जीव गमावणाऱ्यांमध्ये २५ ते ३० वयोगटातील तरुणांची संख्या मोठी आहे. देशाचे ५५ ते ६० कोटींचे नुकसान होते. ही रक्कम देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या ३ टक्के आहे. हे महाभयंकर नुकसान टळावे व अपघाताचे प्रमाण किमान ५० टक्क्यांनी घटावे, यासाठी केंद्रीय परिवहन मंत्रालयाने विविध उपाययोजनांना वेगाने प्रारंभ केला आहे, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पत्रकारांना दिली. देशभर रस्ता सुरक्षा सप्ताह सोमवारपासून सुरू झाला. दिल्लीत इंडिया गेटवर त्याचे झेंडा दाखवून औपचारिक उद्घाटन गृहमंत्री राजनाथसिंह यांनी केले. यावेळी गडकरींनी संवाद साधला.भारतात वाढत्या अपघातांची तीन प्रमुख कारणे आहेत. रस्त्यांची नागमोडी वळणे, अप्रशिक्षित चालकांना सर्रास वाहनचालक परवाना देणे तसेच वाहनचालक व वाहनांना परवाना देण्याच्या पध्दतीतील ठळक त्रुटी. प्रचलित व्यवस्थेत आमूलाग्र बदल करण्यासाठी संगणकाद्वारे नियंत्रित कठोर परीक्षेत उत्तीर्ण झाल्याशिवाय यापुढे वाहनचालक परवाना कोणालाही मिळणार नाही, असे नमूद करीत गडकरी म्हणाले, संगणकाद्वारे नियंत्रित ड्रायव्हिंगची अत्याधुनिक परीक्षा घेण्याची केंद्रे प.बंगाल, राजस्थान तसेच महाराष्ट्रात पुणे येथे ५ ते ६ एकर जागेत सुरू झाली आहेत. लवकरच अशी केंद्रे देशभर स्थापन केली जातील.