शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
3
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
6
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
7
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
8
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
9
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
10
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
11
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
12
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
13
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
14
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
15
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
16
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
17
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
18
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
19
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
20
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा

आसाम, बिहारमध्ये पुराचे थैमान, ५१ बळी

By admin | Updated: July 31, 2016 05:01 IST

बिहार आणि आसाममधील पूरपरिस्थिती बिघडतच चालली असून, आतापर्यंत या दोन्ही राज्यांतील पुरात ५१ जणांचा बळी गेला

पाटणा/गुवाहाटी : बिहार आणि आसाममधील पूरपरिस्थिती बिघडतच चालली असून, आतापर्यंत या दोन्ही राज्यांतील पुरात ५१ जणांचा बळी गेला आहे. बिहारमधील मृतांची संख्या २६ आणि आसामधील आकडा २५ आहे. दोन्ही राज्यांत धोक्याच्या पातळीवरून वाहणाऱ्या नद्यांचा फटका ४१ लाख लोकांना बसला आहे. केंद्र सरकारने आसाममधील पुरात मरण पावलेल्यांच्या नातेवाईकांना चार लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. मात्र, बिहारबाबत केंद्राने असा निर्णय अद्याप घेतलेला नाही. ओडिशामध्येही जोरदार पाऊस सुरू झाला असून, तिथे शनिवारी ठिकठिकाणी विजा पडून २९ जण मरण पावल्याचे वृत्त आहे. पिके भुईसपाट बिहारमध्ये गंभीर पुरस्थितीचा पुर्णिया, किशनगंज, अरारिया, दरभंगा, माधेपुरा, भागलपूर, कथिहार, सहरसा, सुपौल आणि गोपाल या जिल्ह्यांतील २१.९९ लाख लोकांना तडाखा बसला. १.८३ लाख हेक्टर एवढे क्षेत्र पाण्याखाली असून, ०.८३ लाख हेक्टरवरील पिके भुईसपाट झाली आहेत. पाऊस आणि पुरामुळे झालेल्या हानीचा आढावा घेणे सुरू आहे. (वृत्तसंस्था)>आसाममध्ये २१ जण मृत्युमुखीआसाममध्ये पुराचे थैमान सुरूच असून, मुसळधार पाऊस आणि फुगलेल्या नद्यांचा १९ लाख लोकांना फटका बसला आहे. अरुणाचल प्रदेश आणि भूतानमधील संततधार पावसामुळे आसाममध्ये पूरस्थिती निर्माण झाली. लखीमपूर, गोलाघाट, बोंगाईगाव, जोरहाट, ढेमाजी, बारपेटा, गोलपारा, धुबरी, दरांग, मोरीगाव आणि सोनीतपूर या जिल्ह्यांना पुराचा प्रचंड तडाखा बसला आहे, याशिवाय सिवसागर, कोकराझार, दिब्रूगड, गोलपारा, तिनसुकिया, बिस्वनाथ, नलबारी, बकसा, कामरूप (एम), चिरांग, कामरूप आणि दक्षिण कामरूप या जिल्ह्यांनाही झळ बसली आहे. आसाममधील पुरात आतापर्यंत २१ जणांचा बळी गेला आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी आज हेलीकॉप्टरमधून पूरपरिस्थितीची पाहणी केली. तेथील स्थिती भयंकर असल्याने, केंद्र सरकार आसामला संपूर्ण मदत करेल, असे ते नंतर म्हणाले.>बिहारमध्ये राष्ट्रीय आपत्ती निवारण दल बिहारच्या पूरग्रस्त भागात अडकलेल्या लोकांची सुटका करण्यासाठी ८,८५० बोटी तैनात करण्यात आल्या असून, ३.८९ लाख लोकांना आतापर्यंत सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. राज्य सरकारने विविध जिल्ह्यांत राष्ट्रीय आपत्ती निवारण दल आणि राज्य आपत्ती निवारण दलाचे प्रत्येकी एक पथक तैनात केले आहे.