शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
8
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
9
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
10
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
11
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
12
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
13
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
14
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
15
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
16
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
17
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
18
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
19
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
20
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज

आसाम, बिहारमध्ये पुराचे थैमान, ५१ बळी

By admin | Updated: July 31, 2016 05:01 IST

बिहार आणि आसाममधील पूरपरिस्थिती बिघडतच चालली असून, आतापर्यंत या दोन्ही राज्यांतील पुरात ५१ जणांचा बळी गेला

पाटणा/गुवाहाटी : बिहार आणि आसाममधील पूरपरिस्थिती बिघडतच चालली असून, आतापर्यंत या दोन्ही राज्यांतील पुरात ५१ जणांचा बळी गेला आहे. बिहारमधील मृतांची संख्या २६ आणि आसामधील आकडा २५ आहे. दोन्ही राज्यांत धोक्याच्या पातळीवरून वाहणाऱ्या नद्यांचा फटका ४१ लाख लोकांना बसला आहे. केंद्र सरकारने आसाममधील पुरात मरण पावलेल्यांच्या नातेवाईकांना चार लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. मात्र, बिहारबाबत केंद्राने असा निर्णय अद्याप घेतलेला नाही. ओडिशामध्येही जोरदार पाऊस सुरू झाला असून, तिथे शनिवारी ठिकठिकाणी विजा पडून २९ जण मरण पावल्याचे वृत्त आहे. पिके भुईसपाट बिहारमध्ये गंभीर पुरस्थितीचा पुर्णिया, किशनगंज, अरारिया, दरभंगा, माधेपुरा, भागलपूर, कथिहार, सहरसा, सुपौल आणि गोपाल या जिल्ह्यांतील २१.९९ लाख लोकांना तडाखा बसला. १.८३ लाख हेक्टर एवढे क्षेत्र पाण्याखाली असून, ०.८३ लाख हेक्टरवरील पिके भुईसपाट झाली आहेत. पाऊस आणि पुरामुळे झालेल्या हानीचा आढावा घेणे सुरू आहे. (वृत्तसंस्था)>आसाममध्ये २१ जण मृत्युमुखीआसाममध्ये पुराचे थैमान सुरूच असून, मुसळधार पाऊस आणि फुगलेल्या नद्यांचा १९ लाख लोकांना फटका बसला आहे. अरुणाचल प्रदेश आणि भूतानमधील संततधार पावसामुळे आसाममध्ये पूरस्थिती निर्माण झाली. लखीमपूर, गोलाघाट, बोंगाईगाव, जोरहाट, ढेमाजी, बारपेटा, गोलपारा, धुबरी, दरांग, मोरीगाव आणि सोनीतपूर या जिल्ह्यांना पुराचा प्रचंड तडाखा बसला आहे, याशिवाय सिवसागर, कोकराझार, दिब्रूगड, गोलपारा, तिनसुकिया, बिस्वनाथ, नलबारी, बकसा, कामरूप (एम), चिरांग, कामरूप आणि दक्षिण कामरूप या जिल्ह्यांनाही झळ बसली आहे. आसाममधील पुरात आतापर्यंत २१ जणांचा बळी गेला आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी आज हेलीकॉप्टरमधून पूरपरिस्थितीची पाहणी केली. तेथील स्थिती भयंकर असल्याने, केंद्र सरकार आसामला संपूर्ण मदत करेल, असे ते नंतर म्हणाले.>बिहारमध्ये राष्ट्रीय आपत्ती निवारण दल बिहारच्या पूरग्रस्त भागात अडकलेल्या लोकांची सुटका करण्यासाठी ८,८५० बोटी तैनात करण्यात आल्या असून, ३.८९ लाख लोकांना आतापर्यंत सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. राज्य सरकारने विविध जिल्ह्यांत राष्ट्रीय आपत्ती निवारण दल आणि राज्य आपत्ती निवारण दलाचे प्रत्येकी एक पथक तैनात केले आहे.