शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

आसाम, बिहारमध्ये पुराचे थैमान, ५१ बळी

By admin | Updated: July 31, 2016 05:01 IST

बिहार आणि आसाममधील पूरपरिस्थिती बिघडतच चालली असून, आतापर्यंत या दोन्ही राज्यांतील पुरात ५१ जणांचा बळी गेला

पाटणा/गुवाहाटी : बिहार आणि आसाममधील पूरपरिस्थिती बिघडतच चालली असून, आतापर्यंत या दोन्ही राज्यांतील पुरात ५१ जणांचा बळी गेला आहे. बिहारमधील मृतांची संख्या २६ आणि आसामधील आकडा २५ आहे. दोन्ही राज्यांत धोक्याच्या पातळीवरून वाहणाऱ्या नद्यांचा फटका ४१ लाख लोकांना बसला आहे. केंद्र सरकारने आसाममधील पुरात मरण पावलेल्यांच्या नातेवाईकांना चार लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. मात्र, बिहारबाबत केंद्राने असा निर्णय अद्याप घेतलेला नाही. ओडिशामध्येही जोरदार पाऊस सुरू झाला असून, तिथे शनिवारी ठिकठिकाणी विजा पडून २९ जण मरण पावल्याचे वृत्त आहे. पिके भुईसपाट बिहारमध्ये गंभीर पुरस्थितीचा पुर्णिया, किशनगंज, अरारिया, दरभंगा, माधेपुरा, भागलपूर, कथिहार, सहरसा, सुपौल आणि गोपाल या जिल्ह्यांतील २१.९९ लाख लोकांना तडाखा बसला. १.८३ लाख हेक्टर एवढे क्षेत्र पाण्याखाली असून, ०.८३ लाख हेक्टरवरील पिके भुईसपाट झाली आहेत. पाऊस आणि पुरामुळे झालेल्या हानीचा आढावा घेणे सुरू आहे. (वृत्तसंस्था)>आसाममध्ये २१ जण मृत्युमुखीआसाममध्ये पुराचे थैमान सुरूच असून, मुसळधार पाऊस आणि फुगलेल्या नद्यांचा १९ लाख लोकांना फटका बसला आहे. अरुणाचल प्रदेश आणि भूतानमधील संततधार पावसामुळे आसाममध्ये पूरस्थिती निर्माण झाली. लखीमपूर, गोलाघाट, बोंगाईगाव, जोरहाट, ढेमाजी, बारपेटा, गोलपारा, धुबरी, दरांग, मोरीगाव आणि सोनीतपूर या जिल्ह्यांना पुराचा प्रचंड तडाखा बसला आहे, याशिवाय सिवसागर, कोकराझार, दिब्रूगड, गोलपारा, तिनसुकिया, बिस्वनाथ, नलबारी, बकसा, कामरूप (एम), चिरांग, कामरूप आणि दक्षिण कामरूप या जिल्ह्यांनाही झळ बसली आहे. आसाममधील पुरात आतापर्यंत २१ जणांचा बळी गेला आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी आज हेलीकॉप्टरमधून पूरपरिस्थितीची पाहणी केली. तेथील स्थिती भयंकर असल्याने, केंद्र सरकार आसामला संपूर्ण मदत करेल, असे ते नंतर म्हणाले.>बिहारमध्ये राष्ट्रीय आपत्ती निवारण दल बिहारच्या पूरग्रस्त भागात अडकलेल्या लोकांची सुटका करण्यासाठी ८,८५० बोटी तैनात करण्यात आल्या असून, ३.८९ लाख लोकांना आतापर्यंत सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. राज्य सरकारने विविध जिल्ह्यांत राष्ट्रीय आपत्ती निवारण दल आणि राज्य आपत्ती निवारण दलाचे प्रत्येकी एक पथक तैनात केले आहे.