शहरं
Join us  
Trending Stories
1
ISRO आणखी एक विक्रम रचणार! २०३५ पर्यंत भारतीय अंतराळ स्टेशन बनवणार, पाहा कसं दिसतं मॉडेल?
2
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
3
भाजपाला कधी मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष?; अचानक घडलेल्या घडामोडींमुळे झाला विलंब, काय आहे कारण?
4
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
5
Video: फटाक्यांच्या आवाजानं बैल उधळला, सगळीकडे गोंधळ; गावकऱ्यांची झाली पळापळ, १ जण जखमी
6
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
7
टिकटॉक भारतात परत सुरू होणार? नवीन अपडेट आली, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
8
Video: इलेक्टिक कारच्या ऑटोमेटिक फिचरनं घेतला मालकाचा जीव?; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
9
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
10
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
11
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
12
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
13
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
14
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
15
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
16
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
17
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
18
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
19
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
20
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1

विरोध केला म्हणून काँग्रेसच्या नेत्यांना अडचणीत आणण्याचे प्रकार अशोक चव्हाण : सरकार आरएसएस चालवतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2016 23:56 IST

सरकारच्या चुकीच्या धोरणांना विरोध केला म्हणून काँग्रेसच्या नेत्यांना अडचणीत आणण्याचे काम सुरू झाले आहे.

जळगाव- सरकारच्या चुकीच्या धोरणांना विरोध केला म्हणून काँग्रेसच्या नेत्यांना अडचणीत आणण्याचे काम सुरू झाले आहे. अगदी सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यापासून आम्हाला असा त्रास दिला जात आहे. आम्ही कार्यक्रमांमध्ये जे बोलतो ते राज्य शासनासह दिल्लीपर्यंत अगदी शब्दन् शब्द स्वरुपात पाठविले जाते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) सरकार चालवित आहे. लोकांमध्ये फूट पाडून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार अशोक चव्हाण यांनी शनिवारी जळगावात काँग्रेसच्या कार्यकर्ता कार्यशाळेत केला. लेवा भवनात ही कार्यशाळा झाली. व्यासपीठावर आमदार भाई जगताप, भा.ई.नगराळे, जिल्हा प्रभारी शोभा बच्छाव, जिल्हाध्यक्ष ॲड.संदीप पाटील, शहराध्यक्ष डॉ.अर्जुन भंगाळे आदी उपस्थित होते. चव्हाण म्हणाले, ग्रा.पं.स्तरावपर्यंत आरएसएस विष पसरवित आहे. अगदी मलाही आरएसएसचे कार्यकर्ते दिल्लीत भेटले. त्यांनी मला आरएसएसची धोरणे, उद्देश याची माहिती दिली, पण मी काँग्रेसच्या विचारांचा आहे. मंत्रीमंडळाचा दौरा फोटोंसाठीअधिवेशनापूर्वी आता मंत्रीमंडळाने दुष्काळ दौरा सुरू केला, पण ते फक्त फोटो काढून घेण्यासाठी व आम्ही काहीतरी करतोय हे दाखविण्यासाठी काही जिल्‘ामध्ये फिरले. सायंकाळी पार्टी खाऊन ते निघून गेले, अशी टिकाही चव्हाण यांनी केली. विद्यार्थ्यांची मुस्कटदाबीरोहित वेमुला, कन्हैया कुमार यांच्याबाबत जे घडले, देशात सध्या जे घडतेय ते घातक आहे. जे विचार मांडतात, सरकारच्या विरोधात बोलतात त्यांची मुस्कटदाबी केली जाते. विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करून देशद्रोही ठरविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लोकांमध्ये फूट पाडून आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचे काम सुरू आहे, असा दावाही चव्हाण यांनी केला. स्वबळावर लढूआगामी काळात जि.प., पं.स.च्या निवडणुका स्वबळावर लढल्या जातील. त्या त्या जिल्‘ांची स्थिती लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसशी प्रासंगिक करार केले जातील. पण राष्ट्रवादी काँग्रेस शब्द पाळत नाही. त्यामुळे त्यांच्यासोबत निवडणूक लढणार नाही. तसेच काँग्रेसमध्ये पुनर्बांधणीच्या दृष्टीने राज्यभरत प्रत्येक विधानसभा मतदारसंघात संबंधित जिल्‘ाबाहेरील प्रभारी नियुक्त केला जाईल, असे चव्हाण यांनी पत्रपरिषदेत विविध प्रश्नांची उत्तरे देताना स्पष्ट केले.