शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
3
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
4
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
5
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
6
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
7
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
8
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
9
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
10
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
11
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
12
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
13
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
14
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

१२ दिवसांसाठी अरविंद केजरीवालांचे 'मौन' व्रत

By admin | Updated: July 29, 2016 13:58 IST

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल विपश्यनेसाठी 12 दिवसांच्या सुट्टीवर जाणार असून 30 जुलैपासून नागपुरच्या विपश्यन केंद्रात दाखल होणार आहेत

ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. 29 - मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल विपश्यनेसाठी 12 दिवसांच्या सुट्टीवर जाणार आहेत. अरविंद केजरीवाल 30 जुलैपासून नागपुरच्या विपश्यन केंद्रात दाखल होणार आहेत. केंद्र सरकारसोबत सुरु असलेल्या वादामुळेच अरविंद केजरीवाल यांनी विपश्यनेसाठी जाण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळत आहे. 
 
विपश्यन केंद्रात दाखल झाल्यानंतर केजरीवाल यांना वृत्तपत्र, टीव्ही तसंच कोणत्याही माध्यमापासून दूर ठेवलं जाईल. अरविंद केजरीवाल यांच्या अनुपस्थितीत मनिष सिसोदिया दिल्ली सरकारचा कारभार हाती घेणार आहेत. 
 
2 वर्षांचा ब्रेक घेतल्यानंतर केजरीवाल पुन्हा विपश्यनेसाठी चालले आहेत. लोकसभा निवडणुकीतील प्रचारानंतर अरविंद केजरीवाल विपश्यनेसाठी गेले होते. दिल्लीमध्ये सत्तेत आल्यापासून केंद्र सरकारसोबत अरविंद केजरीवाल यांचे वाद होत आहेत. काही दिवसांपुर्वी तर केजरीवाल यांनी' मोदी मला इतके वैतागलेत की माझी हत्या करतील', असा व्हिडिओही जारी केला होता.
 
राजकारणातून निवृत्त झाल्यानंतर आपलं आयुष्य विपश्यनेसाठी वाहून देणार आहोत असं अरविंद केजरीवाल यांनी अगोदरच सांगितलेलं आहे. सरकारी शाळेत अतिरिक्त काम करावं लागणा-या शिक्षकांना विपश्यनेसाठी पाठवण्याच्या केजरीवालांच्या निर्णयावर जोरदार टीका करण्यात आली होती. यापेक्षा शाळेच्या इमारती, वर्गाच्या देखभालीवर आणि वीज, पाणीपुरवठ्यावर लक्ष द्यावं असं शिक्षकांनी सांगितलं होतं.