शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
2
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
3
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
4
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
5
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
6
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
7
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
10
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
11
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
12
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
13
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
14
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
18
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
19
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
20
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?

१२ दिवसांसाठी अरविंद केजरीवालांचे 'मौन' व्रत

By admin | Updated: July 29, 2016 13:58 IST

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल विपश्यनेसाठी 12 दिवसांच्या सुट्टीवर जाणार असून 30 जुलैपासून नागपुरच्या विपश्यन केंद्रात दाखल होणार आहेत

ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. 29 - मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल विपश्यनेसाठी 12 दिवसांच्या सुट्टीवर जाणार आहेत. अरविंद केजरीवाल 30 जुलैपासून नागपुरच्या विपश्यन केंद्रात दाखल होणार आहेत. केंद्र सरकारसोबत सुरु असलेल्या वादामुळेच अरविंद केजरीवाल यांनी विपश्यनेसाठी जाण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळत आहे. 
 
विपश्यन केंद्रात दाखल झाल्यानंतर केजरीवाल यांना वृत्तपत्र, टीव्ही तसंच कोणत्याही माध्यमापासून दूर ठेवलं जाईल. अरविंद केजरीवाल यांच्या अनुपस्थितीत मनिष सिसोदिया दिल्ली सरकारचा कारभार हाती घेणार आहेत. 
 
2 वर्षांचा ब्रेक घेतल्यानंतर केजरीवाल पुन्हा विपश्यनेसाठी चालले आहेत. लोकसभा निवडणुकीतील प्रचारानंतर अरविंद केजरीवाल विपश्यनेसाठी गेले होते. दिल्लीमध्ये सत्तेत आल्यापासून केंद्र सरकारसोबत अरविंद केजरीवाल यांचे वाद होत आहेत. काही दिवसांपुर्वी तर केजरीवाल यांनी' मोदी मला इतके वैतागलेत की माझी हत्या करतील', असा व्हिडिओही जारी केला होता.
 
राजकारणातून निवृत्त झाल्यानंतर आपलं आयुष्य विपश्यनेसाठी वाहून देणार आहोत असं अरविंद केजरीवाल यांनी अगोदरच सांगितलेलं आहे. सरकारी शाळेत अतिरिक्त काम करावं लागणा-या शिक्षकांना विपश्यनेसाठी पाठवण्याच्या केजरीवालांच्या निर्णयावर जोरदार टीका करण्यात आली होती. यापेक्षा शाळेच्या इमारती, वर्गाच्या देखभालीवर आणि वीज, पाणीपुरवठ्यावर लक्ष द्यावं असं शिक्षकांनी सांगितलं होतं.