शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

लातूरला पाणीपुरवठा करण्यासाठी अरविंद केजरीवाल सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2016 14:08 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून केजरीवालांनी मराठवाड्याला पुढील 2 महिने 10 लाख लीटर पाणीपुरवठा करण्याची तयारी दर्शवली आहे

ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. १२ - दुष्काळग्रस्त मराठवाड्याला पाणीपुरवठा करण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पुढे सरसावले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून केजरीवालांनी मराठवाड्याला पुढील 2 महिने 10 लाख लीटर पाणीपुरवठा करण्याची तयारी दर्शवली आहे. केजरीवाल यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं लातूरमधील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी घेत असलेल्या प्रयत्नांचं कौतुकही केलं आहे. दुष्काळग्रस्त जिल्ह्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मदत करण्याचं आवाहन केजरीवालांनी यावेळी केलं आहे.
 
अरविंद केजरीवाल यांनी ट्विटरच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवलेलं पत्र शेअर केलं आहे. ज्यामध्ये केंद्रांच्या प्रयत्नांच कौतुक करत आपणही मदत करण्यासाठी इच्छुक असल्याचं लिहिलं आहे. '21व्या शतकात पाण्याच्या अभावामुळे जर कोणाचा मृत्यू झाला तर आपल्या सगळ्यांसाठी ही लाजीरवाणी गोष्ट असेल. या परिस्थितीत लातूरला मदत करणं सर्व देशवासीयांचं कर्तव्य असल्याचंही', केजरीवाल यांनी लिहिलं आहे.
यावेळी केजरीवाल यांनी दिल्लीतदेखील पाण्याची कमतरता असल्याचं मान्य केलं आहे. मात्र लातूरमधील भयानक परिस्थिती पाहता त्यांना मदत करण आपलं कर्तव्य असल्याचं केजरीवाल यांनी म्हंटलं आहे. इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही पत्र लिहून मदतीचं आवाहन करण्यात याव असं केजरीवालांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सुचवलं आहे.
 
दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दिक्षित यांनी मात्र केजरीवालांचा हा स्टंट असल्याची टीका केली आहे. ‘त्यांनी प्रथम दिल्लीची तहान भागवावी. दिल्लीतील अनेक भागात लोकांना पिण्याचे पाणी उपलब्ध नाही. प्रथम दिल्लीतील लोकांना पाणी द्या. त्यानंतर लातूरविषयी बोला', असं शीला दिक्षित बोलल्या आहेत.