शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Arun Jaitley : जेटली हे देशाची बौद्धिक संपदा होते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 05:44 IST

भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर सुरुवातीला मला दिल्ली नवखी वाटायची.या अशा वातावरणात मला अरुण जेटली नावाचा एक ज्येष्ठ मित्र भेटला.

कायदा, वित्त, संरक्षण अशा विविध विषयांचा प्रगल्भ अभ्यास असणारे अरुण जेटली हे केवळ भाजपचेच नाही, तर या देशाची बौद्धिक संपदा होते. अशी माणसे दुर्मीळ असतात.भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर सुरुवातीला मला दिल्ली नवखी वाटायची. दिल्लीचे राजकारण फार वेगळे आहे. इथे आपण यशस्वी होऊ शकू का, असा प्रश्न सुरुवातीच्या काळात मला नेहमी भेडसवायचा. त्यावेळी केंद्रामध्ये काँग्रेस आघाडीचे सरकार होते. भाजपसमोर अनेक आव्हाने होती. माझा मोकळाढाकळा स्वभाव, जे वाटले ते स्पष्ट बोलणे. एखादी गोष्ट खटकली की, तोंडावर बोलून मोकळे होणे. दिल्लीच्या राजकारणात मात्र माझा हा स्वभाव दोष ठरणार की काय, अशी भीती वाटायची. या अशा वातावरणात मला अरुण जेटली नावाचा एक ज्येष्ठ मित्र भेटला.

जेटलीजींशी माझा अनेक वर्षांपासूनचा परिचय होता, पण मी दिल्लीला येण्यापूर्वी महाराष्ट्रातच बरीच वर्षे काम केले असल्याने, त्यांच्याशी माझे खूप घनिष्ठ नाते नव्हते. दिल्लीत आल्यानंतर हे नाते ऋणानुबंधात परिवर्तित झाले. ज्याच्यावर आपण डोळे बंद करून विश्वास ठेवावा आणि मनातल्या साऱ्या भावना बोलून दाखवाव्यात, असा एक सहकारी मला अरुण जेटली यांच्या रूपाने दिल्लीत गवसला. अध्यक्ष म्हणून काम करताना, पक्षांतर्गत निर्णय घेताना अनेकदा अडचणी यायच्या, संभ्रम व्हायचा. अशा वेळी जेटलीजी मदत करायचे. जेटली यांनी मला वेळोवेळी भावाप्रमाणे मार्गदर्शन केले. कायद्याचे ते गाढे अभ्यासक होते. त्यामुळे त्यांच्या सूचना, सल्ले तार्किकदृष्ट्या योग्य असायचे. एखादा क्लिष्ट विषयदेखील ते व्यवस्थित समजावून सांगायचे. पक्षाच्या बैठकीतही एखाद्या विषयावर ते सखोल विचार व अभ्यास करूनच बोलायचे.राज्यसभेत पक्षाचे नेते असताना त्यांनी तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारला आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांनी अनेकदा अडचणीत आणले. पुढे २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर, एक अनुभवी आणि ज्येष्ठ सहकारी म्हणून मार्गदर्शनासाठी त्यांच्याकडे अनेक सहकारी जायचे. अर्थमंत्री म्हणून त्यांची कारकिर्द देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदविली जावी, अशीच होती. आपल्या मूल्यांशी त्यांनी कधीही तडजोड केली नाही. त्यासाठी ते वैयक्तिक हितसंबंधांची पर्वाही केली नाही. त्यांची बुद्धिमत्ता तर तीक्ष्ण होतीच, शिवाय विविध मुद्दे समजून घेऊन, त्याचे योग्य आकलन करण्याची क्षमताही अफाट होती. त्यामुळेच भारतातील आघाडीच्या वकिलांत त्यांचे नाव होते.दिल्ली विद्यापीठाच्या निवडणुकीतून अरुण जेटली यांचे नेतृत्व घडत गेले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला केवळ दिल्लीतच नाही, तर संपूर्ण भारतात पोहोचविण्याचे काम त्यांनी केले. तो असा काळ होता की, त्या काळात संघटना बांधणे आणि ती तळागाळात रुजविणे हे अत्यंत कठीण काम होते. जेटली रात्रंदिवस मेहनत घ्यायचे. निष्णात वकील असूनही या सगळ्या व्यापात ते संघटनेला आणि पक्षालाही भरपूर वेळ द्यायचे. देशात आणि जगात नेमके काय सुरू आहे, याची त्यांच्याकडे अचूक माहिती असायची.

कायदा, वित्त, संरक्षण अशा विविध विषयांचा प्रगल्भ अभ्यास असणारे अरुण जेटली हे केवळ भाजपचेच नाही, तर या देशाची बौद्धिक संपदा होते. अशी माणसे दुर्मीळ असतात. त्यांच्या सर्वांगीण जडणघडणीसोबतच समाज आणि देशही घडत असतो. आपल्यातील बुद्धिमत्तेचा फायदा समाजात खोलवर रुजावा आणि त्यातून साऱ्यांचेच भले व्हावे, अशी तळमळ घेऊन ही माणसे जगत असतात आणि समाजातील असंख्य होतकरू आणि धडपडणाºया तरुणांचे भरणपोषण करत असतात. अरुण जेटली यांच्या निधनाने केवळ भाजपचीच नाही तर या देशाची, जगाची अपरिमित हानी झाली आहे. माझ्या या ज्येष्ठ सहकाºयाला व कौटुंबिक मित्राला भावपूर्ण श्रद्धांजली.- नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री

टॅग्स :Arun Jaitleyअरूण जेटली