शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
3
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
5
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
6
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
7
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
8
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
9
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
10
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
11
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
12
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
13
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
14
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
15
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
16
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
17
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
18
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
19
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
20
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड

भाजपेतर पक्षांच्या ऐक्याचे आवाहन

By admin | Updated: April 18, 2016 02:41 IST

पुढच्या लोकसभा निवडणुकीत वेगवेगळे लढून काम होणार नाही. भाजपाचा पराभव करायचा असेल, तर देशातील सर्व बिगर भाजपा राजकीय पक्षांना एकत्र यावे लागेल, असे बिहारचे

पाटणा/नवी दिल्ली : पुढच्या लोकसभा निवडणुकीत वेगवेगळे लढून काम होणार नाही. भाजपाचा पराभव करायचा असेल, तर देशातील सर्व बिगर भाजपा राजकीय पक्षांना एकत्र यावे लागेल, असे बिहारचे मुख्यमंत्री आणि संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष नितीशकुमार यांनी म्हटले आहे. भाजपामुळे देशातील लोकशाही धोक्यात आली आहे, असे नमूद करून भाजपाला विरोध असणाऱ्या पक्षांना एकत्र आणण्यात आपली प्रमुख भूमिका राहील, असे स्पष्ट संकेत नितीशकुमार यांनी दिले.पाटणा येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘अ‍ॅडव्हाँटेज कॉन्क्लेव्ह २०१६’मध्ये नितीशकुमार बोलत होते. यावेळी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार टीका केली. ‘जे लोक भगवा झेंडा फडकवतात तेच आता तिरंग्याबद्दल बोलत आहेत. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात रा. स्व. संघाचे काय योगदान आहे? राष्ट्रवाद आणि ‘भारत माता की जय’ यासारख्या घोषणांवरून निरर्थक वाद निर्माण करण्यात येत आहे. भाजपामुळे लोकशाही धोक्यात आली आहे. त्यांना पराभूत करण्यासाठी सर्व बिगर भाजपा पक्षांनी एकत्र यायला पाहिजे. वेगवेगळे लढल्यास काम होणार नाही. लोहियांनी बिगर काँग्रेस आघाडी स्थापन केली होती. आता सर्व पक्षांनी भाजपाविरुद्ध एकत्र आले पाहिजे, असे नितीशकुमार म्हणाले.‘अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी या भाजपाच्या तीन दिग्गजांना खड्यासारखे बाजूला फेकण्यात आले आहे आणि धर्मनिरपेक्षता व सांप्रदायिक सौहार्द यावर विश्वास नसलेल्यांच्या हातात सत्ता देण्यात आली आहे,’ अशा शब्दांत नितीशकुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अप्रत्यक्ष टीका केली.बिहारमध्ये संपूर्ण दारूबंदी लागू करण्याचे आपले आश्वासन आपण कसे पाळले आहे, हे सांगताना त्यांनी मोदींवर शरसंधान केले. ते म्हणाले, ‘२०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अनेक आश्वासने देण्यात आली होती. काळा पैसा भारतात परत आला काय? गरिबांच्या बँक खात्यात प्रत्येकी १५ लाख रुपये जमा झाले काय? २०१५ च्या विधानसभा निवडणुकीत मी दिलेल्या सात आश्वासनांची लोक थट्टा करत; पण राज्यात संपूर्ण दारूबंदी लागू करून मी पहिले सर्वांत मोठे आश्वासन पूर्ण केले आहे. आता एकेक करून इतर आश्वासनेही पूर्ण करू.’ (वृत्तसंस्था)भाजपाने उडविली खिल्ली, अंतर्गत भांडणे मिटविण्याचा सल्लाभाजपा/आरएसएसमुक्त भारत हे नितीशकुमार यांचे दिवास्वप्न आहे. १७ वर्षे भाजपायुक्त राजकारण केलेल्या नितीशकुमार यांच्या तोंडी ही भाषा शोभत नाही. भाजपाला पर्याय म्हणून उभे राहण्यापूर्वी आधी संयुक्त जनता दलाला देश पातळीवरील पक्ष करा व आपसातील भांडणे मिटवा, अशा शब्दांत भाजपा नेते शाहनवाज हुसैन यांनी नितीशकुमार यांना प्रतिटोला हाणला.संजदप्रमुख राष्ट्रीय राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावण्याचे दिवास्वप्न पाहत आहेत. हे त्यांचे स्वप्न आहे; पण ते कधीच साकार होणार नाही. बिहारमध्येच संजदमध्ये ऐक्य नाही. त्यामुळे नितीशकुमार यांनी असे वक्तव्य करण्याआधी संजदची राष्ट्रीय पातळीवर बांधणी केली पाहिजे, असे हुसैन म्हणाले.२०१९ मध्ये जनताच मोदी सरकारला खाली खेचणार आहे. त्यामुळे राष्ट्रीय स्तरावर कोणत्याही आघाडीची गरज पडणार नाही. सध्या नेतृत्वाची चर्चा नाही. तुम्ही काल्पनिक आघाडी निर्माण करीत आहात. परंतु भाजपा आणि आरएसएसमुळे देशाची लोकशाही आणि ऐक्य व अखंडतेला धोका निर्माण झाल्यामुळे देश भाजपामुक्त आणि संघमुक्त केलाच पाहिजे. -शकील अहमद, काँग्रेसचे सरचिटणीस