शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

कोणत्याही परदेशी खेळाडूंना भारतात धोका नाही - अनुराग ठाकूर

By admin | Updated: February 10, 2016 17:13 IST

कोणत्याही परदेशी खेळाडूंना भारतात धोका नाही, भारत हा सुरक्षित देश आहे कोणात्याही खेळाडूंना इथं असुरक्षितता असण्याचं कारण नाही असे बीसीसीआय सचिव अनुराग ठाकूर यांनी आज स्पष्ट केले

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १० - कोणत्याही परदेशी खेळाडूंना भारतात धोका नाही, भारत हा सुरक्षित देश आहे कोणात्याही खेळाडूंना इथं असुरक्षितता असण्याचं कारण नाही असे बीसीसीआय सचिव अनुराग ठाकूर यांनी आज स्पष्ट केले आहे. पुढील महिन्यात ८ मार्चपासून सुरू होणाऱ्या आयसीसी ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद भारताकडे आहे. पाकिस्तानने भारतात होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत खेळायचं आहे की नाही हे ठरवावे यापुर्वीही पाक  संघाने सुरक्षेच्या मुद्दयवरुन भारता बरोबरची द्विपक्षीय मालिका खेळली नव्हती असा टोला ठाकूर यांनी पाक क्रिकेट बोर्डाला मारला. 
सुरक्षेच्या मुद्द्यावरून पाक सरकार त्यांच्या संघास भारतात पाठविण्यास परवानगी देणार नाही. सरकारने परवानगी दिली नाही तर पाकिस्तानचे सामने दुबई, शारजाह आणि कोलंबो येथे आयोजित केले जाऊ शकतात असे पीसीबीचे अध्यक्ष शहरयार खान म्हणाले होते.  मार्च-एप्रिल दरम्यान होणाऱ्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानच्या सहभागाबाबत दुबई येथे आज झालेल्या आयसीसीच्या बैठकीत यावर चर्चा करण्यात आली, अशी माहिती पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) दिली. त्यामुळे विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानच्या सहभागाबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. गेल्या डिसेंबरमध्ये भारताने द्विपक्षीय मालिका खेळली नव्हती; कारण त्यांना सरकारकडून मंजुरी मिळाली नव्हती. त्यामुळे सरकारच्या निर्णयावर बरेच काही अवलंबून असेल, असेही शहरयार यांनी सांगितले.