शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
2
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
3
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
4
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
5
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
6
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
7
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
8
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
9
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
10
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
11
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
12
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
13
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
14
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
15
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
16
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
17
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
18
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
19
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
20
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
Daily Top 2Weekly Top 5

जशास तसे उत्तर हवे

By admin | Updated: January 12, 2016 04:28 IST

जी व्यक्ती किंवा संघटना भारताला दु:ख देईल, त्यांना अगदी तशाच प्रकारचे दु:ख दिले गेले पाहिजे. परंतु हे दु:ख कसे, केव्हा आणि कुठे द्यायचे, याबाबतचा निर्णय भारताच्या पसंतीवर

नवी दिल्ली : जी व्यक्ती किंवा संघटना भारताला दु:ख देईल, त्यांना अगदी तशाच प्रकारचे दु:ख दिले गेले पाहिजे. परंतु हे दु:ख कसे, केव्हा आणि कुठे द्यायचे, याबाबतचा निर्णय भारताच्या पसंतीवर अवलंबून असायला पाहिजे, असे मत संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पठाणकोटच्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर व्यक्त केले आहे. लष्करी अधिकाऱ्यांना संबोधित करताना पर्रीकर म्हणाले, ‘दुसऱ्यांना इजा पोहोचविणाऱ्यांना अगदी तशाच प्रकारच्या दु:खाची अनुभूती येत नाही तोपर्यंत त्यांच्यात बदल घडून येत नाही, असे इतिहास आम्हाला सांगतो, हे माझे मत आहे. हे सरकारचे मत आहे, असे मानले जाऊ नये. या कार्यक्रमानंतर पत्रकारांनी पर्रीकरांना याच मुद्यावर प्रश्न विचारले आणि हा मुद्दा अधिक स्पष्ट करण्यास सांगितले. त्यावर पर्रीकर म्हणाले, ‘जोपर्यंत तुम्ही दुसऱ्यांना दु:ख देणार नाही, मग तो कुणीही असो, तोपर्यंत अशा घटनांमध्ये घट होणार नाही, हा पायाभूत सिद्धांत आहे.’ पठाणकोट हल्ल्याचा नामोल्लेख न करता ते पुढे म्हणाले, ज्या सात जवानांनी बलिदान दिले आहे, त्यांचा अभिमान आहे. परंतु या हानीमुळे मला दु:ख झाले आहे. स्वत:चे बलिदान देण्यापेक्षा आपल्या आणि देशाच्या शत्रूंना ठार मारा, असे आपण जवानांना सांगितले पाहिजे. हौतात्म्याचा सन्मान केलाच पाहिजे. पण शत्रूंचा नायनाट करणे ही देशाची गरज आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)