शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
2
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
3
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
4
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
5
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
6
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
7
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
8
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त; सुरक्षा यंत्रणा, प्रशासन सज्ज
9
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
10
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
11
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
12
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
13
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
14
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
15
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
16
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
17
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
18
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
19
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
20
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!

जशास तसे उत्तर हवे

By admin | Updated: January 12, 2016 04:28 IST

जी व्यक्ती किंवा संघटना भारताला दु:ख देईल, त्यांना अगदी तशाच प्रकारचे दु:ख दिले गेले पाहिजे. परंतु हे दु:ख कसे, केव्हा आणि कुठे द्यायचे, याबाबतचा निर्णय भारताच्या पसंतीवर

नवी दिल्ली : जी व्यक्ती किंवा संघटना भारताला दु:ख देईल, त्यांना अगदी तशाच प्रकारचे दु:ख दिले गेले पाहिजे. परंतु हे दु:ख कसे, केव्हा आणि कुठे द्यायचे, याबाबतचा निर्णय भारताच्या पसंतीवर अवलंबून असायला पाहिजे, असे मत संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पठाणकोटच्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर व्यक्त केले आहे. लष्करी अधिकाऱ्यांना संबोधित करताना पर्रीकर म्हणाले, ‘दुसऱ्यांना इजा पोहोचविणाऱ्यांना अगदी तशाच प्रकारच्या दु:खाची अनुभूती येत नाही तोपर्यंत त्यांच्यात बदल घडून येत नाही, असे इतिहास आम्हाला सांगतो, हे माझे मत आहे. हे सरकारचे मत आहे, असे मानले जाऊ नये. या कार्यक्रमानंतर पत्रकारांनी पर्रीकरांना याच मुद्यावर प्रश्न विचारले आणि हा मुद्दा अधिक स्पष्ट करण्यास सांगितले. त्यावर पर्रीकर म्हणाले, ‘जोपर्यंत तुम्ही दुसऱ्यांना दु:ख देणार नाही, मग तो कुणीही असो, तोपर्यंत अशा घटनांमध्ये घट होणार नाही, हा पायाभूत सिद्धांत आहे.’ पठाणकोट हल्ल्याचा नामोल्लेख न करता ते पुढे म्हणाले, ज्या सात जवानांनी बलिदान दिले आहे, त्यांचा अभिमान आहे. परंतु या हानीमुळे मला दु:ख झाले आहे. स्वत:चे बलिदान देण्यापेक्षा आपल्या आणि देशाच्या शत्रूंना ठार मारा, असे आपण जवानांना सांगितले पाहिजे. हौतात्म्याचा सन्मान केलाच पाहिजे. पण शत्रूंचा नायनाट करणे ही देशाची गरज आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)