शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

..आणि प्रचार टेक्नोसॅव्ही झाला !

By admin | Updated: September 28, 2014 01:34 IST

विधानसभा असो वा नगरसेवक पदाची निवडणूक असो, 60, 70 आणि 8क् आणि अगदी 9क् च्या दशकातील निवडणुका सभांनी गाजल्या होत्या.

ताई माई आक्का, विचार करा पक्का.. अशा घोषणा नेटवर्किगमुळे दूरवर फेकल्या गेल्या
कसभा असो, विधानसभा असो वा नगरसेवक पदाची निवडणूक असो, 6क्, 7क् आणि 8क् आणि अगदी 9क् च्या दशकातील निवडणुका सभांनी गाजल्या होत्या. कारण त्या वेळी त्या त्या राजकीय पक्षांचे नेते आणि त्यांच्या भाषण शैलीला एक धार होती. आचार्य अत्रे आणि बाळासाहेब ठाकरे यांची भाषणो म्हणजे तरुणांना एक प्रकारची पर्वणीच असे. अगदीच उदाहरण द्यायचे झाले तर 1968 साली मुंबईत घोषणांद्वारे रंगविण्यात आलेल्या प्रभावी भिंतींनी शिवसेनेला ती निवडणूक जिंकून देण्यात वाटा 
उचलला होता. या काळातील निवडणुकांमध्ये जणू काही भिंतीच बोलत असत. भिंतींवर रंगविण्यात आलेल्या घोषणा मतदारांचे लक्ष वेधून घेत असत, त्यांना साद घालत. त्या काळात राजकीय पक्षांसमोर भिंतीशिवाय समर्पक असा दुसरा काही पर्यायही नव्हता.
मुंबईत एक काळ असा होता, की त्या वेळी मुंबईतल्या भिंतींवर कामगारांची मक्तेदारी होती. त्यानंतर शिवसेनेने दिलेल्या घोषणांनी तर मुंबई अक्षरश: दणाणून गेली. भिंतीशिवाय मुंबईतील पाण्याच्या टाक्या, जलवाहिन्या आणि पूल यांचाही घोषणांनी ताबा घेतला होता. मुंबईकरांना शिवसेनेच्या घोषणा अधिक जवळच्या वाटायच्या आणि आजही वाटतात. मुळात शिवसेनेच्या घोषणा लोकांना भावनिक आवाहन करीत असल्याने लोकांना त्या अक्षरश: जिंकायच्या. शिवसेनेची ‘शिवरायांची शपथ तुम्हाला, विजयी करा शिवसेनेला’ या घोषणोने तर मराठी मातीला अक्षरश: जिंकले होते.
दिवगंत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ‘सायकल पंक्चर..’ या वाक्यावर तर लोक अक्षरश: ‘झालीच पाहिजे..’ असे म्हणत प्रतिसाद द्यायचे. 
 
मुंबईत पार पडलेल्या निवडणुकांमध्ये एक काळ असा होता की मुंबईतल्या भिंतीवर म्हणी, वाक्प्रचार, सुविचार आणि काव्यपंक्ती रंगत. आज अशा घोषणा नाहीत आणि भिंतीही रंगत नाहीत. या भिंतींची जागा आता फेसबुकच्या भिंतींनी घेतली आहे. तरीही ‘आवाज कुणा’चा असे म्हटले की लोकांच्या तोंडातून आपसूकच ‘शिवसेनेचा’ हे येते; हेही तितकेच खरे आहे.
फरक एवढाच की, आता मैदानी सभा पूर्वीसारख्या गाजत नाहीत. ती रणधुमाळी माजत नाही आणि हे होत असले तरी तरुणांना आकर्षित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांना सोशल नेटवर्क साइट्सचा आधार घ्यावा लागत आहे, ही वस्तुस्थिती आहे. आता सारे काही सोशल नेटवर्क साइट्सवर होते. ‘मराठी युवकांचा दावा आहे, राज ठाकरे छावा आहे’; ‘घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, राजसाहेबांशिवाय वाली नाही मराठी मातीला’; ‘आमचे मत कोणाला, मराठीच्या अस्मितेला’; ‘आम्ही मतदार कोणाचे, राज ठाकरेच्या मनसेचे’; ‘जनता आता पेटली आहे, युत्या आघाडय़ांना विटली आहे’ अशा घोषणा आता सोशल नेटवर्किग साइट्सवर वाचायला आणि पाहायला मिळतात.
तळहातावर मावणा:या 
मोबाइलने क्रांती केली आहे आणि हाच मोबाइल आता हायटेक प्रचाराचे हायटेक माध्यम झाल्याचे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान दिसून आले आहे आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान दिसत आहे. त्यामुळे पूर्वी मैदानी सभा गाजवणारे काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपा 
आणि मनसे यांचा अधिकाधिक प्रचार 
आणि प्रसार सोशल नेटवर्किग साइट्सवर 
रंगत आहे आणि तरुण मतदाराला अधिकाधिक आकर्षित करण्याचा 
प्रयत्न करीत आहे.
 
स्वतंत्र भारतानंतर अगदी ऐंशीच्या दशकार्पयत झालेल्या निवडणुकांमध्ये झालेला प्रचार आणि प्रसार हा पत्रके आणि सभांद्वारे होत होता. शिवाय घोषणा आणि त्याद्वारे रंगविण्यात आलेल्या भिंती हाही एक वेगळा भाग होता. मात्र तंत्रज्ञानाने क्रांती केली आणि राजकीय निवडणुकांचा प्रचार आणि प्रसारदेखील टेक्नोसॅव्ही झाला. आता तर एकविसाव्या शतकात सोशल नेटवर्किग साइट्सच्या माध्यमातून प्रचार आणि प्रसारावर जोर दिला जात असून,  ‘ताई माई आक्का, विचार करा पक्का..’ अशा घोषणा कुठे तरी दूरवर फेकल्या गेल्या.
 
सचिन लुंगसे