शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

अंबानी बंधूंची विदेशात बँक खाती

By admin | Updated: October 28, 2014 02:07 IST

केजरीवाल आणि प्रशांत भूषण यांनी विदेशात काळा पैसा असलेल्या 15 जणांची यादी जारी केली, त्यात मुकेश आणि अनिल अंबानी यांच्या कुटुंबियांचा समावेश आहे.

नवी दिल्ली : रालोआ सरकारने काळा पैसा असलेल्या केवळ तीन उद्योगपतींची नावे उघड करीत उर्वरित बडय़ा उद्योजकांना वाचविण्याचा प्रयत्न चालविला असल्याचा आरोप आम आदमी पार्टीचे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. येथे एका पत्रपरिषदेत केजरीवाल आणि प्रशांत भूषण यांनी विदेशात काळा पैसा असलेल्या 15 जणांची यादी जारी केली, त्यात मुकेश आणि अनिल अंबानी यांच्या कुटुंबियांचा समावेश आहे. या दोन्ही बंधूंकडे रिलायन्स समूहाचे साम्राज्य असून त्यांची माता कोकिलाबेन, ज्येष्ठ अधिकारी संदीप टंडन त्यांच्या पत्नी उन्नावच्या माजी खासदार अन्नू टंडन, मॉटेक सॉफ्टवेअर प्रा.लि.(रिलायन्स समूहाची कंपनी), जेट एअरवेजचे मालक नरेशकुमार गोयल, डाबर उद्योग समूहाचे मालक बर्मन कुटुंबातील तीन बंधू तसेच यशोधरा बिर्ला यांच्या नावाचा समावेश आहे. मुंबईत शनिवारी झालेल्या कार्यक्रमात मुकेश अंबानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खांद्यावर हात ठेवला होता, त्यावरून त्यांचे किती घनिष्ठ संबंध आहेत ते लक्षात येते. अनिल अंबानी यांना मोदींनी स्वच्छ भारत मोहिमेत सहभागाचे आवाहन केलेल्या खास नऊ निमंत्रितांमध्ये स्थान आहे. त्यामुळे निश्चितच त्यासंबंधी तपासावर प्रभाव पडेल, असे केजरीवाल म्हणाले.
उर्वरित नावे कुठे गेली?
दोन वर्षापूर्वी आम्ही जारी केलेल्या यादीतही सरकारने जाहीर केलेली तीन नावे होती. उर्वरित नावे कुठे गेली? आम्ही नमूद केलेली नावे यादीत आहेत की नाही, त्याचे सरकारने स्पष्टीकरण द्यावे. या यादीतील काहींच्या निवासस्थानी सीबीआयने छापे घातले होते. बडय़ा उद्योगपतींची सरकारशीशी जवळीक पाहता तपास अधिका:यांनाही धमकावण्याचा प्रयत्न होईल, असेही केजरीवाल आणि भूषण यांनी म्हटले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
संपुआ सरकारच्या भूमिकेपासूनही माघार : जेठमलानी
च्जर्मनीच्या लिचटेनस्टेन बँकेत भारतीयांनी साठविलेल्या बेहिशेबी मालमत्तेबाबत त्या देशाने पुरविलेली सर्व माहिती उघड करण्याची भूमिका यापूर्वीच्या संपुआ सरकारने घेतली होती. मोदींचे सरकार त्यापासूनही माघार घेत आहे, असा आरोप ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी यांनी केला. 
 
च्जुलै 2क्11 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तत्कालीन संपुआ सरकारने एसआयटीची स्थापना करण्याबाबत निर्देश मागितले होते. रालोआने तर आता जर्मनीतील बँक खात्याच्या माहितीबाबत सुधारणा किंवा स्पष्टीकरणाची भूमिका अवलंबली आहे. 
 
च्सरकारने या मुद्यावर विरोधकांना लक्ष्य बनवत राजकारण किंवा खळबळ उडवून देणारा डाव खेळू नये. याकडे व्यापक दृष्टिकोनातून बघावे. काँग्रेसची भूमिका स्पष्टच असून त्यात कोणताही बदल झालेला नाही. ही राजकारण खेळण्याची वेळ नाही, असे काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक सिंघवी म्हणाले.