शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

अंबानी बंधूंची विदेशात बँक खाती

By admin | Updated: October 28, 2014 02:07 IST

केजरीवाल आणि प्रशांत भूषण यांनी विदेशात काळा पैसा असलेल्या 15 जणांची यादी जारी केली, त्यात मुकेश आणि अनिल अंबानी यांच्या कुटुंबियांचा समावेश आहे.

नवी दिल्ली : रालोआ सरकारने काळा पैसा असलेल्या केवळ तीन उद्योगपतींची नावे उघड करीत उर्वरित बडय़ा उद्योजकांना वाचविण्याचा प्रयत्न चालविला असल्याचा आरोप आम आदमी पार्टीचे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. येथे एका पत्रपरिषदेत केजरीवाल आणि प्रशांत भूषण यांनी विदेशात काळा पैसा असलेल्या 15 जणांची यादी जारी केली, त्यात मुकेश आणि अनिल अंबानी यांच्या कुटुंबियांचा समावेश आहे. या दोन्ही बंधूंकडे रिलायन्स समूहाचे साम्राज्य असून त्यांची माता कोकिलाबेन, ज्येष्ठ अधिकारी संदीप टंडन त्यांच्या पत्नी उन्नावच्या माजी खासदार अन्नू टंडन, मॉटेक सॉफ्टवेअर प्रा.लि.(रिलायन्स समूहाची कंपनी), जेट एअरवेजचे मालक नरेशकुमार गोयल, डाबर उद्योग समूहाचे मालक बर्मन कुटुंबातील तीन बंधू तसेच यशोधरा बिर्ला यांच्या नावाचा समावेश आहे. मुंबईत शनिवारी झालेल्या कार्यक्रमात मुकेश अंबानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खांद्यावर हात ठेवला होता, त्यावरून त्यांचे किती घनिष्ठ संबंध आहेत ते लक्षात येते. अनिल अंबानी यांना मोदींनी स्वच्छ भारत मोहिमेत सहभागाचे आवाहन केलेल्या खास नऊ निमंत्रितांमध्ये स्थान आहे. त्यामुळे निश्चितच त्यासंबंधी तपासावर प्रभाव पडेल, असे केजरीवाल म्हणाले.
उर्वरित नावे कुठे गेली?
दोन वर्षापूर्वी आम्ही जारी केलेल्या यादीतही सरकारने जाहीर केलेली तीन नावे होती. उर्वरित नावे कुठे गेली? आम्ही नमूद केलेली नावे यादीत आहेत की नाही, त्याचे सरकारने स्पष्टीकरण द्यावे. या यादीतील काहींच्या निवासस्थानी सीबीआयने छापे घातले होते. बडय़ा उद्योगपतींची सरकारशीशी जवळीक पाहता तपास अधिका:यांनाही धमकावण्याचा प्रयत्न होईल, असेही केजरीवाल आणि भूषण यांनी म्हटले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
संपुआ सरकारच्या भूमिकेपासूनही माघार : जेठमलानी
च्जर्मनीच्या लिचटेनस्टेन बँकेत भारतीयांनी साठविलेल्या बेहिशेबी मालमत्तेबाबत त्या देशाने पुरविलेली सर्व माहिती उघड करण्याची भूमिका यापूर्वीच्या संपुआ सरकारने घेतली होती. मोदींचे सरकार त्यापासूनही माघार घेत आहे, असा आरोप ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी यांनी केला. 
 
च्जुलै 2क्11 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तत्कालीन संपुआ सरकारने एसआयटीची स्थापना करण्याबाबत निर्देश मागितले होते. रालोआने तर आता जर्मनीतील बँक खात्याच्या माहितीबाबत सुधारणा किंवा स्पष्टीकरणाची भूमिका अवलंबली आहे. 
 
च्सरकारने या मुद्यावर विरोधकांना लक्ष्य बनवत राजकारण किंवा खळबळ उडवून देणारा डाव खेळू नये. याकडे व्यापक दृष्टिकोनातून बघावे. काँग्रेसची भूमिका स्पष्टच असून त्यात कोणताही बदल झालेला नाही. ही राजकारण खेळण्याची वेळ नाही, असे काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक सिंघवी म्हणाले.