शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
3
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
4
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
5
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
6
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
7
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
8
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
9
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
10
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
11
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
12
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
13
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
14
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
15
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
16
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
17
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
18
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
19
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
20
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा

अंबानी बंधूंची विदेशात बँक खाती

By admin | Updated: October 28, 2014 02:07 IST

केजरीवाल आणि प्रशांत भूषण यांनी विदेशात काळा पैसा असलेल्या 15 जणांची यादी जारी केली, त्यात मुकेश आणि अनिल अंबानी यांच्या कुटुंबियांचा समावेश आहे.

नवी दिल्ली : रालोआ सरकारने काळा पैसा असलेल्या केवळ तीन उद्योगपतींची नावे उघड करीत उर्वरित बडय़ा उद्योजकांना वाचविण्याचा प्रयत्न चालविला असल्याचा आरोप आम आदमी पार्टीचे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. येथे एका पत्रपरिषदेत केजरीवाल आणि प्रशांत भूषण यांनी विदेशात काळा पैसा असलेल्या 15 जणांची यादी जारी केली, त्यात मुकेश आणि अनिल अंबानी यांच्या कुटुंबियांचा समावेश आहे. या दोन्ही बंधूंकडे रिलायन्स समूहाचे साम्राज्य असून त्यांची माता कोकिलाबेन, ज्येष्ठ अधिकारी संदीप टंडन त्यांच्या पत्नी उन्नावच्या माजी खासदार अन्नू टंडन, मॉटेक सॉफ्टवेअर प्रा.लि.(रिलायन्स समूहाची कंपनी), जेट एअरवेजचे मालक नरेशकुमार गोयल, डाबर उद्योग समूहाचे मालक बर्मन कुटुंबातील तीन बंधू तसेच यशोधरा बिर्ला यांच्या नावाचा समावेश आहे. मुंबईत शनिवारी झालेल्या कार्यक्रमात मुकेश अंबानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खांद्यावर हात ठेवला होता, त्यावरून त्यांचे किती घनिष्ठ संबंध आहेत ते लक्षात येते. अनिल अंबानी यांना मोदींनी स्वच्छ भारत मोहिमेत सहभागाचे आवाहन केलेल्या खास नऊ निमंत्रितांमध्ये स्थान आहे. त्यामुळे निश्चितच त्यासंबंधी तपासावर प्रभाव पडेल, असे केजरीवाल म्हणाले.
उर्वरित नावे कुठे गेली?
दोन वर्षापूर्वी आम्ही जारी केलेल्या यादीतही सरकारने जाहीर केलेली तीन नावे होती. उर्वरित नावे कुठे गेली? आम्ही नमूद केलेली नावे यादीत आहेत की नाही, त्याचे सरकारने स्पष्टीकरण द्यावे. या यादीतील काहींच्या निवासस्थानी सीबीआयने छापे घातले होते. बडय़ा उद्योगपतींची सरकारशीशी जवळीक पाहता तपास अधिका:यांनाही धमकावण्याचा प्रयत्न होईल, असेही केजरीवाल आणि भूषण यांनी म्हटले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
संपुआ सरकारच्या भूमिकेपासूनही माघार : जेठमलानी
च्जर्मनीच्या लिचटेनस्टेन बँकेत भारतीयांनी साठविलेल्या बेहिशेबी मालमत्तेबाबत त्या देशाने पुरविलेली सर्व माहिती उघड करण्याची भूमिका यापूर्वीच्या संपुआ सरकारने घेतली होती. मोदींचे सरकार त्यापासूनही माघार घेत आहे, असा आरोप ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी यांनी केला. 
 
च्जुलै 2क्11 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तत्कालीन संपुआ सरकारने एसआयटीची स्थापना करण्याबाबत निर्देश मागितले होते. रालोआने तर आता जर्मनीतील बँक खात्याच्या माहितीबाबत सुधारणा किंवा स्पष्टीकरणाची भूमिका अवलंबली आहे. 
 
च्सरकारने या मुद्यावर विरोधकांना लक्ष्य बनवत राजकारण किंवा खळबळ उडवून देणारा डाव खेळू नये. याकडे व्यापक दृष्टिकोनातून बघावे. काँग्रेसची भूमिका स्पष्टच असून त्यात कोणताही बदल झालेला नाही. ही राजकारण खेळण्याची वेळ नाही, असे काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक सिंघवी म्हणाले.