शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
3
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
4
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
5
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
6
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
7
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
8
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
9
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
11
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
12
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
13
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
14
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
15
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
16
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
17
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
18
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
19
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
20
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!

‘देशाची एकात्मतेसाठी सदैव तत्पर राहावे’

By admin | Updated: January 11, 2015 00:31 IST

देशाची एकात्मता अखंड राहावी यासाठी अंतर्गत व सीमेपलीकडून संभवणाऱ्या धोक्यांचा मुकाबला करून सुरक्षितता अबाधित राहील याची खात्री करण्यासाठी सदैव तत्पर राहावे,

नवी दिल्ली : देशाची एकात्मता अखंड राहावी यासाठी अंतर्गत व सीमेपलीकडून संभवणाऱ्या धोक्यांचा मुकाबला करून सुरक्षितता अबाधित राहील याची खात्री करण्यासाठी सदैव तत्पर राहावे, असे आवाहन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शनिवारी देशभरातील राज्यपाल व नायब राज्यपालांना केले.दिल्लीतून सर्व राज्यपालांशी नववर्षानिमित्त ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’ने संवाद साधताना, राज्यघटनेची जपणूक आणि पालन करणे व लोकांच्या कल्याणासाठी झटण्याची आपण शपथ घेतली आहे, याचे राष्ट्रपतींनी राज्यपालांना स्मरण दिले. आपली घटनात्मक कर्तव्ये पार पाडताना राज्यपालांनी नेहमी देशाच्या विविधतेने नटलेल्या संस्कृतीची जपणूक होईल आ़णि समाजाच्या सर्व वर्गांमध्ये सहिष्णुता व सामंजस्य वाढीस लागेल यासाठी प्रयत्न करायला हवेत. शांतता व सामाजिक सलोख्याविषयी नेहमीच सजग राहायला हवे, असेही ते म्हणाले.या ‘व्हिडिओ संवादा’त महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी, राज्यपाल म्हणून, त्यांनी खास पुढाकार घेऊन काय कामे केली याचा संक्षिप्त आढावा राष्ट्रपतींना सादर केला. त्याचा गोषवारा असा-च्राज्यातील आदिवासी भागांमधील विशेष परिस्थिती लक्षात घेऊन अनेक कायद्यांमध्ये सुधारणा करून ते ‘पेसा’नुरूप करण्यात आले. त्यानुसार बांबू, तेंदूसह सर्व गौण वनसंपत्तीची मालकी ग्रामसभांना देण्यात आली आहे.च्आदिवासी उपयोजनांपैकी ५ टक्के निधी ग्रामपंचायतींना दिला गेला. ‘पेसा’ कायद्याची सर्वांगीण अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र हे अग्रणी राज्य आहे. च्मात्र वनहक्क कायदा व ‘पेसा’कायदा यांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी केंद्राने चोख व तत्पर व्यवस्था करणे गरजेचे आहे.