शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

राहुल गांधींकडून आघाडीचे संकेत

By admin | Updated: November 17, 2015 02:59 IST

राजकीय पक्षांसाठी ‘एकला चलो’चा नारा आता भूतकाळात जमा असल्याचे सूचित करीत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी विविध राज्यांतील निवडणुकांमध्ये युती किंवा

- हरीश गुप्ता,  नवी दिल्लीराजकीय पक्षांसाठी ‘एकला चलो’चा नारा आता भूतकाळात जमा असल्याचे सूचित करीत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी विविध राज्यांतील निवडणुकांमध्ये युती किंवा आघाडीचे राजकारण यशस्वी करण्यासाठी मैलांची वाटचाल करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. बिहारमध्ये अलीकडेच महाआघाडीत सहभागी झालेल्या काँग्रेसला मिळालेल्या भरघोस यशामुळे आत्मविश्वास दुणावलेल्या राहुल गांधी यांनी ‘भूतकाळ मी मागे सोडला आहे’, असे ठामपणे एका उत्तरात सांगितले. आघाडी किंवा युती स्थापन करण्याबाबत तुम्ही फारसे उत्सुक दिसत नाही, असा थेट प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता.‘एकला चलो रे’च्या राजकारणापासून पूर्णपणे फारकत घेणार असल्याचे संकेत देताना त्यांनी विधानसभा निवडणुकीत समविचारी आणि धर्मनिरपेक्ष पक्षांशी युती करण्याची इच्छा व्यक्त केली. आसाम आणि प. बंगालमध्ये पुढील वर्षी मे- जूनमध्ये विधानसभा निवडणुका असल्याकडे लक्ष वेधण्यात आले असता त्यांनी कोणत्याही राज्यात आघाडी किंवा युतीचे उद्दिष्ट साध्य होऊ शकते. तशी शक्यता मी नाकारणार नाही, असे स्पष्ट केले.काँग्रेसने याआधीच प. बंगालमध्ये डाव्या पक्षांसोबत समन्वय राखण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, तर आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी युती करणार असल्याचे जाहीरपणे सांगितले आहे. बद्रुद्दीन अजमल यांच्या आॅल इंडिया युनायटेड डेमॉक्रॅटिक फ्रंटचे लोकसभेत तीन खासदार असून त्यांच्याशी युती करण्याचे संकेतही त्यांनी दिले.संघटनात्मक बदल नाही...राहुल गांधी यांची पक्षाध्यक्षपदी तख्तपोशी आणि काँग्रेसमधील संघटनात्मक बदलाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. सप्टेंबरमध्येच हे बदल होऊ घातले होते. हे बदल लवकरच होतील मात्र फार मोठे किंवा व्यापक नसतील, असेही त्यांनी सूचित केले. काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनीही २००४ मध्ये लोकसभा निवडणुकीत आघाडी स्थापन करीत अटलबिहारी वाजपेयी यांच्या ‘इंडिया शायनिंग’च्या नाऱ्यातील हवा काढून घेतली होती. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी डोळ्यासमोर ठेवत राहुल गांधी यांनीही तीच भाषा चालविली आहे.