शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलंबियाची ४८ तासांत कोलांटी उडी! शशी थरूरनी शाळाच घेतली; पाकिस्तानच्या बाजुने केलेले वक्तव्य मागे घ्यायला लावले
2
मे महिना संपायला अन् खाद्य तेलाच्या किंमती कमी करायला...; केंद्राने आयात शुल्क निम्म्याने घटविले...
3
पीक नुकसानभरपाईच्या मदत रकमेत आता कपात; तीनऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मिळणार मदत
4
'या' ४ ठिकाणी पत्नी मिळवून देऊ शकते जबरदस्त नफा; पाहा कोणत्या आहेत या स्कीम्स?
5
"हे असं अर्धवट..."; सुदेश म्हशिलकरांच्या लेखी तक्रारीवर प्राची पिसाटची आगपाखड, चांगलीच भडकली
6
आजचे राशीभविष्य: शनिवार 31 मे 2025; खर्चाचे प्रमाण वाढेल, एखाद्या स्त्रीमुळे त्रास होऊ शकतो
7
'केईएम'मध्ये पुन्हा पाणी साचायला नको, उपाययोजनांसह प्रतिज्ञापत्र सादर करा : हायकोर्ट
8
युद्धनौका, पाणबुड्यांची नावे, ठावठिकाणा वर्माने पाकला पुरवला; कोठडीत रवानगी
9
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
10
राज्यात साडेएकवीस हजार शासकीय वाहने भंगारात; अपघातांसह प्रदूषणास बसेल आळा
11
गेट लॉस्ट, मि. मस्क! दुसऱ्याच्या पदच्युतीसाठी किमान चार वर्षे लागतील
12
गाळ टाकण्याच्या जागेतही हेराफेरी; लॉगशीटवर गुंदवली, माल उतरवला दिवे गावात!
13
विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे नाही; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. तटकरे यांचे स्पष्टीकरण
14
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
15
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही
16
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान एकाकी पडला; तालिबानशी संबंध सुधारण्याची घोषणा
17
आधी कॅच घेताना गडबडला; बॅटिंग करताना Hit Wicket झाला! मग नेटकऱ्यांमध्ये रंगली मॅच 'फिक्सिंग'ची चर्चा
18
"राज्यपातळीवरुन 'गोकुळ'च्या राजकारणात हस्तक्षेप झाला नाही..."; सतेज पाटलांनी स्पष्टच सांगितलं

गांधी हत्येसह महत्त्वाच्या सर्व फाईल्स सुरक्षित

By admin | Updated: July 15, 2014 02:03 IST

नरेंद्र मोदी सरकारकडून इतिहासाची हेळसांड होत नसल्याचा दावा करून गृहमंत्री राजनाथसिंग यांनी, म. गांधी यांच्या हत्येसह अन्य ऐतिहासिक महत्त्वाच्या फाईल्स सुरक्षित असल्याचा निर्वाळा आज राज्यसभेत दिला

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी सरकारकडून इतिहासाची हेळसांड होत नसल्याचा दावा करून गृहमंत्री राजनाथसिंग यांनी, म. गांधी यांच्या हत्येसह अन्य ऐतिहासिक महत्त्वाच्या फाईल्स सुरक्षित असल्याचा निर्वाळा आज राज्यसभेत दिला. नरेंद्र मोदी यांनी फाईल्स नष्ट करण्याआधी त्यांचे डिजिटलीकरण करण्याचे निर्देश दिले असल्याचे स्पष्ट करून राजनाथसिंगांनी, फाईल्स नष्ट करण्याची प्रक्रिया संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्याच काळात सुरू झाल्याचेही नमूद केले. सरकार इतिहासाची निरंतरता कायम राखण्यासाठी कटिबद्ध असून त्यात कुठलीही हेळसांड केली जाणार नाही असा दावा त्यांनी केला. गृहमंत्रालयातील ज्या फाईल्स नष्ट करण्यात आल्या त्यांना कार्यालयाच्या प्रक्रिया नियमांनुसारच नष्ट केले गेले आहे, असे सिंग पुढे म्हणाले. या प्रक्रियेनुसार कार्यालयातील फाईल्सला तीन श्रेणीत विभागले जाते. तिसऱ्या श्रेणीतील फाईल्सला १० वर्षांच्या काळानंतर तिचे पूर्णपणे समीक्षण करून नष्ट केले जाते. राज्यसभेतील एका सदस्याने प्रसिद्धी माध्यमांनी दिलेल्या वृत्ताच्या आधारे मागील आठवड्यात, पंतप्रधानांच्या सूचनेनुसार दीड लाख फाईलींना नष्ट केल्याचे सांगून त्यात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येशी संबंधित फाईलही असल्याचे म्हटले होते. त्यानंतर गृहमंत्र्यांनी या कथनाचे खंडन करणारे एक स्पष्टीकरणही दिले होते. सदस्यांना हवे असेल तर नष्ट केलेल्या एकेका फाईलमधील मसुदा आपण काढून देऊ शकतो, असा दावाही सिंग यांनी पुढे केला आहे. नष्ट केलेल्या फाईल्सचे मायक्रो फिल्मिंग करण्याबाबत सरकारकडून कोणतीच सूचना आली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तोंडीच, फाईली नष्ट करण्याआधी त्यांचे स्कॅनिंग व मायक्रोफिल्मिंग केले जावे असे म्हटले असल्याचे सिंग यांनी सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)