शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

विमान प्रवास @ २५००

By admin | Updated: June 16, 2016 04:28 IST

बहुप्रतीक्षित राष्ट्रीय नागरी विमान वाहतूक धोरणाला बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून, त्यामुळे यापुढे एक तासाच्या उड्डाणासाठी प्रवाशांना २,५00 रुपये भाडेच द्यावे लागेल.

नवी दिल्ली : बहुप्रतीक्षित राष्ट्रीय नागरी विमान वाहतूक धोरणाला बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून, त्यामुळे यापुढे एक तासाच्या उड्डाणासाठी प्रवाशांना २,५00 रुपये भाडेच द्यावे लागेल. प्रादेशिक विमान उड्डाणासाठीचे शुल्क यापुढे किमान असेल आणि हेलिकॉप्टरच्या संचालनासाठीही सरकार नवे नियम तयार करणार आहे. तसेच विमान कंपन्यांना सध्या असलेल्या आंतरराष्ट्रीय उड्डाणासाठीच्या अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. या धोरणामुळे २०२२ पर्यंत भारत जगातील तिसरे सर्वात मोठे विमान वाहतूक केंद्र होईल, असा विश्वास नागरी विमानमंत्री अशोक गजपती राजू यांनी व्यक्त केला आहे. विमान वाहतूक क्षेत्रात जी वाढ होत आहे, त्याचा लाभ घेण्यावरही जोर देण्यात आला आहे. याबाबत बोलताना केंद्रीय मंत्री अशोक गजपती राजू म्हणाले की, हे धोरण नवी दिशा देणारे ठरेल. तब्बल आठ महिने या धोरणावर विचारविनिमय करण्यात आला आहे. मंत्रालयाने आॅक्टोबर २०१५ मध्ये याबाबतचा संशोधित मसुदा जाहीर केला होता. याबाबत टिष्ट्वट करताना राजू यांनी म्हटले आहे की, आमूलाग्र बदलासाठी हे धोरण निर्णायक ठरेल. सन २०२२ पर्यंत भारत जगातील तिसरे सर्वात मोठे नागरी विमान वाहतुकीचे केंद्र असेल. त्यासाठी आम्हाला योजनांवर लक्ष केंद्रित करावे लागेल. (लोकमत न्यूज नेटवर्क)विमान वाहतूक धोरणाची वैशिष्ट्ये ...- भारतीय एअरलाइन्सच्या विदेशात उड्डाणासाठी किमान ५ वर्षांचा आणि 20 विमानांचा नियम. - प्रादेशिक विमान उड्डाणाला कमी शुल्क.- विमान कंपन्यांना मालाच्या चढ-उतारासाठी मंजुरी. - हेलिकॉप्टरच्या संचालनासाठी सरकार नवे नियम. - प्रादेशिक विमान सेवा वाढविण्यासाठी एक तासाच्या उड्डाणाकरिता विमानभाडे २५०० रुपये निश्चित. धोरणाचे स्वागत : विमान वाहतूक धोरणाचे स्वागत. या धोरणात एक तासाच्या प्रादेशिक प्रवास भाड्यावर २५00 रुपयांचे बंधन घातल्याने अनेक नवीन शहरे हवाईमार्गे जोडली जातील. सध्याच्या प्रवासासाठीही ही सवलत असेल, हा गैरसमज आहे. विमान कंपन्यांना आंतरराष्ट्रीय उड्डाणासाठी असलेल्या अटी रद्द करणे हे आतापर्यंतच्या धोरणाला अनुसरून आणि या क्षेत्राच्या वृद्धीसाठी आवश्यकच आहे. मात्र या वाढीसाठी लागणारी हवाई आणि विमानतळांवरील वाहतुकीच्या नियमनाची तयारी केली आहे का, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. हे क्षेत्र २00४ साली सर्वांसाठी खुले केल्याचे चांगले परिणाम आता दिसू लागले आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाची विमानतळे आणि विमान कंपन्या ही त्याचीच उदाहरणे आहेत. - प्रफुल्ल पटेल, माजी विमान वाहतूकमंत्री